
होळी उत्सव मूळ भारतीयांचा आनंदाचा उत्सव!!!
भारतात पूर्वी खूप चांगल्या परंपरा होत्या. आर्य भारतात येण्यापूर्वी येथे सिंधू संस्कृती प्रगत संस्कृती होती. कृषी संस्कृती येथील उदयोगाचा मुख्य पाया होता. मोहनजोदोडो, हड्प्पा उत्खननात उत्तम नगरे असल्याचे पुरावे मिळाले. सुसज्ज घरे, नाविन्यपूर्ण हवेशीर घरांची रचना, विविध पध्दतीने पाणी आणण्याच्या पध्दती अशा सुंदर रचना उत्खननात आढळल्या. अशा श्रमण संस्कृती असलेल्या सण उत्सवात अनेक सण साजरे केले जात असत. पूर्वी चंद्र, सूर्य, अग्नी, वायु, जल, पृथ्वी ह्या घटकांना महाशक्ती मानत. त्यांची पुजा, अर्चा करित असत. विज्ञानाची प्रगती झालेली नव्हती. देव ही कल्पना रूढ झाली नव्हती. स्त्री व पुरुष यांची कामे असा भेद नव्हता. महिला कृषी संस्कृतीला सांभाळीत. शेतीचा शोध लाऊन विविध पिकांची पेरणी त्यांनी केल्याचे ग्रंथात पुरावे आहेत. पशुपालन हा भाग ही महिला सांभाळीत. आर्य भारतात आल्यावर त्यांनी येथील कृषी संस्कृती हल्ला केला. आर्य पशुपालन करणारी जमात होती. कृषी करणे हा त्यांचा पिंड नव्हता. निसर्गाच्या विविध घडणाऱ्या घटनांचे मानवाला कृतहल होते. त्या गोष्टीचा फायदा घेऊन आर्यांनी ग्रंथ रचना केली. त्यात येथील लोकांना राक्षस, दानव, असूर नावे दिली. मानव सर्व देशात सारखा मग भारतात दोनापेक्षा जास्त हात असलेला कसा असेल?येथील भोळे लोक कपटी नव्हते. बलाढ्य होते. हिरण्यकश्यपू हा ग्रंथांत राक्षस म्हणून लिहला गेला. तो चाणाक्ष होता. त्याने आर्यांची सत्ता लवकर प्रस्थापित होऊ दिली नाही. त्या काळात हंगाम आल्यावर धान्याची पुजा करण्याची प्रथा होती. लोक आनंदाने उत्सव साजरे करित असत. अग्निपूजा हा एक सण असायचा..त्यात झाडाने कात टाकलेल्या लाकडाची, पालापाचोळा जाळण्याची प्रथा होती. आर्यांनी मात्र हिरण्यकश्यप ला त्याच्याच लोकांमध्ये भेद तयार करून बदनाम करुन ठार केले. मानव हा सगळीकडे सारखा दिसतो पण त्यांनी नरसिंह असा वेश दाखविला. होलीका नामक राक्षसीण दाखवून तिला भक्त प्रल्हाद ला मांडीवर घेऊन जाळल्याची कथा रचली. हिरण्यकश्यप हा बलाढ्य राजा होता. त्याला समोरासमोर आर्यांना लढा देणे शक्य नव्हते म्हणून त्याच्या सैन्यात फुट पाडून त्याला नष्ट केले. मुळ येथील संस्कृती मातृसत्ताक होती. स्त्रीचा आदर केला जात होता. परंतू आर्यांनी येथील सण, उत्सवात भ्रामक कल्पना घुसवून ते अवैज्ञानिक पध्दतीने मांडले. आजही बळीराजा ला कृषी संस्कृतीचा पाईक मानला जातो. त्याने ही कृषी संस्कृती जी मानवतावादी संस्कृती आहे ती जीवंत ठेवली. तो ही हिरण्यकश्यपू चा वारसदार आहे. कालांतराने होळी हा उत्सव बौध्द परंपरेत आनंदाचा उत्सव म्हणून साजरा होत असे. त्यादिवशी खीर बनवून लोक अग्नी ला साक्षी मानून बौध्द विचार आदानप्रदान करित असत. हा कृषी संस्कृतीचा मानवतावादी सण होता. होलीका जाळणे म्हणजे स्त्रीला जाळणे होय. होलीका ही मुळ भारतीयांची वंशज आहे. स्त्रीला जाळणे अथवा सती जाणे ही पुरुषप्रधान संस्कृतीची विकृती आहे. आता पर्यंतच्या सर्व पुरातत्त्व विभागाच्या संशोधनात मानवाला 10 तोंड, चार व त्यापेक्षा जास्त हात असल्याचा पुरावा नाही. पुर्वी स्त्री व पुरुष समान काम करत असल्याचे पुरावे मिळतात. कालांतराने होळीसाठी विविध लाकडे जाळून हा सण साजरा होऊ लागला. शेतीचे कामे आटपून शेतकरी निवांत झाल्यावर अग्नीत आपल्या दुर्गुणांना जाळण्याची अध्यात्मिक परंपरा पाळु लागला. विविध संप्रदायात शरीर शुध्दीला महत्व आले. शुध्द आचरणाला महत्व दिले जाऊ लागले. अग्नी हा प्रकाशाचे प्रतिक आहे. हा सण प्रत्येक कालखंडात चालू राहिला. आपण सर्वांनी ह्या सणादिवशी होळीत होलिका ला न जाळता मनातील षढरिंपू, हिंसा, द्वेष, वृथा अभिमान, निंदा, तसेच व्यसनांची होळी केली पाहिजे. दुर्गुणांचा होळीचा उत्सव म्हणून हा सण साजरा करता येईल. भारत देश भ्रष्टाचार, अन्याय, दडपशाही, हुकूमशाही, अत्याचार, गरिबी, बेरोजगारी, खाजगीकरण, धर्मांधता, अविवेक, चमत्कार यापासून मुक्त होण्यासाठी होळीत देशाच्या विकासात आड येणाऱ्या गोष्टीचे हवन करायला पाहिजे.तरच खऱ्या अर्थाने होळी साजरी होइल..
एस.एच. भवरे
पत्रकार
9284695140