
पुस्तक म्हणजे ज्ञानाच्या मार्गाकडे झेपावणारी वाट!!!
जगात रानटी अवस्थेत मानव जगत असतांना त्याला प्रगत अवस्थेकडे जाण्यासाठी कथाकथन हे पहिले पाऊल होते. त्यानंतर शिलालेख, शिल्पकला याद्वारे ज्ञान पुढल्या पिढीपर्यंत जाण्याची सोय झाली. पपायरस झाडाच्या पानावर, झाडाच्या सालीवर त्यानंतर तांबे धातुचा शोध लागल्यावर ताम्रपटावर लिहण्याची पध्दत रुढ झाली. चीन ह्या देशात कागदाचा शोध लाऊन सुध्दा तिथे लिखाण झाले नाही..राजे, सरदार, मजकूर कापडावर पाठवित असत. सर्वात प्राचीन 'मेसेपोटेमिया मधील 'गिल्गामेशचे महाकाव्य पहिले जागतिक काव्य म्हणून मानले जाते. सुमेरियन राजा शुरुप्पक याने हे 'सुमेरियन तत्वज्ञान 'या नावाने लिखित काव्य लिहिले. राजा शुरुप्पक हा उबारा तुटू या राजाचा मुलगा होता. ह्या महाकाव्याचा प्रभाव ईलियड, ओडसी, अलेक्झांडर प्रणय साहित्य व हिब्रू बायबल यावर झाला. होमरच्या काव्यात श्रृंगारीकता दिसून येते. राजांनी इतर राजांच्या पत्नी पळविल्याचे वर्णन आहे. बळी तो कानपिळी प्रमाणे राजांची पध्दती होती. पुस्तकाच्या प्रिंटींग ला खरी चालना मिळाली ती 1436 ला जोहानेस गुटेनबर्ग जर्मन संशोधकाने अतिशय वेगाने मजकुर लिहणारी मशिन शोधुन काढली. सन 1454 ला प्रेस कामाला आली. 15 व्या शतकात प्रिंटींग करायला सुरुवात झाली. त्यापूर्वी कोणतेच पुस्तक कागदावर मुद्रण झालेले नव्हते. त्यासाठी संशोधकाने स्वत: शाई बनविली होती. वेगवेगळया देशात प्रिंटींग च्या शोधामुळे अक्षरांची क्रांती झाली.भारतात पहिले प्रिंटींग प्रेस 1556 ला सेंट पाॅल काॅलेज गोवा मध्ये फादर गैस्पर कालेजा यांनी सुरु केले. Conclusion of philosophies नावाचे पहिले पुस्तक प्रकाशित केले. मुद्रणकलेमुळे सर्वत्र पुस्तकाला चालना मिळाली. ग्रीक तत्ववेत्यांनी त्यात भर टाकली.सॉक्रेटिस, प्लेटो, अॅरिस्टाटल, अशा विद्वानाचे विचार प्रसारित झाले. भारतात प्राचीन काव्य रामायण व महाभारत मानली जात. ऋग्वेद हा पहिला भारताचा प्राचीन ग्रंथ मानला जातो. आज सर्व जगात पुस्तकांना अनन्यसाधारण महत्व आहे. आज जागतिक पुस्तक दिवस आहे. हा दिवस 23 एप्रिल 1995 मध्ये युनेस्कोने 23 ला साजरा केला. हा दिवस काॅपीराईट दिवस म्हणुनही मानला जातो. हा दिवस पुस्तक वाचन, प्रकाशन, आणि काॅपीराईट याला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा करण्यात येतो. हा दिवस साजरा करण्याची मूळसंकल्पना 'सर्व्हेंन्टेस 'प्रकाशन गृहाचे संचालक 'व्हिसेंट क्लेव्हल 'यांनी 1922 ला मांडली. स्पेन ला 7 ऑक्टोबर 1926ला साजरा केला. युनेस्कोने हा दिवस विल्यम शेक्सपियर ,व्हिसेंट क्लेव्हल व इंका ग्रासिलासो दे ला वेगा यांच्या स्मरणार्थ साजरा केला जाऊ लागला.
