• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

सुप्रियाताई सुळे यांचा लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल

Apr 18, 2024

Loading

सुप्रियाताई सुळे यांचा लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल

(विशेष प्रतिनिधी उदय नरे)

महाराष्ट्रातीलच नव्हे तर साऱ्या देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रियाताई सुळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पवार कुटुंबातील दिग्गज या निवडणुकीत समोर समोर लढणार आहेत. अजित दादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार व शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यातील लढतीकडे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील राजकारणी व सर्व सामान्य जनतेचे लक्ष वेधले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवार म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रियाताई सुळे ‘यांनी अर्ज दाखल केला. तुतारी फुंकणारा माणूस’ या चिन्हावर सुप्रिया सुळे निवडणूक लढवित आहे. या निवडणूकीचा उमेदवारी अर्ज आज विधान भवन येथे आदरणीय पवार साहेब व त्यांच्यावर नितांत प्रेम करणारी जनता, महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या साक्षीने दाखल केला असे सांगितले आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेचे आशीर्वाद, शुभेच्छा, अतूट विश्वास आणि भरघोस पाठबळ यांच्या जोरावर मला पुन्हा या मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळेल हा विश्वास आहे. मायबाप जनतेची सेवा, महिला, शेतकरी, कष्टकरी, कामगार यांचा सन्मान आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान कायम बुलंद राखण्यासाठी मी लढत आहे. या लढतीत मायबाप जनता माझ्या सोबत राहिल याची मला खात्री आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली

‘ उमेदवारी अर्ज दाखल करताना सोबत काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख व आमदार सचिन अहिर, माजी मंत्री व आमदार विश्वजित कदम, खासदार व शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे, आमदार संग्राम थोपटे, आमदार संजय जगताप, आमदार अशोक पवार, माजी आमदार जयदेव गायकवाड, युगेंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील, दौंड तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, रामभाऊ टुले यांच्यासह महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
सातारा येथील उदयनराजे भोसले, कोकणातून नारायण राणे व मुंबईतील उत्तर पश्चिम मतदार संघातून अमोल कीर्तिकर यांच्या निवडणूक लढतीकडे साऱ्या जनतेचे लक्ष वेधले आहे. महाराष्ट्र राज्यात मे महिन्यात होणाऱ्या निवडणुकांमुळे मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता आहे असे मत दीपिका शर्मा यांनी व्यक्त केले तर आरती जैन यांच्या मते नव मतदार म्हणजेच अठरा वर्षे नुकतेच पुर्ण केलेला मतदार हा मतदान करण्यासाठी आतूर असल्याने हवामानाचा कोणताही परिणाम मतदानावर होणार नाही व भरघोस मतदान होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. मुंबई सारख्या ठिकाणी परप्रांतीय उमेदवार दिल्याने मराठी मतदार नाराज असल्याची प्रतिक्रिया शिवसेना उबाठा गट उपशाखाप्रमुख हितेंद्र राठोड यांनी व्यक्त केले. मुंबईतील उत्तर भारतीय नेते कृपाशंकर सिंग यांच्या मतदारसंघात मतदान करण्यासाठी आम्ही आमच्या गावी जाणार असे विजय द्विवेदी यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अल्पावधीतच मुंबई पदवीधर, शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीला व विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांना सामोरे जावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *