


कल्याण उप परिवहन कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप
कल्याण परिवहन विभाग ९० टक्के अपघात करण्यासाठी वर्षभर विशेष उपक्रम राबण्यात येतील:: उप परिवहन अधिकारी रमेश कल्लुरकर.
ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी)उप प्रादेशिक परिवहन अधिकारी मा.विनोद साळवी यांचा नेतृत्वाखाली,सहायक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी मा.रमेश कल्लुरकर साहेब यांचा अध्यक्षतेखाली, ३४ वा.रस्ता सुरक्षा अभियान -२०२४ , चा समारोप प्रसंगी,१५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी २०२४ दरम्यान रस्ता सुरक्षा अभियान या उपक्रमांमध्ये विशेष सहकार्य आणि उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल, महानगरपालिकेचे बांधकाम विभाग प्रमुख , सांगळे साहेब, स्मार्ट सिटीचे मॅनेजर साहेब, डॉ.वझे,प्रसिद्ध साहित्यिक परुळेकर, यांचा उपस्थितीत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
संजय फुंदे यांनीही मान्यवरांचे पुष्गुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी कल्याण प्रादेशिक उपविभागीय परिवहन अधिकारी मा.रमेश कल्लुरकर यांचा हस्ते ठाणे,पालघर आणि नाशिक विभागीय आर एस पी अधिकारी युनिट कमांडर डॉ.मनिलाल रतिलाल शिंपी यांच्यासह आर एस पी अधिकारी जितेंद्र सोनवणे, शरद बोरसे,आणि योगेश अहिरे यांच्या पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.यावेळी रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष संतोष नवले , श्री पेणकर, विशाल शेटे सर, गुरुकृपा कॉलेज चा प्राचार्या कोल्हे मॅडम,तसेच रस्ता सुरक्षा अभियान यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य करणाऱ्या सर्व पदाधिकारी यांचा ही सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. सेफ्टी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विशाल शेटे यांनी वाहतुकीचे नियम पाळून अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे सांगितले.ज्येष्ठ साहित्यिक परुळेकर यांनी विनोदाचा विषय घेऊन मद्यपान करून गाडी चालवणे घातक आहे , मद्यपान करून गाडी चालवून जीवाशी खेळ करू नका असे आवाहन केले. डॉ. वझे,आणि सांगळे साहेब यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.सहाय्यक परिवहन अधिकारी अनिल धात्रक यांनी प्रास्ताविक देताना सांगितले की, रिक्षाचालक, बाईक स्वार, यांनी वेगावर नियंत्रण ठेऊन गाडी चालवणे आवश्यक आहे.तसेच हेल्मेट चा वापर करून सुरक्षित प्रवास करावा असे सांगितले.सहायक इतरही मोटार वाहन निरीक्षक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की,आपल्या वाहनाची नियमित तपासणी करून, नटबोल्ट,ऑईल, इंजिन सुरक्षित असल्याची खात्री करावी, त्यामुळे टेकनिकल चुकीमुळे अपघात होणार नाही.वाहन कुठे आणि कसे पार्किंग करावे,विनाकारण हॉर्न वाजवून पुढील चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून मोठा अपघात होतो.अशी सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली.अध्यक्षीय मार्गदर्शन करताना उप विभागीय परिवहन अधिकारी रमेश कल्लुरकर यांनी सांगितले की, रस्ता सुरक्षा अभियान सप्ताह,किंवा महिनाभर न राबवता जो पर्यंत समाजामध्ये वाहतुकीचे नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे होत नाही आणि अपघाताचे प्रमाण कमी होत नाही तोपर्यंत वर्षभर विशेष मोहीम हाती घेऊन शाळा , महाविद्यालये, आर एस पी युनिट, रिक्षा चालक मालक ,आणि विविध संस्थांचा सहभाग करून कल्याण डोंबिवली परिवहन विभागाच्या वतीने विशेष उपक्रम राबवण्यात येतील असे सांगितले.यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
संजय फुंदे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल धात्रक,सर्व सहायक मोटार वाहन निरीक्षक आणि कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी,तसेच विद्यार्थी, शिक्षक बंधू भगिनी, तसेच मोटार ड्रायव्हिंग स्कूल चे मालक, चालक , आणि समाजसेवक उद्योजक उपस्थित होते. रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यासाठी शाळा,आणि कॉलेज मध्ये संपर्क साधून वेळेचे नियोजन व सर्व व्यवस्था करण्यासाठी कार्यालयीन सहायक मनिष जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. मोटर वाहन निरीक्षक इंद्रजीत आमते यांनी उपस्थीत सर्व पदाधिकारी, मान्यवरांचे आभार व्यक्त केले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रसिद्ध निवेदिका सुप्रिया कुलकर्णी यांनी केले.