जनतेच्या भाषेत जनतेचा आवाज होणाराच प्रतिभावंत असतो
प्रा.डॉ.केशव देशमुख
जळगांव प्रतिनिधी-सामाजिक जीवनात समाजाचा घटक म्हणून जगत असताना स्त्रियांचा, वंचितांचा, उपेक्षितांचा आवाज होऊन जनतेच्या भाषेत जनतेच्या आवाज होऊन लिहिणारा हा खरा प्रतिभावंत असून समाजातला आवाज घेऊन एक स्त्री बोलते आहे समाजाला संबोधते आहे कान उघाडणी करते आहे त्यावेळेस समाज समाजातली माणसं जागे होणे गरजेचं असतं समाजाला विचारांची पालवी फुटणं ही आजच्या काळाची गरज होऊन बसल्याचे मत ज्येष्ठ समीक्षक, तथा राज्याचे शासन व्यवहार कोश सुलभीकरण समितीचे अध्यक्ष केशव सखाराम देशमुख यांनी कवयित्री इंदिरा जाधव लिखित पालवी कविता संग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी व्यक्त केले ते पुढे म्हणाले लिखाणाचा परिवार व्यापक झाला पाहिजे धिक्कार करणारी कविता, दृष्ट प्रवृत्तीला ठोकरणारी कविता पालवी कविता संग्रहात असून समंजस विद्रोहाचा आवाज या कवितासंग्रहात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी महिलांचा आवाज हा निश्चितपणे समाजाचा भान जपणारा आणि दिशा देणारा आवाज असतो सामाजिक विषमतेच्या असणाऱ्या वातावरणात स्त्रियांना मिळणार स्थान परंपरा आणि रुढीवादी व्यवस्थेने दुय्यम ठेवलेले आहे हा रुढीवाद आणि परंपरा या मोडीत काढत स्त्रियांनी स्त्रियांचा आवाज बुलंद करण्याची वेळ आज येऊन ठेपलेली असून इंदिरा जाधव यांच्या कवितातून हा बुलंद आवाज व्यक्त झाल्याचा अनुभव निश्चितपणे नवी पालवी प्राप्त करून देईल असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी प्रा. ए.पी. चौधरी,ज्येष्ठ साहित्यिक भगवान भटकर, डॉ. मिलिंद बागुल प्राचार्य जयश्री नेमाडे, युवराज माळी मजीद झकेरिया विचार मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मिलिंद बागुल यांनी केले कवयित्री इंदिरा जाधव यांनी आपल्या पालवी कविता संग्रहा विषयी मनोगत व्यक्त केले प्राचार्य जयश्री नेमाडे, भगवान भटकर यांनी आपले विचार याप्रसंगी मांडले. याप्रसंगी किशोर नेवे लिखित दिव्य ज्योत कवितासंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रदीप सुरवाडकर यांनी तर आभार राजेंद्र पारे यांनी मानले. कार्यक्रमास विजयकुमार मौर्य, शिवचरण उज्जैनकर, शिवराम शिरसाठ, डी. डी. पाटील, बापू पानपाटील, डॉ. सत्यजित साळवे, विजय भामरे, गोविंद पाटील राहुल निकम, शिरीष चौधरी, भैय्यासाहेब देवरे व अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सागर फाळके, रवींद्र फाळके, प्रशांत फडके, हेमांगीनी फाळके, नेहा फाळके, श्रीमती प्रविणा जाधव, विद्याधर सोनवणे, माधुरी कुलकर्णी, यांनी परिश्रम घेतले.
