

काॅग्रेस जनसंवाद यात्रेला उंदड प्रतिसाद
अमळनेर: तालुक्यात भाजप सरकार विरोधात जनसंवाद यात्रा काढण्यात आली.देशात नऊ वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे सरकार असून अच्छे दिनाची सर्वसामान्य जनतेला भुरळ मोदी सरकारने घातली व जनतेचा विश्वासघात केला.
महागाईने जनसामान्यांचे कंबरडे मोडले आहे आणि भारतीय लोकशाहीच्या पूर्ण धज्जिया उडविल्या जात आहे. देशात भाजप सरकार आल्यापासून लोकशाही नसून हुकुमशाही नांदत आहे. असं जनसामान्य जनतेचं मत आहे काॅग्रेस जनसंवाद यात्रा ग्रामीण भागात दोन दिवस फिरली. प्रत्येक जिल्ह्यात ,तालुक्यात गावातील सभेत नागरिकांचे मन परिवर्तन होण्याकरिता काॅग्रेस पदाधिकारी सभा घेत आहे, सर्व स्तरातून प्रत्येक गावातील लोक मोदी सरकार विरोधात आपल्या मनातील रोष ,महागाई बद्दल मुद्दे सभेत मांडत आहेत, याच महागाईच्या त्रासामुळे समोर जाऊन मोदी सरकार सत्तेवरून पाय उतार होईल असे चित्र आज सर्वत्र देशांमध्ये निर्माण झाले आहे.
या जनसंवाद पदयात्राची सुरुवात तालुक्यातील पातोंडा येथून मा.आमदार कुणाल बाबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष बंटी पाटील, जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार व जिल्हाभरातील सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
सावखेडा गावात पहिल्या दिवशी मंदिरात सभा घेण्यात आली.सभेस शेकडो नागरिक, कार्यकर्ते उपस्थित होते.
या सभेत धुडकू पाटील म्हणाले की, मोदी सरकार जनसामान्यांना न्याय देणारं सरकार नसून हुकुमशाह सरकार आहे.व्यापारी वर्गाच्या हित जोपासणारं सरकार आहे. शेतकरी, कष्टकरी, मध्यमवर्गीय वर्गामध्ये या सरकार बद्दल रोष आहे अश्या प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्या.
जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार म्हणाले की,हे सरकार आता निवडणुका जवळ येत असल्याने गॅसचे २०० रुपयाने दर कमी करत आहे. या आधी भाजपने दुप्पटीने भाव वाढ केली आहे.आणि या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.येणा-या निवडणुकीत जर यांच्या हाती सत्ता दिली तर हे आज देशातल्या सर्व क्षेत्र विकली आहेत या नंतरच्या काळात हुकूमशाह होऊन लोकशाही नष्ट करून देशातील जनतेला गुलाम बनविल्या शिवाय राहणार नाही.अशी प्रखर टिका त्यांनी केली.
निंब गावात अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शाखेचे फलक अनावरण जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
ही जनसंवाद यात्रा ३ सप्टेंबर रोजी सावखेडा -मुंगसे-रूंधाटी-मठगव्हाण -पातोडा-नंद्री-खवशी-खेडी -अमळगाव- गांधली मार्ग अमळनेरला आली.दुस-या दिवशी दिनांक ४ सप्टेंबर रोजी धार-मालपुर-मारवड-कळमसरे-,
निम-परत अमळनेर पुढे कु-हे टाकरखेडा-म्हसले-धरणगाव कडे प्रयान झाली.
या जनसंवाद यात्रेत जिल्हाध्यक्ष माननीय बाळासाहेब प्रदीप पवार, सचिव ज्ञानेश्वर कोळी, प्रदेश उपाध्यक्ष बंटी भैया, माननीय जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब संदीप पाटील, स्वयंरोजगार सभेचे जिल्हाध्यक्ष देविदास ठाकरे साहेब, रावेरचे धनंजय चौधरी, भडगावचे युवा अध्यक्ष आशुतोष पवार, एन. एस व्ही आय जिल्हाध्यक्ष भूपेंद्र जाधव, महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, अमळनेर शहराध्यक्ष सौ. नयना कैलास पाटील, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष नानासो. डी .डी पाटील, उपाध्यक्ष,धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी बापूसो के.डी. पाटील, तालुका अध्यक्ष आबासो .गोकुळ पाटील, शहराध्यक्ष बापू मनोज पाटील, धुळे मार्केट कमिटी सदस्य योगेश पाटील ,संदीप घोरपडे सर, जयवंत आबा, भागवत गुरुजी, रोहिदास पाटील मुडी, श्रीराम आप्पा,डॉक्टर अनिल शिंदे, बी के बापू ,श्याम बापू, धनगर आण्णा, मयूर पाटील, महेश पाटील ,तुषार संदानशिव, कृषी सेल जिल्हाध्यक्ष सुभाष जिभाऊ,मार्केट कमिटीचे डायरेक्टर सुरेश पिरन पाटील, आयोजक सुनील गुलाबराव पाटील पातोंडा हे होते.याप्रसंगी
तालुक्यातील सर्व ज्येष्ठ ,श्रेष्ठ पदाधिकारी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.