साहेबराव पाटलांनी त्याग केला नसता, व स्व उदय वाघांनी मदत केली नसती तर मी आमदार झालो नसतो
मंत्री अनिल पाटील यांची सत्कारप्रसंगी दिली कबूली
अमळनेरकरांच्या सत्काराने मी भारावलो
मंत्री अनिल पाटील यांनी नागरी सत्कारात व्यक्त केले जनतेचे ऋण..
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर करांनी मला आमदार करून मंत्रीही केले यासाठी तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीने घेतलेले परिश्रम, सहकार्य, आशीर्वाद या सगळ्या गोष्टी माझ्या पाठीशी आहेत. माझा व परिवाराचा केलेला सत्काराने मी भारावलो आहे. मी नेहमीच तालुक्याचा ऋणात होईल असे गौरव उद्गार मंत्री अनिलदादा पाटील यांनी अमळनेर तालुक्यातील बाजार समिती येथे सर्वपक्षीय सत्कार प्रसंगी त्यांनी सांगितले..
ते पुढे म्हणाले की तुम्ही सर्वांनी
जर मदत केली नसती तर माझे
राजकीय पुनर्वसन झाले नसते.
अशा भावनिक शब्दात मंत्री
अनिल पाटील यांच्या सत्कार
समारंभाचे आयोजन करण्यात
आले होते. त्या सत्काराला उत्तर
देताना अनिल पाटील बोलत होते.
पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन यावेळी व्यासपीठावर खा उन्मेष पाटील,
मंत्री अनिल पाटील यांनी अमळनेर पाटील, माजी आमदार स्मिता
जनतेचे ऋण व्यक्त करीत वाघ, जिल्हा बँकेचे चेअरमन
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी संजय पवार मार्केट सभापती नसतांना केवळ तुमच्या मुळेच सर्व अशोक पाटील, उपसभापती काही मिळत गेल या शब्दात पिरन पाटील, अर्बन बँक चेअरमन
नामदार अनिल भाईदास पाटील मोहन सातपुते जेष्ठ नेत्या सौ तिलोत्तमा पाटील, अँड ललिता यांनी आपल्या भावना व्यक्त
केल्या.
अमळनेर शहरातील सर्व
संस्था व समाजात नागरी श्याम पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, विनोदभैय्या पाटील मराठा समाजाचे अध्यक्ष सत्कार समिती स्थापन करून जयवंतराव पाटील म वा
मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, माजी सभापती श्याम अहिरे
मार्केट संचालक भोजमल पाटील मातोश्री पुष्पाबाई पाटील, सौ
जयश्री पाटील, श्रीमती राजश्री पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन संजय
पवार हजर होते.
मंत्री मंचावर आल्यानंतर सुरवातीला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन होऊन नंतर अनिल पाटील यांचा
परिवारासह मांचावरील मान्यवरांच्या हस्ते भव्य गुलाब पुष्पांचा हार
तसेच मोठा मोमेंटो व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. खासदार
पाटील यांनी छत्रपती शिवरायांची प्रतिमा देऊन माजी नगराध्यक्ष विनोद
भैय्या पाटील यांनी शिवरायांच आकर्षक पुतळा देऊन तर ऍड ललिता
पाटील व प्रा श्याम पाटील यांनी पुस्तक देऊन केला. डीवायएसपी सुनील नंदवाळकर, पोलीस निरीक्षक विजय शिंदे
यांनीही सत्कार केला. सुरवातीला प्रास्तविक सुभाष चौधरी यांनी केले.
सत्कार
सत्काराला उत्तर देताना मंत्री अनिल पाटील पुढे म्हणाले की
साहेबराव पाटलांनी त्याग केला नसता, स्व उदय वाघांनी मदत केली
नसती तर मी आमदार झालो नसतो अशी कबुली त्यांनी दिली. १४ कोटी
जनतेच्या विकासासाठी काम करणाऱ्या २९ मंत्र्यांमध्ये अमळनेरला संधी
दिल्याबद्दल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानतो असेही ते म्हणाले.
पाडळसरे धरणाच्या मातीचे सोने करेल तालुक्याच्या विकासाची ब्लु
प्रिंट तयार आहे. ज्या खुर्चीवर जनतेने बसवले त्या खुर्चीची उंची
वाढवण्याचे काम लोकप्रतिनिर्धीचे असते. ते मी चोखपणे पार पाडेल.
