
नवीन शैक्षणिक धोरण धर्मनिरपेक्षता तत्वाला काळीमा फासणारे
प्रत्येक देशात अभ्यासक्रमामध्ये कालांतराने बदल केला जातो भारतामध्येही सुरुवातीला दहा वर्षांनी त्यानंतर पाच वर्षांनी अभ्यासक्रमामध्ये योग्य तो काळाची पावलं ओळखून बदल करणे अपेक्षित असते
.नवीन ज्ञानाची दालने खुली झालेली असतात जगाच्या होत असलेल्या नवनवीन शोधाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक देशाने चालणे अगत्याची आहे त्यानुसार प्रत्येक देशाने तंत्रज्ञानासोबत चालले देशाच्या प्रगतीला पोषक आहे
. भारतामध्येही अभ्यासक्रमामध्ये बदल केला जातो आता पुढे येऊ घातलेल्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजेच एनइपी या नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणात बदल होऊ घातला आहे अभ्यासक्रम तयार करताना राज्यघटनेच्या कोणत्याच मूलभूत तत्वाला बगल न देता अभ्यासक्रम लागू केला पाहिजे भारताची राज्यघटना ही धर्मनिरपेक्षता या तत्त्वाने चालते नवीन शैक्षणिक धोरणात हिंदू धर्मातील संत रामदासांचे मनाचे श्लोक श्रीमद् भागवत गीतेतील बारावा अध्याय त्याचप्रमाणे मनुस्मृतीतील काही वचने नवीन अभ्यासक्रमात घुसडून राज्यघटनेच्या तत्वाला काळीमा फासला आहे
. घटनाकारांनी विविध धर्म जाती पंथ संप्रदाय मार्ग असलेल्या या देशात कोणत्याही धर्माचे नियम वचन न मानता म्हणजेच कोणत्याच एका धर्माच्या विचारावा राज्यघटना चालणार नाही प्रत्येक धर्माला राज्यघटनेने समान न्याय दिला आहे आपल्या आवडीनुसार अनुयायी आपल्या धर्माचे पालन करू शकतो पूजा साधना आराधना करण्याचा ज्याला त्याला स्वतंत्र अधिकार आहे
. परंतु राज्यघटना राबविताना कोणत्याही धर्माचे नियम राज्यघटनेला बांधील नाही
. राज्यसत्तेवर धर्म सत्तेचा कोणताच अधिकार नाही तरीदेखील अभ्यासक्रम बनवणारे घटक मुद्दाम धर्माचे अधिष्ठान त्यात लावण्याचा कुटील डाव करीत आहेत कुण्या एका धर्माचे मंत्र वचन नियम दिल्याने इतर धर्मीयांवर तो अन्याय होईल हा जरा देखील विचार अभ्यासक्रम ठरवितांना झालेला नाही
. अकरावी बारावी ह्या अभ्यासक्रमा मध्ये भाषा ठरवितांना दोन भाषा स्वीकारला जाणार आहे त्यात इंग्रजी ह्या जागतिक भाषेला ऐच्छिक स्थान दिलेले आहे आज जगातील बहुतेक व्यवहार ज्या भाषेमुळे चालतो त्या भाषेला महत्व दिलेले नाही भविष्यात इंग्रजी कडे विद्यार्थी पाठ फिरवतील जगाचे इथंभूत ज्ञान ज्या भाषेत आहे त्या भाषेला गौण ठरविण्याचे मोठे षडयंत्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला महत्त्व देत इंग्रजी भाषेला आपल्या देशात महत्त्व दिलं कारण जगातील संपूर्ण ज्ञान या इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे
. जगातील विकसित देश इंग्रजी भाषा बोलतात इंग्रजीतून त्यांच्या व्यवहारात चालतो अशा भाषेला भारतात दुय्यम स्थान देणे योग्य नाही
. भविष्यात बहुजन मुले इंग्रजीच्या ज्ञानापासून वंचित राहतील विदेशात जाण्याचे त्यांचे दरवाजे बंद होतील जगातील लोक इंग्रजी भाषेला जगाची खिडकी मानतात ज्या खिडकीमुळे आज इंग्रजी भाषेत भारत देश बऱ्यापैकी आघाडीवर आहे डॉक्टर बाबासाहेबांनी ज्या मनुस्मृतीला जाळून विषमता पसरवणारा ग्रंथ भारतीय लोकांच्या मनातून नष्ट केला त्या ग्रंथाला पुन्हा अभ्यासक्रमात आणून विषमतेची बीजे रोवण्याचा तसेच राज्यघटने चे महत्व कमी करण्याचा प्रयत्न आहे केवळ एका धर्माची वचने अभ्यासक्रमात लावून इतर धर्मावर तो अन्याय