• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

समतेचा घास आणि स्वातंत्र्याचा श्वास हेच भारतीय संविधानाचे यश-
आनंदराज आंबेडकर

Nov 6, 2023

Loading

समतेचा घास आणि स्वातंत्र्याचा श्वास हेच भारतीय संविधानाचे यश आहे
आनंदराज आंबेडकर
विविध संस्कृती, विविध वेष, विविध भाषा अनेक राज्य, संघराज्य पद्धती स्वीकारलेला देश आज भारतीय संविधानामुळेच एक संघ असून संविधानाने बंधू भावाची भावना निर्माण केली आहे ह्या भावनेला तळा देण्याचे काम हे राज्यकर्ते करू पाहत आहेत हिंदू राष्ट्राकडे होणारी वाटचाल रोखायची असून मनुवादाला खऱ्या अर्थाने विरोध करणारा आंबेडकरवाद आहे ख्रिश्चन आणि मुस्लिम अल्पसंख्यांक माणसं येथे टार्गेट केले जात आहेत माणसा माणसात, धर्माधर्मात जाती-जातीत, पंथा पंथात विभागले जाण्यासाठी इथले राज्यकर्ते आपापसामध्ये स्पर्धा लावत आहेत अशा या परिस्थितीला थोपविण्यासाठी जनता एक होण्याची गरज असून माणसा माणसाला जवळ आणण्याचे काम संविधानाने केलेले असून या संविधानाला संरक्षित करण्याची आणि वाचवण्याची जबाबदारी असल्याचे मत संविधान बचाव यात्रेचे संयोजक, रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी जळगाव येथे आयोजित केलेल्या भारतीय संविधान बचाव यात्रेच्या सभेप्रसंगी बोलताना व्यक्त केले.ते पुढे म्हणाले माध्यमांनी राज्यकर्त्यांशी करार करून धार्मिकतेचा प्रसार करत देशाची परिस्थिती बदलविण्याचा प्रयत्न करीत करार केलेला आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षणाचे खाजगीकरण, इथल्या सरकारी असणाऱ्या उद्योगांना खाजगी मालकांच्या घशात घालण्याचे षडयंत्र पद्धतशीरपणे इथली राजसत्ता करते आहे ८० कोटी लोकांना शिधावाटप करून बडेजाव मिरवणाऱ्या सरकारला या देशात दारिद्र्य आणि लोक उपाशी आहेत हे या माध्यमातून मान्य करावयाचे असून ही स्थिती भारतीय संविधानाचा घात करणारी असून मनिपुर सारख्या परिस्थितीला, ओरिसासारख्या परिस्थितीला इथली सत्ता जबाबदार असून समतेचा घास आणि स्वातंत्र्याचा श्वास या संविधानाने आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे हे विसरता येणे अशक्य आहे आणि म्हणून तरुणांनी, स्त्रियांनी या देशाला या देशातल्या संविधानाला मानणाऱ्या साऱ्यांनी त्याच्या संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी घेण्याची गरज असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठविधीज्ञ ज्येष्ठ राजेश झाल्टे हे होते. यात्रेचे नेतृत्व करणारे रिपब्लिकन सेनेचे राज्याध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांनी याप्रसंगी भूमिका विशद केली कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी यावेळी संविधान बचाव यात्रेची संकल्पना स्पष्ट केली लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे डॉ. करीम सालार, जेष्ठ विधिज्ञ राजेश झाल्टे यांनी मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक डॉ. मिलिंद बागुल यांनी तर संचलन हरिश्चंद्र सोनवणे यांनी केले आभार विजय घोरपडे यांनी मानले विचार मंचावर भारतीय रिपब्लिकन सेनेचे युवा अध्यक्ष किशोर घोंगडे, मराठवाडा प्रदेशाध्यक्ष मिलिंद बनसोडे राम पवार , सुरेंद्र पाटील सचिन धांडे,दिलीप सपकाळे निलू इंगळे, भारती मस्के विचार मंचावर उपस्थित होते. शिवतीर्थ मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संविधान बचाव रॅलीचे स्वागत करण्यात येऊन रॅली चित्रा चौक, नेहरू चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ सभेत रूपांतरित झाली. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आनंदराज आंबेडकर साहेब व काकासाहेब खंबाळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन सभेला सुरुवात करण्यात आली. संविधान बचाव रॅली दीक्षाभूमी ते चैत्यभूमी असा प्रवास करीत असून जळगाव येथे या रॅलीचे स्वागत करण्यात येऊन बहुसंख्येने संविधान समर्थक या रॅलीत व सभेला सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *