• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

प्रमोद हा निसर्ग वेडा आहे- रामदास पाटील

Sep 11, 2023

Loading

प्रमोद हा निसर्ग वेडा आहे- रामदास पाटील

झाडालाही मन आहे व भावनाही आहेत- विनायक भाई वृक्षारोपणाची सुरुवात खरी महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी व सयाजी शिंदे यांनी केली – डॉ.अरुण पाटील निसर्ग संवर्धन व सौंदर्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू डॉ.प्रमोद पाटील सह्याद्री पतसंस्था व अनेक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न!
ठाणे,भिवंडी (मनिलाल शिंपी)
सह्याद्री पतसंस्था, लायन्स क्लब भिवंडी,मा.दादासाहेब दांडेकर विद्यालय भिवंडी, टिळक चौक मित्र मंडळ भिवंडी यांच्या संयुक्त विद्यमाने “श्री अंबिका योगाश्रम ” लाखिवली येथे रविवार दि.१० सप्टेंबर २०२३ रोजी भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
श्री.अंबिका योगाश्रम चे संचालक श्री विनायक भाई व किरण प्रजापती यांच्या सह मान्यवरांच्या शुभहस्ते भू-मातेचे व तुळसी चे पुजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
सदर कार्यक्रमात अनेक सेवाभावी संस्था व त्यांचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.लायन्स क्लब भिवंडी चे अध्यक्ष श्री सुधीर देशमुख, झोनल चेअरमन श्री कैलाश मराठे , माजी अध्यक्षा सौ.शितल देशमुख, उपाध्यक्षा सौ.जयश्री पाटील, पर्यावरण संवर्धन समिती सभापती डॉ.प्रमोद पाटील ,लिओ क्लबचे अध्यक्ष श्री.विवेक बुडला,
सह्याद्री पतसंस्थेचे उपाध्यक्ष डॉ.अरूण पाटील,
डॉ.सौ.कृतिका अरुण पाटील,
संचालक श्री मोहन गायकवाड, संचालिका सौ स्नेहा कारेकर,सह-सर व्यवस्थापक एड.श्री.संजय पाटील, शाखाधिकारी श्री विजय पाटील, श्री.अनंता पाटील, श्री संजय पाटील, वरिष्ठ अधिकारी श्री. जगदिश भोईर, विशेष वसुली अधिकारी श्री.केतन पुण्यार्थी,वरिष्ठ अधिकारी श्री पप्पु पाटील,वरिष्ठ अधिकारी तानाजी भोईर, मा. दादासाहेब दांडेकर विद्यालयाच्या वतीने माध्यमिकचे उपमुख्याध्यापक श्री सुरेश कुलकर्णी, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सौ.स्वाती कदम ,पुर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सौ. स्नेहा कुलकर्णी,शिक्षक वृंद,टिळक चौक मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री रामदास पाटील, श्री.भोजने, श्री.मिलिंद पळसुले यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. प्रमोद पाटील यांनी पुढाकार घेऊन अनेक संस्थांना एकत्र केले आहे त्यामुळे आज येथे मोठ्या संख्येने आपण सर्व उपस्थित झालो आहोत, खरंतर ही संकल्पना प्रमोद पाटील याचीच आहे त्यामुळे मी त्याला निसर्ग वेडा माणूस असे म्हणतो असे यावेळी रामदास पाटील यांनी सांगितले, आफ्रिकी देशा मध्ये आदिवासी वनवासी जाती जमाती ची लोक झाडे मारण्यासाठी झाडाच्या सर्व बाजूला उभे राहून झाडांना रोज शिव्या देतात, त्या शिव्या रोज ऐकून झाडे मरत होती, त्यामुळे मला तुम्हाला आज ही गोष्ट वेगल्या कारणासाठी सांगावी लागते, झाडालाही मन आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे, आणि नुसतच मन नाही आहे तर त्या झाडाला भावनाही आहेत, कारण ते झाड त्या जमातीने दिलेल्या शिव्या ऐकून आपोआप मरण पावते, वाईट काय आहे चांगले काय आहे हे सर्व झाडांना समजते, त्यामुळे ते झाड आपण जगाव की मरावं हे ठरवते, म्हणून आपण झाड लावताना ज्याप्रमाणे लहान मुलांना जसे गोंजारून हळुवारपणे उचलतो, त्या निर्मळ भावनेने झाडे लावा ती नक्कीच जगतील. मोठी होतील
असे या वेळी विनायक भाई यांनी सांगितले. महाराष्ट्रातील थोर निरूपणकार महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी,डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी, व सयाजी शिंदे या लोकांनी वृक्षरोपण लागवडीची खरी सुरुवात केली असे म्हणायला वावगं ठरू नये, कारण त्यांनी अनेक बकाल डोंगरे कव्हर करून वृक्षारोपण केले व जंगले तयार केली, आजही त्यांचे वृक्षारोपणाचे उपक्रम सुरू आहेत, अशाच प्रकारे सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्था अनेक उपक्रम राबवीत असते, सन्माननीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सहकार महर्षी श्री.विश्वास थळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे उपक्रम राबवित असतो, त्यातलाच वृक्षारोपण हा एक उपक्रम आहे, सह्याद्री पतसंस्थेबरोबर अनेक संस्थांनी अंबिका योगाश्रम लाखिवली येथे येऊन एकूण १५० झाडांची लागवड केली आहे, व या सर्व झाडांची देखभाल संगोपन व निगा राखण्यासाठी अंबिका योगा श्रमातील सर्व कर्मचारी वर्ग येथे काम पाहत आहेत,
सध्या विविध जंगलांमध्ये गोडाऊन व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे अनेक झाडांची कत्तल केली जाते मात्र सदर झाडे कापताना दोन झाडे कापली तर पाच झाडे कशी लावली जातील यासाठी उद्योजकांनी काळजी घेणे काळाची गरज आहे, आता वृक्षारोपण कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात अनेक संस्थांच्या माध्यमातून होताना दिसत आहे त्यामुळे वृक्ष संवर्धन व संगोपन झाले पाहिजे असे माझे प्रामाणिक मत आहे असे यावेळी सह्याद्री नागरी पत संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर अरुण पाटील यांनी सांगितले,सह्याद्री नागरी पतसंस्थेच्या वतीने आम्ही आर्थिक विकासाबरोबरच लोकांना शैक्षणिक जागृतीक पर्यावरण विषयक जागृती करून तलागाळातील लोकांपर्यंत आमचे ध्येय व उद्दिष्ट सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत, गेल्या २२ वर्षापासून आम्ही सह्याद्री नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून सर्व संचालक मंडळ, कर्मचारी, दैनंदिन ठेव प्रतिनिधी व हितचिंतक यांच्यामार्फत वृक्षारोपण व इतर सामाजिक कार्यक्रम राबवत आहोत, त्याचबरोबर वनराई बंधारे बांधून पाणी आडवा पाणी जिरवा ही शासनाची संकल्पना राबवण्यासाठी आम्ही शासनाला सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सहकार्य केले आहे, मागील काळात जुन्या रुढी परंपरा होत्या त्या आता नामशेष होताना दिसत आहेत, पहिले माणसं शारीरिक श्रम करायचे, आता काळानुरूप शारीरिक श्रम करण्याची माणसाची मानसिकता व सवय कमी होत चालली आहे, त्यामुळे श्रम प्रतिष्ठा वाढावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर सर्वांच्या सामाजिक परिश्रमातून पर्यावरण विषयक जागृती व्हावी यासाठी आम्ही अनेक उपक्रम राबवीत असतो, वृक्षारोपण हा जसा एक कार्यक्रम आहे, त्याचप्रमाणे वनराई बंधारे ही देखील एक शासन निर्मित योजना आहे, व या योजनेचा फायदा सर्वांना मिळावा म्हणून आम्ही शासनास सहकार्य करतो व यापुढेही करू, हे करत असताना आमचे संस्थापक अध्यक्ष सहकार महर्षी श्री. विश्वास थळे, उपाध्यक्ष डॉ. अरुण पाटील, संचालक डी.के. म्हात्रे, माजी दिवंगत अध्यक्ष स्वर्गीय हनुमान माळी,सौ. स्नेहा कारेकर,श्री. मोहन गायकवाड, सर्व संचालक मंडळ व विशेष आमचे सर्व कर्मचारी कुटुंबीय हे या कार्यक्रमात सहभागी होतात म्हणून आम्ही सह्याद्री परिवार असा शब्द प्रयोग वापरतो, या परिवाराच्या सर्व सदस्यांच्या माध्यमातून हे सामाजिक कार्य व पर्यावरण कार्य असेज अखंडित पणे सुरू राहो अशी सर्वांन प्रति कृतज्ञता व्यक्त करतो व निसर्ग संवर्धन सौंदर्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी देतो असे सह्याद्री पतसंस्थेचे पर्यावरण प्रेमी, निसर्गप्रेमी डॉ.प्रमोद पाटील यांनी यावेळी दैनिक स्वराज्य तोरण शी प्रत्यक्ष बोलताना सांगितले.
सदर वृक्षारोपण कार्यक्रमात हापूस व केशर आंबा, फणस, आवळा, कांचन,रिठा, हिरडा, चंदन, बेहडा,शिकेकाई इ.फळझाडे व औषधी वनस्पतींच्या एकूण १५० रोपांची लागवड करण्यात आली आहे.
हा पर्यावरण स्नेही प्रकल्प यशस्वी करण्यासाठी पर्यावरण संवर्धन समिती सभापती श्री प्रमोद पाटील यांना लायन्स क्लब भिवंडी चे अध्यक्ष श्री सुधीर देशमुख सौ.शितल देशमुख व पदाधिकारी,सह्याद्री पतपेढीचे अध्यक्ष श्री विश्वास थळे व अधिकारी-कर्मचारी, टिळक चौक मित्र मंडळाचे पदाधिकारी तसेच मा.दादासाहेब दांडेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक , शिक्षक व विद्यार्थी यांनी मोलाचे योगदान देऊन सहकार्य केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *