• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

अमळनेरला ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून शासनाची मान्यता…. शासनाचे केले अभिनंदन!!!

Aug 21, 2024

Loading

अमळनेरला ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून शासनाची मान्यता….

शासनाचे केले अभिनंदन!!!

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) पुस्तकाचे गाव’ विस्तार योजनेंतर्गत नाशिक महसुली विभागातील अमळनेर जि. जळगाव येथील पुस्तकांच्या गावांना मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाने दिनांक २०.०८.२०२४ रोजी शासन निर्णय परिपत्रकाद्वारे पुस्तकांचे गाव संबंधीचे पत्र निर्गमित केले आहे. महाराष्ट्र शासन निर्णयानुसार ‘पुस्तकाचे गाव’ ही योजना विस्तारीत स्वरुपात ६ महसूली विभागात सुरु केली आहे.त्या नुसार नाशिक महसूल विभागात अमळनेरला हा प्रथम बहुमान मिळाला आहे.
पुस्तकांचे गाव एक संक्षिप्त इतिहास :
“हे ऑन वे” या वेल्स (इंग्लंड) मधिल पुस्तकाच्या गावाच्या धर्तीवर “पुस्तकांचं गाव” ही संकल्पना अस्तित्वात आली. ‘पुस्तकांचं गाव’ या योजनेची लोकप्रियता लक्षात घेऊन मराठी भाषेचा विकास, प्रचार,प्रसार व वाचन संस्कृतीची जोपासना व्हावी तसेच भाषेची आवड वाढावी या मूळ उद्देशाने “पुस्तकांचे गाव” ही संकल्पना उदयास आली. या अभिनव उपक्रमाचे उद्घघाटन दि. ४ मे २०१७ रोजी करण्यात आले होते.”पुस्तकांचे गाव” योजनेची व्यापकता वाढविण्याच्या दृष्टीने तसेच मा.मुख्यमंत्री महोदयांनी केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यात एक “पुस्तकांचे गाव” सुरु करुन योजनेचा अधिक विस्तार करणे बाबतचा निर्णय अलिकडे घेण्यात आला.
“पुस्तकांचे गाव” ही योजना विस्तारीत स्वरुपात सुरु करताना पहिल्या टप्प्यात ६ महसूली विभागात सुरु करण्यात येणार असून कोकण विभागातील पोभुर्ले या गावानंतर नाशिक विभागातील अमळनेर येथे लवकरच पुस्तकांचे गाव योजना उभारण्यात येणार आहे.
खानदेशातील एक महत्त्वाचे प्राचीन गाव म्हणजे अमळनेर.अमळनेर हे जळगाव जिल्ह्यातील एक सुप्रसिद्ध शहर आहे. पूज्य साने गुरूजी यांचे अमळनेर येथे वास्तव्य होते.भारताला स्वातंत्र्य पूर्व काळात साने गुरुजींनी अमळनेरच्या प्रताप हायस्कुल मध्ये अध्यापन केले. पूज्य साने गुरूजी व कर्मयोगी प्रताप शेठजी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अमळनेर येथे पुस्तकांचे गाव उभारण्यात येणार असून ही निश्चितच खानदेशवासिय आणि अमळनेरकर ह्यांच्यासाठी आनंदाची व अभिमानाची एक बाब आहे.
अमळनेर येथे पुस्तकांचे गाव उभारण्याची कार्यवाही राज्य मराठी विकास संस्थेद्वारे(मुंबई) करण्यात येणार आहे.योगायोग असा की डॉ.शामकांत देवरे हे ह्या संस्थेचे संचालक असून ते या भूमीचे सुपुत्र सुद्धा आहेत,हा दुहेरी आनंद खानदेशकरांच्या दृष्टीने महत्वाचे आहे.
प्रस्तुत बहुमानाची एक पूर्वपीठिका म्हणजे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या* समारोप समारंभाला अर्थात ४ फेब्रुवारी २०२४ रोजी मा.मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे यांनी अमळनेरला पुस्तकाचे गाव योजना जाहीर करण्या संदर्भात आपल्या मनोगतात नमूद केले होते.तसेच शालेय शिक्षण मंत्री श्री.दिपकजी केसरकर यांनी सुद्धा या विषयाची मांडणी केली होती. ’अमळनेर गाव’ हे पूर्वी पासूनच साहित्य नगरी म्हणून सर्वाना परिचित आहे.अमळनेरचा इतिहास पहिला तर अमळनेरला अगोदर victeria Jubliee Library होती, त्याचे नाव आता पूज्य साने गुरुजी ग्रंथालय असे आहे.

महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस व मा.उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार यांनी सुद्धा अमळनेर या ठिकाणी पुस्तकाच गाव होण्यासाठी सकारात्मक आग्रह धरला होता. ९७ वे साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष नामदार श्री.गिरीष महाजन तसेच अमळनेरचे भूमिपुत्र नामदार अनिल पाटील यांनी अमळनेरला पुस्तकाच गाव जाहीर करण्या संदर्भात शासन स्तरावर विशेष विनंती केली होती.
९७ वे अखिल भारतीय संमेलन अमळनेर येथे खान्देश शिक्षण मंडळाच्या परिसरात झालेले असतांना खा.शि.मंडळाचे सर्व सन्मानीय पदाधिकारी,प्राचार्य,उप प्राचार्य,प्राध्यापक व शिक्षक,ग्रंथपाल,शिक्षकेत्तर वृंद यांचा सहभाग पाहता तसेच संस्थेतील पायाभूत सुविधा पाहून खा.शि मंडळाला हा बहुमान देण्यात यावे,असे सर्वांना मनस्वी वाटत होते.
*पाच ठिकाणी होणार “ग्रंथालय*
१) खा.शि मंडळ,अमळनेर
२) संत सखाराम महाराज वाडी संस्थान
३) विक्टोरिया ज्युबली ग्रंथालय( पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर)
४) मंगळ ग्रह संस्था अमळनेर
५) मराठी वांड:मय मंडळ अमळनेर
उपरोक्त पाच ठिकाणी होणा-या नविन ग्रंथालयासाठी प्रत्येकी पाच लाख रुपये मिळणार आहेत.
प्रस्तुत शासकिय योजनेच्या मान्यतेसाठी राज्याचे अप्पर मुख्य साचिव सौ.मनिषा पाटणकर-म्हैसकर,
खानदेश पुत्र श्री.शामकांत देवरे (अध्यक्ष,राज्य मराठी विकास संस्था),जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.आयुष प्रसाद यांनी आग्रह धरला आणि या सर्व प्रक्रियेचा पाठपुरावा मा.सीए नीरज अग्रवाल (कार्योपाध्यक्ष,खा.शि.मंडळ) यांनी व सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे अध्यक्ष दिलीपराव सोनवणे, चिटणीस प्रकाश वाघ व संचालक मंडळ, मराठी वाड्:मय मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी व संचालक मंडळ, मंगळग्रह संस्थानचे अध्यक्ष डॉ डिगंबर महाले व विश्वस्त मंडळ यांनी शासनाचे अभिनंदन केले.यामुळे अमळनेरचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *