
युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर याच्या तर्फे गोकुळ बागुल यांना अहिराणी खानदेश साहित्य संघ ,धुळे यांच्या ,सहावे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनात “ज्वारी मन ही माय” या कथासंग्रहाला “खानदेश साहित्य भूषण “पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच गुजरात राज्य पाठ्यपुस्तक मंडळात, इयत्ता चौथ्याला “अलख निरंजन” ही कविता निवड झाल्याबद्दल ,डॉ. दीपक निकम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास प्रा.अशोक पवार सर, अशोक बिराडे साहेब ,वंदना पाटील
लीलाधर पाटील सर ,गौतम मोरे ,कवी अजय भामरे ,भाऊसाहेब देशमुख, इत्यादी उपस्थित होते.
युवा कल्याण प्रतिष्ठान यांच्यातर्फे राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान अंतर्गत वक्त्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत तालुक्यातील विविध माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. आदर्श वक्ता कसा असावा, तसेच छत्रपती शिवरायांचे जीवन कार्य याविषयी डॉ.लीलाधर पाटील यांनी मार्गदर्शन केले .सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक बिराडे साहेब यांनी केले. तसेच प्रस्ताविक प्राध्यापक अशोक पवार सर यांनी केले.