प्रभावी लेखणीतून व अनमोल वाणीतून वंचिताच्या व्यथा मांडणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे
जिल्हा सेवानिवृत्त आरोग्य विस्तार अधिकारी पी एस पाटील यांचे प्रतिपादन
देवगांव देवळी हायस्कूलमध्ये अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने व्याख्यान..
अमळनेर प्रतिनिधी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजविण्याचे काम शाहीर अण्णा भाऊ साठे यांनी केले. असे सांगत
विद्यार्थ्यांनी गुरुजनांचा आदर करावा, सध्या वाचन संस्कृती टिकली पाहिजे, यासाठी पुस्तकांचे वाचन करा, मिळालेल्या संधीचे सोने करा अण्णाभाऊ साठे यांनी प्रतिकूल परिस्थितीतही अनुकूलता निर्माण केली असे
देवगांव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत ‘महापुरुषांच्या विचारांचा प्रचार’ कार्यक्रमासाठी आयोजित कार्यक्रमात वक्ते जिल्हा सेवानिवृत्त आरोग्य विस्तार अधिकारी पी. एस पाटील यांनी देवगांव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये येथे आयोजित व्याख्यानमालेत बोलत होते..
अगोदर कार्यक्रमाची सुरुवात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पूजन करण्यात आले..
विचार पिठावर शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख अतिथी गायत्री परिवाराचे राजमल बोरसे,अरविंद सोनटक्के, एस के महाजन, एच.ओ. माळी होते..
कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख आय .आर .महाजन यांनी केले..
इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी अर्पिता बोरसे, तनुश्री सोनवणे, अश्विनी माळी, प्रीती पाटील, श्रेया पाटील, जयश्री पाटील, कृष्णा पाटील, यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकत मनोगत व्यक्त केले.
गायत्री परिवाराची राजमल बोरसे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला..तर
अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत व लोकनाट्यांमधून जनजागृतीचे कार्य केले होते. त्यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अत्यंत मोलाचे योगदान लाभले होते असे अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी सांगितले…
कार्यक्रमांमध्ये इयत्ता आठवीचा विद्यार्थी यश पाटील यांने अण्णाभाऊ साठे यांची उभेउभ चित्र साकारले होते.. त्याचा सन्मान कार्यक्रमाचे वक्ते पी एस पाटील व राजमल बोरसे यांनी दोनशे रूपये बक्षीस देऊन त्याचा सत्कार केला.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ईश्वर महाजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एच ओ माळी, एस के महाजन ,अरविंद सोनटक्के, शिक्षकेतर कर्मचारी संभाजी पाटील यांनी प्रयत्न केले