• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

झुंडशाहीमुक्त भारत संविधानास अभिप्रेत,साहित्य संमेलनात जेष्ठ साहित्यीक जयसिंग वाघ यांचे प्रतिपादन..

Dec 25, 2022

Loading

झुंडशाहीमुक्त भारत संविधानास अभिप्रेत

साहित्य संमेलनात जयसिंग वाघ यांचे मत
—————————————————
बुलढाणा /जळगाव :- सन १९५० पासुनच भारतात निव्वळ निवडणुका जिंकने त्या करीता झुंड़शाहिचा वापर करणे सुरु आहे , आता ही झुंड़शाहि अधिकच फोफावली आहे या विरुद्ध सर्वच राजकीय पक्ष , विचारवंत , जनता यांनी एकत्रित लढने आवश्यक आहे कारण झुंड़शाहिमुक्त भारत संविधानास अभिप्रेत आहे , भारतात असलेल्या झुंड़शाहिस जसे राजकीय पक्ष जबाबदार आहेत तसेच जनता सुद्धा जबाबदार आहे असे रोख ठोक विचार जळगाव येथील प्रसिद्व साहित्यिक व विचारवंत जयसिंग वाघ यांनी व्यक्त केले .
बुलडाणा येथील राज्यस्तरीय साहित्य संमेलनात २४ रोजी आयोजित ‘ भारतीय संविधानास अभिप्रेत भारत ‘ या विषया वरील
परिसंवादात अध्यक्षस्थानावरुन भाषण करतांना वाघ बोलत होते .
जयसिंग वाघ यांनी पुढं आपल्या भाषणात सांगितलेकि संविधानाने आपल्या देशाचे नाव प्रस्तावनेत तसेच कलम १ मध्ये ‘ भारत ‘ असे नमूद केले आहे , भारत या शब्दास मोठा इतिहास आहे तो आमचा स्वाभिमान , अस्मिता , ओळख आहे , भारत शब्द एतददेशिय आहे , याचे दाखले अनेक ग्रंथात मिळतात , असे असले तरी बहुतांश लोक भारत न म्हणता हिंदुस्तान म्हणतात . हिन्दू , हिंदुस्तान हे शब्द मोगलांची देन आहे , ते आमच्या मानसिक गुलामगिरी चे प्रतीक आहे , आम्हाला स्वाभिमानी , समताधीष्टित भारत घड़वायचा आहे कारण तसाच भारत संविधानास अभिप्रेत आहे.
या परिसंवादात डॉ शमशुद्दीन तांबोळी , ( पुणे ) , डॉ सीमा मेश्राम (अमरावती ) , डॉ सतीष म्हस्के ( धुळे ) यांची समायोचित भाषणे झालीत .
स्वागत डॉ विजयालक्ष्मी वानखेड़े , सुरेश साबळे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा अनिल रिंडे यांनी केले , कार्यक्रमास श्रोतावर्ग मोठ्या संखेने हजर होता .

फोटो…

जयसिंग वाघ यांचे स्वागत करतांना डॉ विजयालक्ष्मी वानखेड़े मंचावर उपस्थित डॉ सीमा मेश्राम व डॉ शमशुद्दीन तांबोळी