
डॉ. पां. रा. घोगरे विज्ञान महाविद्यालयात जागतिक चिमणी दिवस उत्साहात साजरा
प्राणिशास्त्र विभागाच्या लिओ क्लबचा उपक्रम
चिमण्यांचे संरक्षण आणि संवर्धन काळाची गरज : पक्षीमित्र आश्विन पाटील यांचे प्रतिपादन
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
जागतिक चिमणी दिवस दरवर्षी 20 मार्च रोजी जगभरात साजरा केला जातो. जागतिक चिमणी दिनाची सुरुवात 2010 मध्ये झाली. तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो.
नामशेष होत चाललेल्या चिमण्यांना वाचवणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. या दिवशी अनेक ठिकाणी शिबिरांचे आयोजन करून पक्ष्यांचे पर्यावरणातील महत्त्व समजावून सांगितले जाते. चिमण्या पक्षी हळूहळू नामशेष होत आहेत. अशा परिस्थितीत त्यांचे रक्षण करणे हा आपला धर्म आहे आणि त्याचं बरोबर मानवी हक्कही आहे त्यानुषंगाने येथील श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या कै.
कर्मवीर डॉ. पां. रा. घोगरे विज्ञान महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागाच्या लिओ क्लबच्या वतीने महाविद्यालयात २० मार्च जागतिक चिमणी दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी अमळनेर येथील पक्षीमित्र मा. श्री. अश्विन पाटील यांचे ‘चिमण्यांचे संवर्धन व संरक्षण’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रस्ताविकात विभाग प्रमुख प्रा. डि. व्ही. अहिरराव यांनी कार्यक्रमाचा
उद्देश व चिमण्याचे महत्व सांगून कार्यक्रमाची सुरुवात केली. प्रमुख वक्ते श्री. अश्विन पाटील यांनी आपल्या
भाषणात सांगितले की, चिमणी ही भारतामध्ये सर्वत्र आढळणारी पक्षी आहे. हा पक्षी हिमालयाच्या दोन हजार
मीटर उंचीपर्यंत सर्वत्र आढळतो तसेच तो म्यानमार, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश आणि कश्मीरच्या वायव्य
दिशेला ही आढळतो. हा पक्षी नेहमी माणसांच्या अवतीभोवती राहतो ह्या या पक्षाचे मुख्य अन्न धान्य व मध,शिजवलेले अन्न यासारखे पदार्थ त्याच्या आवडीचे आहेत, मुख्यता छोटे-छोटे आळ्या त्यांचे प्रमुख अन्न आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे आणि वाढत्या लोक संख्येमुळे चिमण्यांचे प्रमाण खूपच कमी झालेले आहेत कारण की वाढत्या लोकसंख्येमुळे आधुनिकरण भरपूर मोठ्या प्रमाणात होत आहेत त्यामध्ये आज काल डिजिटल युग चालू झालेले आहे त्यामध्ये प्रत्येकाला मोबाईलची आवश्यकता भासत आहे त्यामध्ये मोबाईल कंपनीचे टावर यांच्यामध्ये स्पर्धा चालू झालेली आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीचे बाजारीकरण चालू झालेले आहे त्यामध्ये
आता 4g आणि 5g तंत्रज्ञानामुळे जागोजागी high frequency tower लागले आहेत. या टावर मधून
electromagnetic range चे उत्सर्जन मोठ्या प्रमाणात होते या किरणांचा चिमणी या पक्षावर मोठ्या प्रमाणात
परिणाम होताना दिसत आहे, या इलेक्ट्रॉनिक मॅग्नेटिक रेंज च्या संपर्कात आल्यामुळे चिमण्यांचा जागीच मृत्यू
होतो असे एका संशोधनात आढळले आहे त्यामुळे शहरांमध्ये चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होताना दिसत
आहे. तसेच आधुनिक पद्धतीच्या घरबांधणी मुळे आणि बेफिकीर वृक्षतोडीमुळे चिमण्यांना घरटे बनवण्यासाठी जागाच उपलब्ध नाहीये, तसेच शहरांमध्ये अन्नाची उपलब्धता होत नसल्याने सुद्धा शहरांमध्ये चिमण्यांचे प्रमाण कमी झालेले आहे याशिवाय शहरांमधील वाढते प्रदूषण शेतामध्ये होणारा रासायनिक खतांचा वापर कीटकनाशके यांच्यामुळे सुद्धा चिमणीच्या जीवनावर परिणाम होत आहे. म्हणून चिमन्यांचे संरक्षण आणि संवर्धन काळाची गरज बनली आहे. प्रत्येकाने या छोट्याशा जिवाच्या संरक्षण व संवर्धन करण्यासाठी घरात, सभोताली कृत्रिम अधिवास तयार केला पाहिजे तसेच मातीच्या भांड्यात पाणी व अन्न उपलब्ध करून दिले पाहिजे असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
सदर उपक्रमाचे श्री. शि. वि. प्र. संस्थेचे अध्यक्ष आ. बाबासाहेब कुणालजी पाटील, उपाध्यक्ष डॉ. एस. टि. पाटील, मा. प्रफुल्लजी सिसोदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही. पाटील यांनी सदर उपक्रमाचे कौतकु केले, उप प्राचार्य प्रा. के. एम. बोरसे, प्राणिशास्त्र विभाग प्रमखु प्रा. डि. व्ही. आहीरराव यांच्या मार्गदर्शना खाली लिओ क्लब चे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रविण महाले, सचिव प्रा. डॉ. सुनिल पाटील यांनी कार्यमक्रमाचे आयोजन केले. सूत्र संचालन डॉ. गणेश नागरे यांनी केले. आभार डॉ. सुनिल पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. एम. व्ही. अमृतसागर, प्रा. आय. एस. आहीरराव, सहा. प्रा. निखिल चौधरी, सहा. प्रा. प्रतिक्षा गावित डॉ. अमोल नदंवालकर यांनी परीश्रम घेतले.