विद्यार्थी विकासाचा ध्यास हेच शिक्षकाचे अंतिम ध्येय असणे गरजेचे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
आपल्या देशाची सर्वांगीण प्रगती आजच्या विद्यार्थ्यात आणि उद्याच्या नागरिकात असून आजच्या विद्यार्थ्यांची जडणघडण करण्यात त्याचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचे ध्येय शिक्षकाचे असणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी समता शिक्षक परिषद व माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या वतीने आयोजित सत्कार कार्यक्रमाप्रसंगी बोलताना व्यक्त केले ते पुढे म्हणाले सज्जन माणसांची देशाच्या जडणघडणीत, देशाला पुढे नेण्यासाठी, प्रगतीच्या वाटा समृद्ध करण्यासाठी गरज असून त्यासाठी आजच्या विद्यार्थ्याला ज्ञानाच्या माध्यमातून एक सजग नागरिक,सज्जन नागरिक बनविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील राहून आपल्या पेशाला स्वतंत्र अशी ओळख निर्माण करून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची आवश्यकता असल्याचे मत देखील त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना याप्रसंगी सन्मानपत्र देऊन गौरवांकित करण्यात आले सन्मानपत्राचे वाचन डॉ. मिलिंद बागुल यांनी तर प्रास्ताविक समता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाठ यांनी केले कार्यक्रमाचे आभार तुळशीराम सोनवणे यांनी मानले कार्यक्रमाप्रसंगी रणजीत सोनवणे ,बी. टी. सपकाळे साहेबराव बागुल, संतोष कचरे, शंकर भामेरे, वर्षा अहिरराव, प्रज्ञा तायडे, प्रा. शालिनी बिऱ्हाडे इ. मान्यवरांच्या हस्ते जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गुणवत्ता विकास कार्यक्रम यशस्वीरित्या राबविल्याबद्दल तसेच शिक्षकांचे वेतन व इतर प्रश्नांची सोडवणूक केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.