• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

आपल्या हक्काच्या लढाईसाठी एकत्र येण्याची गरज…
गटशिक्षणाधिकारी
विश्वासराव पाटील
पेंशनच्या न्याय मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी पुर्ण ताकदीने उतरा..
रावसाहेब पाटील
जिल्हाध्यक्ष
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद

Mar 15, 2023

Loading

आपल्या हक्काच्या लढाईसाठी एकत्र येण्याची गरज…
गटशिक्षणाधिकारी
विश्वासराव पाटील

पेंशनच्या न्याय मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी पुर्ण ताकदीने उतरा..

रावसाहेब पाटील
जिल्हाध्यक्ष
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद

अमळनेर प्रतिनिधी-अमळनेरला तहसील कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांच्या न्याय मागणीसाठी सर्व संघटना एकत्र येऊन जुनी पेन्शनसाठी आज दुसऱ्या दिवशी कर्मचारी व महिला यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
गेल्या अनेक वर्षात कर्मचाऱ्यांना फक्त शासनाने आश्वासन दिले त्यांच्या न्याय मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात जुन्या पेन्शन योजना मागणीसाठी सर्व संघटना एकवटल्या आहेत. पेन्शनच्या संदर्भात कर्मचाऱ्यांनी मोठमोठ्या घोषणा देऊन संपूर्ण आजूबाजूचा परिसर दणदणून गेला. पेन्शन संघटनेचे नाशिक विभागाचे अध्यक्ष डॉ कुणाल पवार यांनी प्रास्ताविक करत या सरकारच्या ध्येय धोरणावर टीका करत जोपर्यंत पेन्शन मिळत नाही तोपर्यंत लढा अधिक तीव्र केला जाईल असेही त्यांनी सांगितले.. जुनी पेन्शन योजना व नवीन पेन्शन योजना यामध्ये काय फरक आहे ही त्यांनी सविस्तर सांगितले…
गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील पेन्शनच्या बेमुदत संपाला मार्गदर्शन करतांना म्हणाले की जुनी पेन्शन ही तुमची हक्काची आहे. ती कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. मी एक अधिकारी म्हणून पूर्ण संघटना आमची तुमच्या बरोबर आहे. सध्या दहावी बारावीचे पेपर चालू आहेत त्यामुळे आम्ही पूर्ण वेळ देऊ शकत नाही.दहावी व बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर आम्ही तुमच्याबरोबर उपोषणाला बसणार आहोत. काही कर्मचारी भीतीने अजूनही शाळेत जातात, त्यामुळे त्यांना चिंता करण्याची गरज नाही, पेंशनचा लढा सुरू ठेवावा व शंभर टक्के पाठींबा दयावा. त्याच्यामुळे आपल्यावर कारवाई होईल अशी कोणतीही प्रकारची किंतू परंतु मनात न बाळगता पेन्शनचा लढा तीव्र करावा असे सांगितले.
शिक्षण विस्तार अधिकारी तथा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब पाटील म्हणाले की कोणत्याही एका संघटनेने पाठिंबा काढला म्हणजे काही फरक पडत नाही .महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद व सर्व शिक्षण विस्ताराधिकारी संघटना ,गटशिक्षणाधिकारी संघटना आपल्या पेन्शनच्या सक्रिय पाठिंबा आहे. यापुढे आम्ही सर्व जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक परिषदेचे कर्मचारी व सर्व पदाधिकारी ह्या बेमुदत संपाला सक्रिय पाठिंबा राहील याबद्दल काळजी नसावी असे सांगितले.
शिक्षक भारतीचे आर जे पाटील म्हणाले की सध्याचे खोके सरकारच्या काळात पगारांवर होणारा खर्च हा 60 टक्के चुकीचा दाखवला जातो प्रत्यक्षात तो अकरा टक्के आहे. जे सरकारच चुकीच्या पद्धतीने स्थापन झाले आहे ते कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करणार?
कर्मचाऱ्यांनी सर्व संघटना एकत्र येऊन हा लढा तीव्र करावा व जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत संपात पाठिंबा देऊन सक्रिय सहभाग दाखवा असे सांगितले.
ग.स पतपेढीचे माजी संचालक वाल्मीक मराठे म्हणाले की सध्याचे सरकार कर्मचाऱ्यांच्या विरोधात अनेक प्रकारचे चुकीचे अध्यादेश काढून कर्मचारी वर्ग कंटाळलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या न्याय मागणीसाठी बेमुदत संप पुकारलेला आहे. आपल्या पेंशनच्या संपात आम्ही सदैव आपल्या बरोबर आहोत. मोठ्या भावांना पेन्शन आहे ,लहान भावांना पेन्शन मिळवल्याशिवाय आमची माघार नाही असेही त्यांनी सांगितले…
महसूल विभागाचे सुरेश पाटील यांनीही आपल्या मनोगत सांगितले की पेन्शन हा कर्मचाऱ्याचा हक्क आहे तो सरकार हिरावून घेऊ शकत नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांनी जास्तीत संख्येने उपस्थित राहून बेमुदत संप यशस्वी करावा…
समता शिक्षक परिषदेचे अमळनेर तालुका अध्यक्ष बापूराव पाटील म्हणाले की शिक्षकांना आपल्या न्याय मागणीसाठी संप करावा लागतो ही या देशाची मोठी शोकांतिका आहे. समान काम समान वेतन या धोरणाचं काय झालं ??असे प्रश्न सध्या निर्माण झालेले आहेत .त्यामुळे कर्मचाऱ्यांनी व सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन जुनी पेन्शनचा संप यशस्वी करून आपली न्याय मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत लढा तीव्र करावा अशी सांगितले.
हिंदी अध्यापक मंडळाचे तालुकाध्यक्ष आशिष शिंदे म्हणाले की कर्मचारी नोकरीला लागत असतांना पेन्शन हा त्याचा हक्क आहे. तीस वर्ष नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्याला पेन्शन नसेल पण पाच वर्ष आमदार ,खासदार मंत्री वेगवेगळ्या प्रकारचे पेन्शन मिळते हा कोणता न्याय आहे?? आमदार खासदार हे नोकर आहेत का? इथे समानतेचे तत्त्व आहे का असे सांगत त्यांनी जुनी पेन्शन चा लढा तीव्र करण्यासाठी आम्ही सदैव आपल्या बरोबर आहोत असे सांगितले.
माध्यमिक पतपेढीचे संचालक व मुख्याध्यापक तुषार पाटील म्हणाले की जुनी पेंशन ही कर्मचाऱ्यांची न्याय मागणी आहे. आज पेन्शन मागणीचा संपाच्या दुसरा दिवस आहे. सर्व कर्मचारी वर्गांनी व इतर संघटना व विविध विभागाचे सर्व कर्मचारी यांनी जोपर्यंत आपली न्याय मागणी मान्य होत नाही तोपर्यंत लढा अधिक तीव्र करावा यासाठी आमचा मुख्याध्यापक संघ सदैव आपल्या बरोबर आहे.

सामाजिक कार्यकर्ते व मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी शासनाच्या धोरणाचा धिक्कार करत कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागत नाही.कर्मचाऱ्यांच्या पेंशनच्या वेळीच आर्थिक बोजा पडतो का? आमदार व खासदार यांच्या पेंशनचा बोजा पडत नाही का?पेंशनची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवावा. व संपात पुढे कोणकोणती आंदोलनाची रूपरेषा बाबत चर्चा करण्यात आली. या संपात सर्व संघटना व कर्मचारी यांना एकाच बँनरखाली संप यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
पेंशनपिडीत शिक्षीका सविता अहिरे व प्रमिला मोरे यांनी सांगितले की पेन्शन हा आमचा हक्क आहे. शासन कधीही हिरावून घेऊ शकत नाही पेन्शन जर या सरकारने दिले नाही तर या सरकारला 2024 च्या निवडणुकीत कर्मचारी उत्तर देतील असे सांगितले.
पदवीधर संघाचे अध्यक्ष व केंद्रप्रमुख दिलीप सोनवणे म्हणाले की पेन्शन पीडित बांधवांनी व भगिनींनी संप यशस्वी करावा .कोणत्याही कारवाईची मनामध्ये भीती बाळगू नका, कोणतीही कारवाई होणार नाही. सर्व अधिकारी येथे संपाला पाठीब्यासाठी बसलेले आहेत त्यामुळे हा संप तीव्र कसा होईल यासाठी लक्ष घालावे. सर्व संघटनेचे कर्मचारी पदाधिकारी यांनी जास्तीच्या संख्येने उपस्थित राहावे असेही आवाहन केले.
यावेळी वर्कर्स संघटनेचे (एम.एस.ई.बी) पी वाय पाटील,प्रहार संघटनेचे सुधीर चौधरी, पदवीधर शिक्षक सुनील मोरे यांनी मनोगत व्यक्त केली.
जुनी पेंशन संदर्भात कर्मचाऱ्यांचा सत्ताधारी पक्षाबाबत मोठा रोष आहे.
जुनी पेंशन योजना भाजप सरकारच्या काळात बंद झाली. पण सरकार आरोप प्रत्यारोप करण्यात मग्न आहेत. येणाऱ्या निवडणुकीत जो पक्ष पेंशन देणार त्याच पक्षाच्या मागे कर्मचारी वर्ग राहणार असे बोलले जात आहे.
अमळनेरला पेंशनच्या दुसऱ्या दिवशी संपात संदीप वाघ,शिक्षणाविस्तराधिकारी पी.डी धनगर, राजेंद्र सोनवणे,के.डी.पाटील, सचीन साळुंखे, एम.ए.पाटील,महेंद्र रामेशे, ईश्वर महाजन, योगेश पाटील, अविनाश पाटील, दिलवरसिंग पाटील,प्रशांत पवार, संदीप शिसोदे,संदीप पवार, राहूल पाटील, ग्रामसेवक संघटनेचे ज्ञानेश्वर साळुंखे,
विज मंडळाचे कर्मचारी सुरेश धनगर आकाश पाटील समाधान जाधव,जयेश शिरसाट सह अनेक शिक्षक बंधू व भगिनी, आरोग्य,महसूल, आरोग्य,तलाठी, ग्रामसेवक संघटनेचे कर्मचारी उपस्थित होते.