सन1930 राजा अल्फान्सो ने 23 एप्रिल ला साजरा करण्याची अनुमती दिली. जवळजवळ युनेस्कोने 23 एप्रिल सन 1995 पासून आंतरराष्ट्रीय पुस्तक दिन साजरा करायला सुरुवात केली. एकुण 100 देशात जागतिक पुस्तक दिवस साजरा होतो. यु.के व आयर्लंड ला मार्च च्या पहिल्या गुरुवारी साजरा करतात. भारतातही विल्यम शेक्सपियर यांच्या स्मरणार्थ जागतिक पुस्तक दिवस साजरा केला जातो. आज जगात डिजिटल क्रांती झाल्याने पुस्तके जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचले. अॅमेझाॅन वर नामांकित सर्व पुस्तके हैदोस घालीत आहे. पुस्तकांनी क्रांती घडविल्याची अनेक उदाहरणे देता येतील. गौतम बुध्द यांनी सर्व विद्वान लोकांचे मौखिक व लिखित पुस्तके वाचुन मानवकेंद्रीत नवा धम्म जगाला दिला. अनेक सिद्धांत पडताळुन पाहिले. जगाला युध्दाऐवजी ज्ञानाने, प्रेमाने, विवेकाने जिंकता येते हा आदर्श घालुन दिला..महात्मा फुले यांना थाॅमस पेन तसेच पाश्चात्य पुस्तकांनी प्रबोधनाची वाट सुकर केली. भारतातील चातुर्वर्ण्य आधारित चौकट त्यांनी मोडुन काढली. इंग्रजी शिक्षण घेतल्याने त्यांना विदेशातील विचारवंताच्या पुस्तकांनी मन व बुध्दी सुपीक केले. पुस्तकांसाठी घर बांधणारा एकमेव पुस्तकप्रेमी असेल तर ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर होत. त्यांनी दिल्ली ला ‘राजगृह ‘म्हणून सुसज्ज असे पुस्तकासाठी हवेशीर विदेशी धाटणीचे घर बांधले. त्यांना पुस्तक वाचनाचे इतक वेड होत की त्यांचे पुस्तके लंडनहुन येत असतांना जहाज बुडाल्याची बातमी कळाली तेव्हा ते फारचअस्वस्थ झाले .त्यांच्या कडे 50 हजाराच्या वर पुस्तके होती. लंडनहुन मुंबई प्रवास करतांना 64 तासाच्या प्रवासात डाॅ भिमरावांनी 8 हजार पाने वाचून काढली. राज्यघटना लिहतांना 14 दिवस स्वतःला खोलीत कोंडून अभ्यास केला. पुस्तक वाचतांना पाय त्रास देत असतांना पायाला टांगुन ठेवत असत. पुस्तकासाठी एका पावाच्या तुकडयावर अख्खा दिवस काढणारे खडतर मेहनती पुस्तकप्रेमी होते. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर म्हणत, “पुस्तक हेच माझे मित्र ” पुढे ते म्हणत “जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी आणि एक रुपयाच पुस्तक घ्या कारण भाकरी तुम्हाला जगविण्यास मदत करील आणि पुस्तक तुम्हाला कस जगाव हे शिकवेल..
विल्यम शेक्सपियर यांच्या स्मरणार्थ हा दिवस जागतिक पुस्तक दिवस म्हणून पाळला जातो. इंग्लंडमधील स्टॅटफोर्ड अॅपान अॅव्हन हे विल्यम शेक्सपियर चे मुळ गाव होते. वडिल व्यापारी होते. विल्यम शिकत असतांना वडिल वारले. त्यांना शिक्षण पूर्ण करता आले नाही. नाटकाच्या थिएटर मध्ये काम करत उदरनिर्वाह केला. नाटकाची पाटी सायकलवर शहरात प्रचार करुन दिवस काढले. अनेक नाटकाच्या संहिता पाहुन तसेच नाटकाचे पात्र करुन त्यातुन नविन सृजनशीलता बाहेर पडली. 38 नाटके लिहुन मानवाच्या सर्व गुण अवगुण याचा मिलाप नाटकात दाखविला. कवितेत सुनीत हे स्वगत प्रकार अजरामर केला. त्याला Father of drama ही पदवी मिळाली. अफलातून नाटकात प्रयोग करणारा नाटककार विल्यम शेक्सपियर होऊन गेला. ज्ञानाची भूक भागविणारे मित्र म्हणून पुस्तकांना अनन्यसाधारण महत्व आहे. पुस्तकात जीवनाला कलाटणी देण्याची ताकद आहे. शामची आई हे पुस्तक अजूनही आई व बालक यांचे संबंध किती संवेदनशील असावे याचे ज्वलंत उदाहरण आहे. कित्येक लोकांचे जीवन पुस्तकांनी उजळविले. पुस्तके ही ज्ञानाची ऊर्जास्त्रोत आहेत. जो पुस्तकात रमला त्याला एकाकीपण आठवत नाही. सकारात्मक ऊर्जेचे उगमस्थान असतात पुस्तके त्यांना जपले की ते आपल्याला आयुष्यभर जपतात. जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
पत्रकार
एस.एच. भवरे
9284695140