
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी भीमरमाई प्रतिष्ठान तर्फे कवी संमेलनाचे आयोजन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीमरमाई प्रतिष्ठान तर्फे सहा डिसेंबर बुधवार रोजी संध्याकाळी पाच वाजता एडवोकेट बबनभाऊ बाहेती महाविद्यालय या ठिकाणी कविवर्य राजेंद्र पारे यांच्या अध्यक्षतेखाली व जळगाव शहर महापालिकेच्या आयुक्त विद्या गायकवाड, जात पडताळणी समितीचे सदस्य सचिव वाकुलकर, भीम रमाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद बागुल, प्राचार्य डॉ. अनिल लोहार यांच्या प्रमुख उपस्थितीत कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून कवी संमेलनात प्रा.डॉ प्रदीप सूरवाडकर, मंगल बी. पाटील, प्रफुल्ल पाटील,विजय लुल्हे, शिरीष चौधरी, प्रकाश पाटील,प्रा.डॉ.राहुल संदानशिव, अरुणकुमार जोशी, पुष्पा साळवे, इंदिरा जाधव, शीतल पाटील, अशोक पारधे, गोविंद देवरे, शिवराम शिरसाठ, रमजान तडवी किशोर नेवे, प्रमोद वंदना दिनकर, अरुण वांद्रे, दिलीप सपकाळे, भैय्यासाहेब देवरे, राहुल निकम, मोईन शेख, सुखदेव वाघ,विनोद अहिरे, मुश्ताक करीमी,आर.डी.कोळी, एस.पी. झाल्टे,किशोर नेवे, व अनेक मान्यवर सहभागी होणार असून उपस्थितीचे आवाहन प्रतिष्ठानचे सचिव प्रा.डॉ. सत्यजित साळवे,डी. एम.अडकमोल, विजयकुमार मौर्य, अनिल सुरडकर, बापू पानपाटील, सुनील सोनवणे,प्रा.डॉ.के.के.अहिरे, युवराज माळी,विनोद निकम,प्रकाश दाभाडे,साहेबराव बागुल यांनी केले आहे.