

विद्रोहाची मशाल तेवत ठेवण्यासाठी संमेलन यशस्वी करा-मुकुंद सपकाळे
प्रस्थापित साहित्याचा आणि समाज व्यवस्थेचा संस्कृतीच्या नावावर चाललेला हैदोस थांबविण्याकरता विद्रोहाची मशाल तेवत ठेवत विद्रोही संमेलन यशस्वी करण्यासाठी पुरोगामी साहित्यिकांनी पुढे येऊन इतिहास घडवावा असे आवाहन महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी विद्रोही साहित्य संमेलनाच्या बाबतीत नियोजना संदर्भात आयोजित बैठकीच्या अध्यक्षपदावरून बोलताना व्यक्त केले याप्रसंगी लोक संघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभा शिंदे यांनी राज्यभर विद्रोही साहित्यिकांची फळी निर्माण करण्याची गरज असून प्रत्येकात समन्वय साधत या संमेलनाने एक आदर्श व्रत असा संदेश देशभर देण्याकरिता एकत्रित येत संमेलनाला व्यापक,प्रवाही आणि एकूणच परिस्थितीला दिशा देण्याचे नियोजन या निमित्ताने होण्याची गरज असल्याचे मत त्यांनी याप्रसंगी मांडले. बैठकीत विद्रोही संमेलनाच्या नियोजना संदर्भात संयोजक प्रा. लीलाधर पाटील प्रा. अशोक पवार, गौतम मोरे, रणजीत शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केल्यात डॉ. मिलिंद बागुल यांनी विद्रोही संमेलनाचा उद्देश आणि विचार हा सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी हे संमेलन यशस्वी होईल, सामान्यांचा, वंचितांचा,
गोरगरिबांचा, शेतकऱ्याचा, शेतमजुराचा, उपेक्षिताचा आवाज हे संमेलन होईल या दिशेने आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. प्रा. डॉ.सत्यजित साळवे, फहीम पटेल, राम पवार, जयसिंग वाघ यांनी जिल्हाभर संमेलनाच्या संदर्भात जनजागृती होऊन प्रस्थापित साहित्यापेक्षा विद्रोही, वंचित, उपेक्षित साहित्य हे शाश्वत असल्याची भूमिका जनतेमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न व्हावा अशा सूचना केल्यात. बैठकीचे प्रास्ताविक रणजीत शिंदे यांनी केले सूत्रसंचालन दयाराम पाटील यांनी आभार बापूराव ठाकरे यांनी मानलेत. बैठकीत बापूराव पानपाटील, विजयकुमार मौर्य,राहुल निकम,दिलीप सपकाळे,अशोक बिराडे, रिक्षा युनियनचे दिलीप सपकाळे, सोपान भवरे, मिलिंद निकम, अजिंक्य चिखलोदकर,लीना राम पवार,अमित पाटील,रमेश सोनवणे,सुखदेव तायडे, खुशाल चव्हाण, संजय सोनवणे, हर्षल पाटील, दिनकर खैरनार, अभिजीत पाटील, संदीप पाटील, अमोल कोल्हे, अविनाश तायडे, समीर जाधव, एस. एस. भवरे, लालचंद नागदेव, शैलेश शिरसाट, अमित पाटील, मीना लाखे,दिलीप अहिरे व मान्यवर उपस्थित होते.