जिल्हाधिकारी आयुष प्रसाद शिक्षक दिनी विद्यार्थ्यांचा तास घेतात तेव्हा……
आसोदा येथील सर्वोदय एज्युकेशन सोसायटीच्या सर्व विभागातील आजी-माजी शिक्षकांच्या सत्काराप्रसंगी मा. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद कार्यक्रम स्थळी पोहोचतात आणि मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल यांना सोबत घेऊन वर्गाकडे मार्गक्रमण करतात सार्वजनिक विद्यालयातील दहावी ब च्या वर्गात प्रवेशतात आणि वर्गात सुर उमटतो,
साहेब नमस्कार आमच्या वर्गात आपले स्वागत आहे.,
मुलांनो कसे आहात….. जिल्हाधिकारी विद्यार्थ्यांशी संवाद साधतात मुलं आनंदाने उत्त्तरतात छान आहोत, उत्तरासोबतच जिल्हाधिकारी विद्यार्थ्यांना विज्ञान, इतिहास, मराठी, गणित या विषयाच्या संदर्भात बोलू लागतात इतिहासाचा प्रश्न विचारताना इतिहासातले काय शिकलात हा प्रश्न विचारतात वर्गातली सादिया पिंजारी उभी राहते आणि साहेब आता इतिहास राज्यशास्त्र विषयातील संविधानाची वाटचाल हा पाठ सुरू आहे. जिल्हाधिकारी प्रश्न विचारतात भारतीय संविधान निर्मितीच्या वेळेस काय काय घटना घडल्या याचा अभ्यास शिक्षकांनी घेतलाय का? सादिया पुन्हा उत्तर देण्यास उभी राहते, हो साहेब संविधानाच्या निर्मिती वेळेस भारतीय जनतेच्या न्याय हक्काचा विचार केला गेला आणि हळूच पुन्हा जिल्हाधिकारी विचारतात आर्टिकल एक क्या है आणि तेच संबोधतात की देशाचे नाव भारत आणि त्या भारताच्या नावाच्या संदर्भातल्या आर्टिकल आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे येथे सविस्तर विद्यार्थ्यांना सांगतात मुलांच्या सोबत प्रश्न उत्तर सुरू असतानाच आयुष प्रसाद साहेब खडू हातात घेतात आणि फळ्यावर लिहू लागतात Concentration एकाग्रता, Enjoy आनंद,Dictionary शब्द संग्रह,Rivision सतत आवृत्ती,Mind Map आपल्या ज्ञानाचे उपयोजन करणे,Answer to the Question प्रश्नांची उकल मांडणी करीत आकलन करून उत्तराच्या समीप जाणे होय जिल्हाधिकारी अतिशय एकाग्रतेने विद्यार्थ्यांना समजावून सांगत होते विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात सहा सुत्री कार्यक्रम अंगी कारल्यास जीवनात सतत यशस्वी होणार आहात असेही त्यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना सांगितले प्रज्ञा कापडणे, दक्ष कोल्हे, हेमांगी पाटील, गायत्री चौधरी, हर्षल शिंपी, सादिया पिंजारी, तेजस्विनी ढाके यांनी मा. जिल्हाधिकारी साहेब विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांच्याशी संवाद साधला विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत शाळेत आपल्या भेटीचा आनंद शिक्षक दिनी मला महत्त्वाचा वाटतो असे देखील त्यांनी याप्रसंगी मांडले इयत्ता दहावीच्या वर्ग प्रतिनिधी तेजस्विनी ढाके, मिताली भारुळे यांनी मा. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, शिक्षणाधिकारी माध्यमिक सचिन परदेशी , उपशिक्षणाधिकारी एजाज शेख यांचे वर्गात स्वागत केले याप्रसंगी संस्था अध्यक्ष विलासराव चौधरी, चेअरमन उद्धवराव पाटील सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल पर्यवेक्षक एल .जे.पाटील, शुभांगीनी महाजन, एस .के.राणेराजपूत, सचिन जंगले, मीनाक्षी कोल्हे व विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते याप्रसंगी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन परदेशी यांनी विद्यार्थ्यांचा विज्ञानाचा तास घेऊन मूलद्रव्य व त्याविषयीची माहिती देऊन विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तराद्वारे संवाद साधला.

