• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

साथी गुलाब बापू व चिमण दादा यांनी आमच्या पिढीला घालून दिलेले संस्कार आम्ही समाजाच्या हितासाठी वापरतच राहणार-संदीप घोरपडे

Mar 2, 2024

Loading

साथी गुलाब बापू व चिमण दादा यांनी आमच्या पिढीला घालून दिलेले संस्कार आम्ही समाजाच्या हितासाठी वापरतच राहणार
संदीप घोरपडे
गुलाब बापू व चिमन दादा हे दोघे भाऊ म्हणजे अमळनेर तालुक्याला तत्कालीन काळातील पडलेलं एक क्रांतिकारी स्वप्न या दोघेही भावंडांनी बालपणापासून आपली शोधक वृत्ती व चिकित्सक बुद्धिमत्ता याला जोड दिली ती चौफेर वाचनाची आणि यातून घडत गेले ते साने गुरुजींच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारे सेवादल सैनिक या दोनही सैनिकांनी अमळनेर तालुक्यातीलच नव्हे तर उभ्या महाराष्ट्रातील अनेक प्रश्न धसास लावले या प्रश्नांना भिडतांना दोघांना कधीही कोणी सत्यापासून हटवू शकले नाही अनेक भ्रष्टाचारी लालची अथवा सत्तेने उन्मत्त झालेले बाहुबली यांना आपल्या निश्चयापासून दूर होऊ शकले नाही साथी गुलाब बापू गुलाब बापू ग्रामपंचायत ग्रामपंचायत लोकल बोर्ड जिल्हा परिषद व विधानसभेत अनेकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी प्रतिनिधित्व करण्याची संधी घेऊन महाराष्ट्राला परिचित झाले हाच प्रवाह चिमण दादा वाहता ठेवताना प्रतिनिधित्वापासून शेकडो मैल दूर राहिले तरीही दादांना शेतकऱ्याच्या मशागती पासून ते उत्पादन बाजारात येईपर्यंतचा प्रवास किती खडतर आहे याची जाण असल्याकारणाने दादा शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचा लाल रंगाचा बिल्ला गौरवाने मागील 45 वर्षापासून मिरवीत राहिले आणि हा मिरवण्याचा अधिकार प्राप्त करण्यासाठी चिमणराव दादा महाराष्ट्रभर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना अधिक जाणून घेण्यासाठी व शेतकऱ्यांचे संघटन भक्कम करण्यासाठी सतत फिरत राहिले हे काम करताना स्वतःच्या गावात शेतीमध्ये अनेक प्रयोग राबवितांना अज्ञानी शेतकऱ्यांच्या टीकेचे धनी देखील झाले मात्र आपल्या अभ्यासू वृत्तीने शेतकऱ्यांना भविष्यात येणाऱ्या समस्यांना चिमणराव दादा आकडेवारी सह भविष्यातील 25 वर्षे शेतकरी आत्महत्या कशा पद्धतीने करतील याचा देखील ऊहापोह करताना कधी कचरले नाहीत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून कधीही कोणत्या सरकारी कमिटीवर अथवा संघटनेच्या प्रमुख पदावर दादांनी दावा केला नाही फक्त शेती शेतकरी शेतकऱ्यांचे संघटन शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चानुसार मिळणारा हमीभाव यासाठी स्वतःला कणाकणाने झिजवत राहिले परंतु विद्वानांच्या दूरदृष्टीचा अंदाज सर्वसामान्य नागरिकांना येत नाही व त्यामुळे त्यांनी मांडलेले विविध पैलू अनेकांच्या आकलना पलीकडचे असतात परंतु यात सुदैव असे की चिमणराव दादा अनेक ठिकाणी आपले म्हणणे मांडत असताना त्याला लिखित स्वरूपात संग्रही ठेवत असत तसेच विविध वर्तमानपत्रात हे लिखाण प्रकाशित व्हावे म्हणून सतत प्रयत्नशील असत परिणामी सकाळ पेपर शेतीसाठी समर्पित पुरवणीमध्ये माननीय चिमणराव दादांचे लेख अनेकदा प्रकाशित होत व ते लेख प्रकाशित झाल्यानंतर अनेक संबंधित कृषी विद्यापीठातील संशोधक प्रयोगशील शेतकरी तसेच अनेक जाणकार मंडळी चिमणराव दादांना फोन करून प्रदीर्घ चर्चा करीत आणि या चर्चांनी चिमणराव दादा सुखावून जात गुलाबराव बापू व चिमणराव दादा यांचे एकमेकांवरील बंधुप्रेम असे होते की गुलाबराव बापूंनी चिमणराव दादांना दहिवद शाळेतील चेअरमन पदाची संधी देऊन त्यांच्या अभ्यासू वृत्तीला वाट मोकळी करून दिली होती मात्र अतिशय कडक शिस्तीतील चिमणराव दादा अभ्यासलेले तत्त्वज्ञान व प्रवाही जीवनातील घडणाऱ्या घटना यांची सांगड कधी घालू शकले नाहीत त्यामुळे दादांना अनेकदा पराभवाचा सामना देखील करावा लागला चिमणराव दादांना गुलाबराव बापूंनी चोपडा विधानसभा क्षेत्रात माननीय अरुण भाई गुजराती यांच्या विरोधात उमेदवारी करावी व दादांना विजयी करण्याची हमी स्वतः बापूंनी घेतली होती मात्र दादा या गोष्टीला राजी झाले नाहीत व स्वतः बापूंच्या विरोधात उमेदवारी करून आपल्या भावाच्या अनेक विरोधकांना खाद्य पुरविताना दिसून आले मात्र आपल्या उत्तर आयुष्यात चिमणराव दादा ही खंत मला अनेकदा बोलून दाखवीत व म्हणत मी गुलाबराव बापूचे खूप मोठे नुकसान केले मी नातू असताना देखील मित्रत्वाच्या नात्याने आमच्या अनेक विषयांवर चर्चा घडत यात विषयांची मर्यादा नसे तसेच आमच्याकडून खूप मोठ्या आशा दादा अपेक्षित असत यामध्ये उत्तम वाचन फर्डे वकृत्व सामाजिक जाणीव प्रश्नांची भिडताना लागणारे धाडस सार्वजनिक जीवनात वावरताना हवे असलेले शुद्ध चारित्र्य तसेच ज्याही संस्थांमध्ये आपण काम करू त्या संस्थांचा आब राखण्यासाठी करावयाच्या उपायोजना यासह कला साहित्य संस्कृती सध्या होऊ पाहणारे भौतिक अपेक्षांचे ओझे याचा भार न बाळगता महात्मा गांधी साने गुरुजी यांच्या विचाराने समाजाचे प्रतिनिधित्व करा तुमच्याजवळ किती कोटी रुपये आहेत असे लोक तेव्हाच विचारतात जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे जनतेचे प्रश्न जाणून घेत नाहीत आणि जेव्हा तुम्ही जनतेच्या भल्यासाठी जीवाचे रान करून सदैव झटत राहणार तेव्हा हीच जनता तुम्हालाच पदरमोड करून आपला प्रतिनिधी म्हणून तुम्हाला हव्या असलेल्या सभागृहात पोहोचविण्यासाठी इतरांनाही प्रेरित करतो आणि मग सध्या एकूणच राजकीय प्रवाहाकडे पैशाचा महापूर जो निर्माण करील तोच विचाराने तकलादू असला तरीही प्रतिनिधित्व करण्याचा विचार करतो आणि अशा काळात आम्ही जनतेकडून निधी संकलित करून जनतेचे प्रतिनिधित्व शुद्ध राजकारण निर्माण करण्यासाठी स्वीकारण्याच्या काळातच दादांचे असे अचानक निघून जाणे आमच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना खूप खूप वेदनादायी आहे मात्र तरीही दादांनी दिलेले विचार बापूंनी दिलेले धाडस त्यांच्या संस्कारांनी आम्हाला जे व्यक्तिमत्व निर्माण करता आले त्या व्यक्तीमत्वाला या दोघांच्याही प्रभावाखाली असलेल्या अनेकांची साथ लाभत राहील यात तिळमात्र शंका नाही आणि साथी गुलाब बापू व चिमणराव दादा यांच्या स्वप्नातील राजकीय सामाजिक शैक्षणिक व आर्थिक महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी अधिक काम करावे लागेल हे आम्ही आमच्या मनाला सदैव बजावत राहू
आपल्यातीलच एक
संदीप घोरपडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *