विद्यार्थ्यांनी संशोधन वृत्ती विकसित करून समाजहित जोपासावे
माजी प्र-कुलगुरु डॉ. पी. पी. माहुलीकर यांचे प्रतिपादन

अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागातर्फे दिनांक २७ ऑक्टोबर रोजी ‘नावीन्यपूर्ण आणि टिकाऊ रसायनशास्त्र” या विषयावर राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली. परिषदेचे उद्घाटक म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरु डॉ. पी. पी. माहुलीकर हे होते.
या प्रसंगी म्हणाले की, “मूलगामी ठरेल अशा संशोधन विषयाची निवड करून समाजहितासाठी संशोधन करावे. राष्ट्राच्या प्रगतीला हातभार लागेल या दृष्टिकोनातून संशोधन होणे गरजेचे आहे. याकरिता महाविद्यालयात होणाऱ्या परिषदा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरतात.” असे प्रतिपादन केले.
परिषदेचे मुख्य अतिथी खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. जैन होते. राष्ट्रीय परिषदेत बीजभाषक म्हणून ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा.डॉ. संजय सेन गुप्ता (नवी दिल्ली), संसाधन व्यक्ती म्हणून वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दिलीप बडगुजर (उच्च उर्जा साहित्य संशोधन प्रयोगशाळा, पुणे), शास्त्रज्ञ डॉ. दिनेश सावंत (राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा, पुणे), प्रा. डॉ. विश्वनाथ पाटील (मुंबई विद्यापीठ, सांताक्रुज) हे उपस्थित होते.
प्रताप महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र अभ्यास मंडळावर विषयतज्ञ म्हणून नियुक्त असलेल्या सदस्यांना संसाधन व्यक्ती म्हणून निमंत्रित करून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
परिषदेच्या निमित्ताने विद्यापीठ अंतर्गत वरिष्ठ प्राध्यापकांच्या शैक्षणिक व संशोधनाच्या आधारित ‘बेस्ट रिसर्च अवॉर्ड’ देण्यात आले. यात मा. प्रा. डॉ. डी. एच. मोरे (संचालक, स्कूल ऑफ केमिकल सायन्स, क. ब. चौ. उ. म. वि. जळगाव), प्रा. डॉ. एस एस राजपूत (अधिष्ठाता, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, कबचौ उमवि जळगाव व प्राचार्य डॉ. एस. आय.राजपूत, एसपीडीएम महाविद्यालय, शिरपूर) प्रा.डॉ.आर.एस.बेंद्रे (विभाग प्रमुख, पेस्टिसाइड अँड ऍग्रो केमिकल्स व माजी व्यवस्थापन परिषद सदस्य), प्रा. डॉ. जी. एच. सोनवणे (उपप्राचार्य, किसान महाविद्यालय पारोळा व अध्यक्ष, रसायनशास्त्र अभ्यास मंडळ कबचौ उ म वि जळगाव) प्रा. डॉ. डी एस दलाल (माजी निर्देशक, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ), प्रा. डॉ. विकास गीते (विभाग प्रमुख, पॉलिमर रसायनशास्त्र) हे
होते. प्रा. डॉ. पी. पी. माहुलीकर यांना रसायनशास्त्रातील उत्कृष्ट कामगिरी निमित्त ‘रसायनशास्त्रातील उत्कृष्ट योगदान’ असे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात करण्यात आले.
रसायनशास्त्र विभागाला फार जुनी व उज्वल अशी प्राध्यापकांची परंपरा लाभलेली आहे. त्यामुळे परिषदेनिमित्त अशा सर्व माजी प्राध्यापकांचा ‘प्रतापीय गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. यात माजी प्रा. डॉ. एम.एस.पाटील, डॉ. यु.जी.देशपांडे, डॉ. एन आर शहा, डॉ. ए एम करमपुरवाला, प्रा. सुधीर पाटील, प्रा. डॉ. डी सी पाटील, प्रा. डॉ. पी.आर. शिरोडे व प्रा. डॉ. जे आर गुजराथी हे उपस्थित होते.
परिषदेस १७१ शोधनिबंधांचे सारांश व २५ शोध निबंध प्राप्त झाले होते. तसेच एकूण २५७ सदस्यांनी नाव नोंदणी केली होती व परिषदेस सुमारे २०० प्राध्यापक, संशोधक व प्रताप महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे पदव्युत्तर विद्यार्थी तसेच किसान महाविद्यालयाचे पदव्युत्तर विद्यार्थी हे देखील आवर्जून उपस्थित होते. परिषदेनिमित्त ७० विद्यार्थ्यांनी पोस्टर सादरीकरण व १८ विद्यार्थ्यांनी तोंडी सादरीकरण केले. पोस्टरचे परीक्षण हे प्रा. डॉ.आर.जी.महाले, (एस एस.व्ही.पी.एस महाविद्यालय, धुळे), डॉ. जे.यु.पाटील (यु पी महाविद्यालय, दहिवेल, साक्री), डॉ. एन एस सोनवणे (कला वाणिज्य शास्त्र महाविद्यालय, सोनगीर), डॉ. एम.जी. कासार (कला वाणिज्य शास्त्र महाविद्यालय, कुसुंबा) तसेच मौखिक परीक्षेसाठी परीक्षक म्हणून डॉ. जी.एच.सोनवणे (किसान महाविद्यालय,पारोळा) व डॉ. विकास पाटील (विद्यापीठ रसायन तंत्रज्ञान संस्था, जळगाव) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
यात पोस्टर सादरीकरणातून प्रथम बक्षीस कृष्णा जिजाबराव भिल्ल (प्रताप महाविद्यालय, अमळनेर) व द्वितीय बक्षीस जयंत प्रकाश सोनवणे (आर सी पटेल महाविद्यालय, शिरपूर) व मौखिक सादरीकरणातून प्रथम बक्षीस डॉ. योगेश बी. वाघ (स्कूल ऑफ केमिकल सायन्सेस, जळगाव) व द्वितीय पारितोषिक कु. प्रा. नहिदा कुरेशी (धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर) यांना मिळाले.
कार्यक्रमाच्या निरोप समारंभाचे अध्यक्ष प्रताप महाविद्यालयाचे कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल हे होते. कार्यक्रमाचे पाहुणे प्रा. डॉ.आर एस बेंद्रे व डॉ विकास गीते, खान्देश शिक्षण मंडळाचे सहचिटणीस डॉ. धीरज वैष्णव, उपप्राचार्य प्रा. पराग पी. पाटील,
कार्यक्रमास खानदेश शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी व उपप्राचार्य प्रा. डॉ. जी एस निकुंभ, प्रा. डॉ. व्ही बी मांटे, आयक्यूएसी व रुसा समन्वयक डॉ. मुकेश भोळे, सिनेट सदस्य प्रा. डॉ. संदीप नेरकर व प्रा. डॉ. मिलिंद ठाकरे यांनी सहकार्य केले.
प्रास्ताविक रसायनशास्त्र विभाग प्रमुख, प्रा. डॉ. निलेश पवार यांनी केले. कार्यक्रमाची रूपरेषा, परिषदेचे संयोजक, डॉ अमोल मानके यांनी मांडली. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. ए बी जैन यांनी अध्यक्षीय भाषण केले. तसेच कार्यक्रमाचे स्वागतगीत प्रा. स्नेहल सूर्यवंशी यांनी सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नितीन पाटील व प्रा. हेमलता सूर्यवंशी यांनी केले.