या.दे.पाटील माध्यमिक विद्यालयात पूज्य साने गुरुजींची जयंती विविध कार्यक्रमांनी संपन्न
जळगांव प्रतिनिधी-(विजय लुल्हे)
मेहरूण येथील जय भवानी शिक्षण मंडळ संचलित या.दे.पाटील माध्यमिक विद्यालयात आज साने गुरुजी यांचे १२५ वी जयंती दि .२४ डिसेंबर २०२४ रोजी विविध दर्जेदार कार्यक्रमांनी संपन्न झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक खंबायत सर होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पन करण्यात आले.प्रमुख पाहुण्या बालसाहित्यिका सौ.मायाताई धुप्पड यांचे स्वागत मुख्याध्यापकांनी शाल, बुके व पुस्तक देऊन केले.प्रमुख पाहुणे डी.बी.महाजन सरांचे स्वागत मुख्याध्यापकांनी बुके व पुस्तक देऊन केले.सौ.मायाताई धुप्पड यांनी आपल्या खुमासदार शैलीतून विद्यार्थ्याना विविध कथा सांगितल्या.त्यांच्या कथांची पात्रे निसर्गातील घटक होते.कथा काव्य त्यांनी विद्यार्थ्यांकडून म्हणवून घेतले.डी.बी महाजन सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.मुख्याध्यापकांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.कार्यक्रम समाज चिंतामणी प्रतिष्ठान, जळगाव यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला.विद्यार्थ्यांनी साने गुरुजींच्या जीवनावर आधारित भाषणे केली.कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन विद्यालयाच्या उपशिक्षिका श्रीमती अहिरराव मॅडम व इ.९ वी ब च्या विद्यार्थिनी कु.जान्हवी महाजन व कु.प्रणाली सपकाळे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक , भगिरथ हायस्कूलचे उपशिक्षक राजेंद्र कोळी सर,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी,मेहरूण येथील जय भवानी शिक्षण मंडळ संचलित या.दे.पाटील माध्यमिक विद्यालयात साने गुरुजी यांचे १२५ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक खंबायत सर होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते साने गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. बालसाहित्यिका सौ.मायाताई धुप्पड व डी.बी.महाजन सर दोघांचे स्वागत मुख्याध्यापक खंबायत सरांनी बुके व पुस्तक देऊन केले.सौ.मायाताई धुप्पड यांनी आपल्या खुमासदार शैलीतून विद्यार्थ्याना विविध कथा सांगितल्या.त्यांच्या कथांची पात्रे निसर्गातील घटक होते.तसेच कथा काव्य त्यांनी विद्यार्थ्यांकडून म्हणवून घेतले.आदरणीय डी.बी.महाजन सर तसेच मुख्याध्यापक खंबायत यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.सदरहू कार्यक्रम समाज चिंतामणी प्रतिष्ठान, जळगाव यांच्यातर्फे घेण्यात आला.विद्यार्थ्यांनी साने गुरुजींच्या जीवनावर आधारित भाषणे केली.कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन विद्यालयाच्या उपशिक्षिका श्रीमती अहिरराव मॅडम व इ.९ वी ब च्या विद्यार्थिनी कु.जान्हवी महाजन व कु.प्रणाली सपकाळे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक सर,भगिरथ हायस्कूलचे उपशिक्षक राजेंद्र कोळी सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींनी सहकार्य केले.आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.