नाही का यामुळे इतर धर्मीय या नियमाविरुद्ध आवाज उठवतील राज्यघटनेवर कोणत्याही धर्माचे वर्चस्व नसताना असे प्रयोग पुन्हा मनुस्मृती लादण्याचा हा उघड अजेंडा आहे. कलाधारित शिक्षण देण्याचा हेतू चांगला असला तरी कलाशिक्षकाला मानधन देण्याची किंवा प्रशिक्षित शिक्षक नेमण्याची कोणतेही तरतूद नाही. गावातील कला जाणकार काम सोडून फुकट शाळा किंवा काॅलेजात येणार नाही. ग्रामीण भागात पूर्ण प्रशिक्षित व्यक्ती मिळणार नाही. केवळ वाऱ्यावर वरात असण्याचे धोरण आहे. कनिष्ठ महाविद्यालयातील काही मुलांना गणित विषय आवडत नसला तरी तो घ्यावा लागेल. पूर्वी प्रमाणे कला, वाणिज्य, सायन्स हे ज्याच्या त्याच्या आवडीनुसार अभ्यासक्रम घेण्याची मुभा होती. काही वर्षाने मुले कंटाळून शिक्षण सोडतील. महात्मा फुले, शाहू महाराज, पेरीयार, सयाजीराव गायकवाड, बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचारावर पाणी फिरेल. विषमतेचा आगडोंब पुन्हा उसळेल. महागाई ने गरिबाचे शिक्षण राहिले नाही. अभ्यासाची अदयावत सुविधा नसलेला विद्यार्थी डॉक्टर कधीच होणार नाही. कारण तो कमी गुण नीट परीक्षेत पडल्यावर एक कोटीवर पैसा भरु शकणार नाही. शिक्षणाअभावी बहुजनांना कुठेही स्वाभिमानाची नोकरी मिळणार नाही. खाजगीकरणाने आरक्षण उडविले गेले आहे. अशा ह्या हुकूमशाही पध्दतीचा विरोध झाला पाहिजे. मी शिक्षण क्षेत्राशी निगडीत नाही. असा विचार इतर नोकरदाराने करणे चुकिचे आहे. एक दिवस कुऱ्हाड आपल्या मानेवरही आहे हे विसरून चालणार नाही. मनुवादी लोकांना तुम्हाला नोकरी मिळून झालेली तुमची प्रगती सहन होत नाही. ओबीसी एकत्र होऊ नये म्हणून जनगणना होऊ दिली जात नाही. आमचा ओबीसी ही मस्त झोपेचे सोंग घेऊन आहे. प्रत्यक्ष मैदानात येण्याची तयारी कुणाची नाही. ज्या महापुरुषाने मनुस्मृती फेकुन शिक्षणाची ज्योत पेटविली त्या महापुरुषाच्या अंगावर कुण्या माथेफिरुने शाई फेकली त्याच्या निषेधार्थ ओबीसी चा आवाज बाहेर आला नाही. आम्ही कुठपर्यंत सहन करणार अखेर कटोरा व झाडू हेच आपल्या कमरेला मनुवादी बांधुन मोकळे होतील. सर्व घटकावर प्रहार होत आहे. शिक्षणावरचा प्रहार नोकरी, पैसा, प्रतिष्ठा, स्वाभिमान सारच घेऊन जाईल.आपली मुले अजून 2 वर्षानी शिक्षण सोडतील. घेतलेल्या शिक्षणाने नोकरी मिळणार नाही. काही खाजगी इंग्रजी मीडियम संस्थाचालक शिक्षकाला 4/5हजार देतात. ह्या पैशात काय करिल शिक्षक...त्याला मिळणारा पगाराच्या दुप्पट मजूर किंवा शिपाई मिळवीतो. इतकी दयनीय हाल शिक्षकाचे करुन ठेवले. बाहेरील विदयापीठे येथील विदयापीठे बंद पाडतील. मुले जास्त प्रमाणात विदेशी विद्यापीठातून शिक्षण घेतील. आज आपण पाहतो नामांकित काॅलेजला मुले अॅडमिशन घेतात कारण सुटल्यावर नोकरीची हमी मिळते. मोजक्या मनुवादी लोकांकडे पूर्वी सारखी सत्ता असावी हा प्रतिगाम्यांचा मानस आहे. त्यादृष्टीने त्यांची वाटचाल आहे. घटना न बदलविता हक्क काढुन घेण्याची त्यांची निती आहे. बाकी मनुवादी घटना बदलविण्याची भाषा बोलतात. काही मनुवादी सांगतात आम्ही असतांना घटना बदलू देणार नाही. खाजगीकरण करुन त्यांनी आरक्षण रोखले. जे क्षेत्र बाकी आहेत ते हळुहळु गिळंकृत करणे चालू आहे. विशिष्ट भांडवलदारांच्या नावे कश्मीर मधील विकुन तेथिल पर्यटन त्यांच्या ताब्यात जातील. भ्रष्टाचारी, गुंड, मवाली, व्याभिचारी, देशद्रोही जोपर्यंत निवडून येइल तोपर्यंत येथील व्यवस्था लाचार राहिल.
पत्रकार
एस.एच. भवरे