तरुणांचे प्रश्न आणि त्यांची दशा समजून घेतली तर समाजाला दिशा मिळेल-डॉ उज्जलकुमार चव्हाण माजी आय आर एस अधिकारी
उत्कर्ष खान्देशी अधिकारी व अमळनेर तालुका विकास मंच आयोजित
खान्देश वासियांची मान उंचावली अशा कर्तुत्ववान रत्नांचा सन्मान सोहळा संपन्न…
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
काहीच जमलं नाही म्हणून स्पर्धा परीक्षेकडे वळले. मित्र तयारी करतोय म्हणून तेही निघाले… लालदिव्याची गाडी, वलयांकित जगणे दिसले अन् स्पर्धा परीक्षेच्या वर्गात जाऊन बसले… अशी दूषणे तरुणांना नका देऊ! गर्दी का झाली, बेरोजगारांचे लोंढे परीक्षांच्या दिशेने का निघाले, याचे उत्तर ‘भाकरीचा चंद्र’ हेच आहे. असे कोणते क्षेत्र आहे, जिथे गर्दी नाही. गुणवत्ता आणि रोजगार यावर स्वतंत्र चर्चा करता येईल. परंतु, स्पर्धा परीक्षांचे चित्र नकारात्मकपणे न रंगविता तरुणांचे प्रश्न आणि त्यांची दशा समजून घेतली तर समाजाला दिशा मिळेल.
अमळनेरला बजरंग पॅलेस येथे कर्तुत्वाचा महासन्मान या कार्यक्रमात बोलतांना डॉ उज्वलकुमार चव्हाण माजी आय .आर एस अधिकारी मार्गदर्शन करतांना बोलत होते..
ते पुढे म्हणाले की खान्देशातील शैक्षणिक, वैचारिक ओळख अमळनेर आहे..चांगल्या लोकांचा सन्मान करणे हे कर्तव्य मंचाने पार पाडली.आजचा हा सत्कार्थीचा सोनियाचा दिवस आहे.जन्मभूमी ला विसरू नका,
आपण चांगल्या गोष्टी साठी प्रेरणा असतो..स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या गावातील मुलांना मार्गदर्शन करावे.. जीवन जगतांना आयुष्यात माणसं पेरा
गाव तेथे ग्रंथालय , प्रत्येक तालुक्यात अभ्यासिका व जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा केंद्र होण्यासाठी खान्देश मंचाने प्रयत्न करावे.
असे अमळनेरला बन्सीलाल प्लँसेस मध्ये कर्तुत्वाचा सन्मान सोहळा कार्यक्रमात बोलतांना सांगितले..
व्यासपीठावरप्रमुख अतिथी
डॉ उज्वलकुमार चव्हाण
माजी आय आर.एस अधिकारी,अनिल पवार उपव्यवस्थापक सारथी पुणे,मंगळग्रह संस्थानचे अध्यक्ष
डॉ डिगंबर महाले,नोबेल फाऊंडेशन चे संचालक डॉ जयदीप पाटील
सुनील नंदवाडकर डिवाएसपी,डॉ शरद बाविस्कर बालरोगतज्ज्ञ होते
अगोदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक कपील पवार म्हणाले की विद्यार्थी गुणवंत करण्यासाठी त्यांना प्रेरणा देणे महत्त्वाचे, खान्देशातील मुले विविध क्षेत्रांत चमकतात आहेत..विकास मंचाला चांगल्या लोकांचा सन्मान करण्याचे भाग्य लाभले असे सांगितले.
कार्यक्रमात विशेष सन्मान डिलीट बहुमान प्राप्त डॉ डिगंबर महाले अध्यक्ष-मंगळग्रह सेवा संस्थान अमळनेर,डॉ जयदीप पाटील
संचालक-नोबेल फाऊंडेशन जळगांव यांचा कार्याचा सन्मान मान्यवर यांनी स्मृतिचिन्ह व शाल बुके देऊन सत्कार केला.तालुक्यातील वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश संपादन करणाऱ्या भावी अधिकारी व कर्मचारी यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह सत्कार करण्यात आला.
सत्कार्थी मनोगत असिस्टंट कमिशनर
यशपाल पवार याने आपली यशोगाथा कथन केली. कपील पवार साहेब यांच्या कार्याचा विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य डॉ एस.आर चौधरी,सानेगुरुजी शाळेचे माजी आदर्श मुख्याध्यापक एस.डी.देशमुख, खानदेश शिक्षण मंडळाचे नीरज आग्रवाल, पत्रकार बांधव, गणेश शिगांरे सर्पमित्र यांचा सत्कार करण्यात आला.
सत्कार प्रसंगी मार्गदर्शन करताना नोबेल फाउंडेशनचे संचालक डॉ जयदीप पाटील म्हणाले की अमळनेरला मंगळग्रह माध्यमातून वैश्विक ओळख,अमळनेर सांस्कृतिक राजधानी असून येथे सेवा,देशभक्ती येथे आहे.. यशपाल,जिज्ञासा सारखे मेहनत घेऊन अधिकारी तयार होतात..जगाला लिहण्यासाठी कर्तृत्व आवडते, देशात दहशतवाद पेक्षा हातातून मोबाईल काढणे हि मोठी समस्या, वयस्कर मंडळीशी परीवारातील सदस्य बोलत नाही तर जेष्ठ व्यक्तिना आधार व तरूणांना संस्कार देणे गरजेचे आहे..मोठ्या पगाराची मुले यांचे पालक वृद्धाश्रमात असतात…
मुले सुसंस्कृत होतात पण संस्कारी होतात का?असे सांगत यशाला विनयशीलतेशी जोड असावी लागते ..देशात
रतन डाटा कडे विनयशीलता, सुसंस्कृत पणा आहे..बुद्धीची मशाल घेत मनाची तयारी करून अधिकारी बना..
ज्यादिवशी मुले मायबापाची ओळख होतात तो दिवस त्यांच्यासाठी सोन्याचा असतो… किर्तनाने समाज सुधरत नाही पण तमाशाने बिघडत नाही असेही त्यांनी सांगितले.
मंगळ ग्रह संस्थांचे अध्यक्ष डॉ डिगंबर महाले म्हणाले कि मित्रांची साथ व
मित्राच्या असण्याने मला महत्त्व आहे,
माझा सत्कार हा सर्व मंगळग्रह मंदीराला अर्पण करतो. हे सांगत सर भावनिक झाले शब्द सुचत नव्हते बरंच काही बोलायचं होते.
शेवटी सर्व आयोजकांनी माझा सन्मान केला.. धन्यवाद व्यक्त न करता मी आपल्या ऋणात राहील असे सांगितले..
सुनील नंदवाडकर डिवाएसपी म्हणाले कि सांस्कृतिक मूल्यांचे शहर अमळनेर आहे.पोलीसात काम करतांना परीवारात संवाद साधला जात नाही..ते मुके झाले आहे.. सध्या संवादाची गरज आहे..सध्या परीक्षेतील काफी बंद होणे गरजेचे आहे. तेव्हा चांगली पिढी निर्माण होणार असे सांगितले.
तर अनिल पवार उपव्यवस्थापक पुणे
स्पर्धा परीक्षासाठी मार्गदर्शकाची संख्या वाढली आहे. त्याचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा, आपल्या पदाचा उपयोग समाजासाठी कसा करता येईल याचा विचार व्हावा.. पूजा खेडेकर प्रकरण वर बोलतांना सांगितले की…
अशा घटना आपल्याबरोबर होणार नाही याची काळजी घ्यावी,
ग्रामीण भागातील मुलांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे,शैक्षणिक शुल्क वाढले आहे, आरक्षासाठी दोन समाज लढत आहेत..सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सारथीसारखी योजना महत्त्वाची आहे,सारथी संस्था विद्यार्थ्यांना यशदायी ठरत आहे. अनेक विद्यार्थी आपले स्प्नन पुर्ण करीत आहे असे सांगितले..
सत्कार सन्मान सोहळ्यात
सुत्रसंचालन युनियन बँकेचे प्रबंधक मयुर पाटील तर आभार प्रर्दशन पत्रकार उमेश काटे यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजक अमळनेर तालुक्यातील सर्व विकास मंच,श्री अंबरीश ऋषी महाराज टेकडी गृप,सानेगुरुजी स्पर्धा परीक्षा केद्र,शिवशाही फाऊंडेशन,अमळनेर माजी प्रतापीय प्रबोधीनी,स्वामी विवेकानंद इंग्लिश मेडीयम स्कूल,अमळनेर, पीटीए कोचिंग क्लासेस संघटना यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
कार्यक्रमाला अमळनेर तालुक्यातील अनेक शिक्षक पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते..