
श्याम माळी यांना वारकरी तत्वज्ञान विद्यापीठाकडून अध्यात्मिक जीवनगौरव पुरस्कार प्रदान!
ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) भिवंडी तालुक्यातील भाटाळे गावचे सुपुत्र, कार्यकुशल व्यक्तिमत्त्व, वेहेळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच,विशेष कार्यकारी अधिकारी, संचालक – संस्कार इंग्लिश स्कूल अंजूर , यांनी भिवंडी तालुक्यात प्रथमच संगीत शिवचरित्र धर्म कथेचे आयोजन बालयोगी मच्छिंद्रनाथ महाराज सभागृह ओवळी येथे केले होते, या शिवचरित्र कथेला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाल्यामुळे त्याची दखल घेऊन वारकरी सांप्रदाय अध्यामिक मंडळाचे खजिनदार, योगगुरू ,संतसेवक श्री.श्याम परशुराम माळी यांना वारकरी तत्वज्ञान विद्यापीठाकडून अध्यात्मिक जीवनगौरव पुरस्कार २०२३ देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.