अमळनेर मतदारसंघातील जनता नामदार अनिल पाटील यांना पुन्हा विधानसभेत पाठविणार
भविष्यात तेच खान्देशचा नावलौकिक करणार,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचे खा.पवारांना पत्र

अमळनेर-उपमुख्यमंत्री नामदार अजिदादा पाटील यांनी मंत्रिमंडळात समाविष्ट केलेले तथा खानदेशातून निवडलेले भूमिपुत्र नामदार अनिल भाईदास पाटील हे भविष्यात खानदेशचा नावलौकिक केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास अंमळनेर विधानसभा मतदारसंघातील जनतेला असून यंदा त्याच जनतेने नामदार अनिल पाटील यांना विधानसभेत पाठवले असल्याने भविष्यात देखील पुन्हा एकदा त्यांना ते विधानसभेत पाठवल्या शिवाय राहणार नाही हा आत्मविश्वास आम्हाला असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट)चे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी केला आहे.
खा. शरद पवार यांनी ना अनिल पाटील यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याला उत्तर म्हणून त्यांनी खा.पवार यांना दिलेल्या पत्रात हा खुलासा करताना पुढे म्हटले आहे की साहेब आम्हाला तुमचा आदर आहे आणि तुम्ही आमचे दैवत आहात परंतु नामदार अजितदादा पवार यांनी घेतलेला निर्णय हा महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या हितासाठीच आणि सोबतीला आलेल्या विधानसभा सदस्य, परीषद सदस्य व माजी आमदार माजी खासदार यांच्या मतदार संघातील विकास कामे व्हावे यासाठी आहे. खानदेशात म्हणजे जळगाव ,धुळे, नंदुरबार या तीन जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकुलता एक आमदार म्हणून अमळनेर विधानसभेचे भूमिपुत्र व विद्यमान मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील हे आहेत.. मग खानदेशात राष्ट्रवादी पक्षाचा एकच आमदार कसा निवडून येतो व का निवडून आला याबाबतीत सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे एकेकाळी ज्यांनी ३५ वर्ष जळगाव जिल्ह्यातील नामदार शरद रावजी पवार साहेबांवर प्रेम करणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्ते व नेते मंडळीला संपवण्याचा विडा उचलला होता एवढेच नव्हेतर कोणत्या न कोणत्या खोट्या नाट्या कारणांनी जेलमध्ये पाठवण्याचे प्रयत्न केले. आपणावर देखील कमरे खालचे आरोप केले होते आज अशाच मंडळींना आपण राजकीय ताकद देऊन त्यांचे पुनर्वसन केले आहे आणि करत आहात ही बाब खानदेशातील तसेच जळगाव जिल्ह्यातील जनता ओळखत आहे. ज्यांनी हयातीभर आपणावर म्हणजेच शरदचंद्र पवार साहेबांवर आणि पवार परिवार प्रेम केलं, पवार परिवारासाठी वाटेल ते सहन केलं अशी मंडळी आज घरी बसली आहे. आपण नामदार अनिल पाटील यांचा विचार करण्यापेक्षा हयाती पासून जे आपल्या सोबत जिल्ह्यात आहेत त्यांना राजकीय ताकद द्या त्यांचं राजकीय पुनर्वसन केले तर निश्चितच खानदेशातील समाज व खानदेशातील जनता आपले ऋण कधी विसरणार नाही.जळगाव जिल्ह्याची सत्य परिस्थिती तशी दिसून येत आहे,आतापासूनच आपल्या पक्षाचे नेते काही मतदारसंघात उमेदवारी घोषित करीत आहेत.
जळगाव ,धुळे ,नंदुरबार या तीन जिल्ह्यात थोडक्यात खानदेशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकच आमदार आहे ज्या नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हयाती भर मंत्री केले, वेगवेगळी महामंडळे दिली ,लाभाची पदे दिली अशी अनेक मंडळी पवार परिवाराला सोडून इतर पक्षात गेली आणि त्या पक्षात जाऊन त्यांना त्या पक्षाने मोठे केले अशी कितीतरी नाव घेता येतील केंद्राच्या मंत्री भारतीताई पवार, नंदुरबारचे मंत्री नामदार विजयकुमार गावित, सोलापूरचे माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी मंत्री गणेश नाईक, माजी मंत्री सचिन अहिर, माजी मंत्री दिलीपराव सोपल,माजी मंत्री राणा जगजीत सिंग पाटील, माजी मंत्री मधुकररावजी पिचड
महाराष्ट्र राज्यातील अजून काही माजी आमदार माजी खासदार यांना सर्वांना मंत्री केल्यानंतर देखील ही मंडळी खा.पवार यांना सोडून गेली याच प्रमाणे जळगाव जिल्ह्यातील काही नेते देखील भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात होते परंतु भारतीय जनता पक्षाच्या काही अटींमुळे त्यांना पक्ष प्रवेश मिळाला नाही. मात्र आपण हे विसरतो की ज्यावेळी सारेच लोक पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश करत होते त्यावेळी खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी पक्षाचा सदस्य भूमिपुत्र व विद्यमान मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यामुळेच खानदेशातून आणि तीन जिल्ह्यातून किमान अनिल पाटील हे एकटे आमदार निवडून आले ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी अभिमानाची गोष्ट आहे अन्यथा इतर जिल्ह्यांप्रमाणे खानदेश तथा जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शून्य आमदार राहिला असता हे विसरून चालणार नाही.आपण अनिलदादा पाटील विधानसभेत दिसणार नाहीत याबाबतीत आपण भाष्य केले याचे आम्हाला खूप दुःख झाले आहे साहेब. …माफ करा साहेब आपली उंची फार मोठी आहे आपली राजकीय ताकद व आपला राजकीय प्रवास इतक आमचं वय देखील नाही परंतु आपण एका अनिलदादा पाटील सारख्या लहानशा कार्यकर्त्यावर बोलायला नको होते एवढीच नम्र अपेक्षा ना.संजय मुरलीधर पवार यांनी या पत्रात व्यक्त केली आहे.