• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

जागतिक महिला दिवस निमित्त साहित्यिक गोकुळ बागूल यांनी टाकलेला प्रकाश

Mar 8, 2024

Loading

जागतिक महिला दिवस निमित्त

8 मार्च हा जागतिक महिला दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. महिलांच्या सर्वांगीन विकास ,सर्व क्षेत्रात होत असलेला सहभाग ही खरंतर आनंद देणारी घटना आहे .समाज जीवनात महिलांना महत्त्वाचे स्थान आहे. त्यासाठी सुप्रसिद्ध चित्रकार आर के लक्ष्मण याना एका महिला पत्रकाराने यांना प्रश्न केला की ,
“तुम्ही नेहमी कॉमन मॅन का दाखवतात. तुम्ही कॉमन वुमन का दाखवत नाही ?”
असा प्रश्न त्या महिला पत्रकारांने विचारला. त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. परंतु त्या भगिनीने परत तोच प्रश्न विचारला .तर त्यावेळेला त्यांनी खूप मार्मिक असं उत्तर दिलं .
“वुमन कभी कॉमन नही होती.वो स्पेशल होती है .”
तर असं महिलांचं मोठेपण एका महान व्यंगचित्रकाराने व्यक्त केलं.
आपल्या संस्कृतीमध्ये खरंच महिलांच्या स्थान खूपच महत्त्वाचे होतं. परंतु आजच्या काळात आपणास जागतिक महिला दिवस साजरा करण्यात गरज का पडली? याचा सुद्धा आपल्याला विचार करायला पाहिजे. आज खरोखरच महिलांना मुक्ती मिळाली आहे का? महिलांची शोषण कमी झाले आहे? कुटुंबातील त्यांचं स्थान खरोखरच सन्मानपूर्वक पुरुष व्यवस्थेने त्यांना दिलंय का ?राजकीय जीवनात त्यांना आरक्षण मिळाले असेल परंतु त्याचा फायदा त्यांना होत आहे का? का महिला राखीव झाल्यामुळे राजकारणी आपल्या अर्धांगिनीला संधी देतात. सत्तेची कवाडे आपल्याच घरात ठेवतात . म्हणजे म्हणतात ना
“राजकारणात जरी मोठ्या पदावर बसली बाई तरी रोज नवऱ्याला विचारते कुठे करावी सही”
अशी परिस्थिती तयार झाली. अशावेळी त्या श्री राखीव जागेचा काय फायदा होणार ?
ती खरोखरच स्वावलंबी झाली पाहिजे .तिला कुटुंबाची जबाबदारी, सत्तेतील भागीदारी तिच्या स्वतःच्या पायावर करू दिली पाहिजे .दुर्दैवाने आज असं होताना दिसत नाही. आजही स्त्रीला “तुला काय कळते?” अशाच भावनेने पाहिलं जाते.
त्याला कारण आपली मानसिकता कशी पूर्वपार पद्धतीने बनत चालली आहे की ,भलेही मंदिरांमध्ये दुर्गामाता, आंबे माता ,संतोषी माता, महाकाली माता म्हणजे मंदिरात स्त्रीला देवीचे स्थान मिळाले तरी “माऊली “म्हणून तिला आपल्या घरात आदराच्या स्थान आजही आम्हाला ग्रामीण भागात मिळालेलं दिसत नाही .
जिजाऊंनी जरी इतिहास घडवण्यासाठी छत्रपती शिवाजी राजे घडविले असले तरी आम्हाला शिवाजी हा दुसऱ्याच्या घरात घडला पाहिजे. अस प्रत्येकाला वाटेल.
परंतु आज आम्हाला आमचे घर संस्कारशील ,सुसंस्कृत होण्यासाठी घराघरात जिजाऊ घडल्या पाहिजे. असं ज्या दिवशी प्रत्येकाला वाटेल. त्या दिवशी” जागतिक महिला दिवस” साजरा करण्याची आम्हाला गरज पडणार नाही.

गोकुळ बागूल साहित्यिक
अमळनेर
मो.9422276140

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *