

जीवन जगण्यासाठी गीतेतील तत्त्वज्ञान उपयुक्त.. ज्येष्ठ समाजसेवक हभप डॉ रवींद्र भोळे
वळती पुणे जीवन जगत असताना यज्ञ दान तप करणे व कर्तव्य कर्मे अत्यंत आवश्यक आहे. नित्य नैमित्तिक व काम्य असे जीवनामध्ये विविध यज्ञ घडत असतात. याशिवाय देवयज्ञ पितृ यज्ञ भूत यज्ञ मनुष्यज्ञ व ब्रह्म यज्ञ यासारखे यज्ञ करणे शास्त्रामध्ये कथन केलेले आहे. निदान कलियुगामध्ये पितृ यज्ञ तरी योग्य रीतीने करावा. तसेच जीवन जगत असताना दानालाही खूप महत्त्व आहे. कृषिधदीची राजा रघु राजा हरिश्चंद्र शिबिराजा बळीराजा व कर्ण ह्या प्राचीन काळातील दानशूर विभूती होत. ह्या पात्रांचा थोडासा आदर्श घेऊन कलियुगात दानधर्म करावा. कारण सत्ययुगात ध्यानाला ,त्रेता युगात ज्ञानाला, द्वापार युगात यज्ञाला व कलियुगामध्ये दानाला अत्यंत महत्त्व आहे. भूदान, कन्यादान , गौदान, कन्यादान, अन्नदान असे दान आपल्या परिस्थितीनुसार करावे. काहीही देण्यासारखे नसेल तर घरातील जुने कपडे वस्त्रदान म्हणुन दानम्हणून द्यावे. याचा अर्थ असा की जमेल तसा दानधर्म करावा. धनसंचय आत्मक केंद्रित प्रवृत्ती वाढवते तर दानधर्मामुळे सात्विक प्रवृत्ती वाढते. जीवन जगण्यासाठी भगवंतांनी दिलेला उपदेश अत्यंत उपयुक्त आहे. जीवन जगण्यासाठी गीतेतील तत्त्वज्ञान अत्यंत उपयुक्त आहे असे मत ज्येष्ठ समाजसेवक ह भ प डॉ.रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले. वळती येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. श्री विठ्ठल भजनी मंडळ वळती, समस्त ग्रामस्थ मंडळ, उद्योजक श्री एल बी कुंजीर सरपंच वळती, सौ कुसुमताई लक्ष्मण कुंजीर माजी सरपंच वळती यांचे विशेष सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जेष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांचे प्रवचन झाले. प्रवचनामध्ये डॉ. रवींद्र भोळे पुढे म्हणाले की पृथ्वीवर जन्माला आलेल्या प्रत्येक जीवात्म्याला कधी ना कधी मरण पत्करावे लागते. भगवंत चरणी विलीन होईपर्यंत जन्ममृत्यू, सुखदुःख, भोगावे लागतात .परमात्मा स्वरूप होण्यासाठी विक्रम, अ कर्म ,सोडून निष्काम कर्मयोग करावा, सात्विक कर्मे करावी, सात्विकता जपावी. मनुष्याने जीवन कसे जगावे यासाठी गीतेतील उपदेश महत्त्वपूर्ण आहे. गेली एकोणतीस वर्षापासून ह्या परिसरात डॉ. रवींद्र भोळे प्रवचन प्रबोधनाद्वारे व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करीत आहेत . तसेच अखंड हरिनाम सप्ताहातील भाविक भक्तांना मोफत औषधोपचार करीत असतात. डॉरवींद्र भोळे हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्धजेष्ठ समाजसेवक, प्रवचनकार अपंग सेवक ,वृक्ष मित्रअसुन डॉ. रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्राच्या वतीने रुग्णांची अत्यल्प दरात सेवा करीत असतात. डॉक्टर रवींद्र भोळे यांनास्वर्गीय पद्मश्री मनीभाई देसाईजींचे मार्गदर्शन लाभलेले आहे.