तालुका सुजलाम सुफलाम करण्यासाठी सिंचन वाढवणे गरजेचे आहे
त्यासाठी मतदार संघात धरणासोबत येत्या काळात ६० बंधारे झालेले
दिसतील. मतदारसंघात असलेल्या नऊ नद्यांचा परिसर ही सिंचनाखाली
आणण्याचा प्रयत्न असेल असे सांगत खुर्चीची उंची
विकासाच्या माध्यमातून वाढविण्याचा प्रयत्न असेल, पाडळसरे
धरणाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचे प्रयत्न सुरूच होते, ती मान्यता
आता अंतिम टप्प्यात असून त्यानंतर केंद्राकडून सी डब्ल्यू सी ची मान्यता
घेऊन खासदारांच्या प्रयत्नांनी केंद्राच्या योजनेत धरण बसवून मोठा
निधी प्राप्त करू अशी ग्वाही त्यांनी देत शिक्षण, रोजगार व सिंचन याकडे
अधिक लक्ष असेल असे सांगितले. आगामी काळात अमळनेरात
होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य
संमेलनास सर्वांनी मिळून मदत करावी असे आवाहन शेवटी केले. सुरुवातीला मंत्री अनिल पाटील यांची घरापासून
सजवलेल्या बैलगाडी वर मिरवणूक काढण्यात आली. सोबत २० बेलगाड्या सजवल्या बाजार
समितीच्या प्रवेशद्वारावर जेसीबी मशीनने मोठा हार घालून स्वागत करण्यात आले.
फटाकेची आतिषबाजी करण्यात आली. डीवायएसपी सुनील नंदवाळकर पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी सत्कार
केला. यावेळी खासदार उन्मेष
पाटील म्हणाले की अनिल पाटलांमध्ये प्रशासन हलवण्याची क्षमता आहे. खान्देशातील बॅकलॉग अनिल
पाटील खेचून आणतील असा विश्वास आहे.
जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार म्हणाले की अजित पवारांचा अनिल पाटलांवर विश्वास आहे. अनिल
पाटील यांना विविध क्षेत्रात कार्याचा अनुभव आहे. स्मिता वाघ म्हणाल्या की अमळनेर तालुक्याची वज्रमूठ
बांधणे आपल्या हातात आहे. सत्तेचा उपयोग करून अनिल पाटलांनी बज्रमुठ बांधावी अशी अपेक्षा व्यक्त
केली. तसेच यावेळी माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, सभापती अशोक पाटील, ऍड ललिता पाटील यांनीही
मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन जेष्ठ पत्रकार डिगंबर महाले तर आभार विनोद कदम यांनी मानले. या कार्यक्रमास प्रचंड
मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.




यांनी केला सत्कार
कृषी उत्पन्ना बाजार समिती, अर्बन बँक खाशि मंडळ, पोलीस पाटील संघटना, रेशन दुकानदार संघटना, धरण जनआंदोलन समिती, हमाल मापाडी संघटना, तालुका कोळी समाज, अमळनेर
तालुका मराठा समाज, मुस्लिम समाज, सानेगुरुजी स्मारक समिती, मराठी वाड्मय मंडळ विद्रोही साहित्य
संमेलन, ओसवाल समाज, शिंपी समाज, जिजाउ महिला मंडळ, टॅक्सी युनियन, सानेगुरुजी जेष्ठ नागरिक
मंडळ, अमळनेर महिला मंच, मंगळग्रह संस्था, आवास फाऊंडेशन, लाड शाखीय वाणी समाज, बडगुजर
समाज, जैन श्री संघ, ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवड ग्रेन मर्चंट किराणा असोसिएशन, नगरपालिका
अमळनेर, आंबेडकरी समाज, राष्ट्रीय वनस्पती अमिक संघ, जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक, साई गजानन सेवा
मंडळ, माळी समाज, राजपूत एकता मंच, यासह वावडे, कलमसरे, टाकरखेडे, सुंदरपट्टी, हेडावे, सडावन,
गांधी खेडी दहिवद बोहरा, जैतापूर, शहापूर, चोपडाई, रणाईचे खांशी, एकरखी,एकतास, धार, भिलाली, ता पारोळा, जानवे यासह इतर शहरातील मंडळांनी सत्कार केला.