
४८ मतदारसंघांमध्ये हे उमेदार झाले विजयी
महाराष्ट्रात महाविकास आघाडीने महायुतीला धूळ चारत भाजपला मोठा धक्का दिला आहे आणि अनेक मातब्बर उमेदवार भाजपचे पडल्यामुळे मोदी विश्वास कमी झाला आहे.. बारामती मतदारसंघात शरद पवारची पावर चालली.. अजित पवारने राष्ट्रवादी पक्षात वेगळी चूल मांडून राष्ट्रवादी पक्षच आपला हे जनतेला सहन झाले नाही.. जनतेने त्यांना घरचा रस्ता दाखवत एका जागेवर समाधान मानावे लागले.. शरद पवार हेच राष्ट्रवादी पक्षाचे सदासर्वे आहेत हे पुन्हा जनतेने सिद्ध करून दिले…
उद्धव ठाकरे गटाचे अनेक खासदार निवडून आल्यामुळे ठाकरेंची पावर महाराष्ट्रात चालली हे पुन्हा जनतेने सिद्ध करून दिले…
शिंदे गटाच्याही काही जागा चांगल्या मतांनी निवडून आल्या.. काही जागावर जनतेने त्यांना नाकारले. येणा-या विधानसभा निवडणुकीत त्यांना किती जागा मिळतील त्याच्याकडे त्यांचे जास्त लक्ष लागले आहे..
महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला जनतेने दिलेला मोठा कौल राहुल गांधीची विश्वासार्हता वाढल्यामुळे काँग्रेसला महाराष्ट्रात चांगल्या जागा मिळाल्या.. ए डी सी बी आय चा गैरवापर हुकूमशाही या गोष्टी महाराष्ट्रात व देशात याविरुद्ध मोठी लाट होती जनतेने मतपेटी द्वारे महा विकास आघाडीला भरभरून मत देऊन मोठ्या प्रमाणावर खासदार निवडून आणले त्यामुळे महाविकास आघाडीचा विश्वास मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला याचा फायदा होईल अशी चर्चा पदाधिकाऱ्यांमध्ये आहे..
जळगाव जिल्ह्यात भाजपचे दोन्ही खासदार स्मिताताई वाघ व रक्षा खडसे बहुमताने निवडून आले .. स्मिताताई वाघ यांच्या विषयी सहानुभूतीची लाट मोठ्या प्रमाणावर होती व त्यांनी केलेली कामे, लोकांच्या सुखदुःखामध्ये नेहमीच सहभागी याचा फायदा त्यांना निवडणुकीत झाला तर रक्षा खडसे यांना जनतेने पुन्हा खासदारकी बहाल केली.रक्षा खडसे या अत्यंत शांत संयमी पद्धतीने त्यांनी निवडणूक जिंकून दाखवली ..अनेकांनी त्यांच्यावर धुळफेक केली होती तरी त्यांनी त्याच्याकडे लक्ष न देता आपल्या प्रचारावर लक्ष दिले त्यामुळे त्यांचा विजय झाला अशी चर्चा आहे..
१) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत – ठाकरे गट
२) दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई – ठाकरे गट
३) उत्तर पश्चिम मुंबई – अमोल कीर्तीकर – ठाकरे गट
४) बुलढाणा – प्रतापराव जाधव – शिंदे गट
५) ठाणे – नरेश म्हस्के – शिंदे गट
६) कल्याण – श्रीकांत शिंदे – शिंदे गट
७) नाशिक – राजाभाऊ वाजे – ठाकरे गट
८) औरंगाबाद – संदीपान घुमरे – शिंदे गट
९) हिंगोली – नागेश पाटील – ठाकरे गट
१०) यवतमाळ – संजय देशमुख – ठाकरे गट
११) हातकणंगले – धैर्य़शील माने – शिंदे गट
१२) मावळ – श्रीरंग बारणे – शिंदे गट
१३) शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे – ठाकरे गट
१४) बारामती – सुप्रिया सुळे- शरद पवार गट
१५) शिरुर – डॉ. अमोल कोल्हे – शरद पवार गट
१६) उत्तर मुंबई – पियूष गोयल – भाजप
१७) उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड – काँग्रेस
१८) नंदुरबार – गोवाल पाडवी– काँग्रेस
१९) धुळे – डॅा. शोभा बच्छाव – काँग्रेस (आघाडी)
२०) जालना – कल्याण काळे – काँग्रेस
२१) लातूर – शिवाजीराव काळगे – काँग्रेस
२२) नांदेड – वसंत चव्हाण – काँग्रेस
२३) अकोला – अनुप धोत्रे – भाजप
२४) अमरावती – बळवंत वानखेडे – काँग्रेस
२५) नागपूर – नितीन गडकरी – भाजप
२६) भंडारा-गोंदिया –प्रशांत पडोले– काँग्रेस
२७) गडचिरोली – डॅा. नामदेव किरसान – काँग्रेस
२८) चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर – काँग्रेस
२९) पुणे – मुरलीधर मोहोळ – भाजप
३०) सोलापूर – प्रणिती शिंदे – काँग्रेस
३१) भिवंडी – बाळामामा म्हात्रे – शरद पवार गट
३२) दिंडोरी – भास्करराव भगरे – शरद पवार गट
३३) रावेर – रक्षा खडसे – भाजप
३४) बीड – बजरंग सोनवणे(शरद पवार गट)
३५) वर्धा – अमर काळे– शरद पवार गट
३६) माढा – धैर्यशील पाटील – शरद पवार गट
३७) सातारा – उद्यनराजे भोसले – भाजप
३८) अहमदनगर – निलेश लंके – शरद पवार गट
३९) मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील – ठाकरे गट
४०) पालघर – डॉ. हिमंत सावरा – भाजप
४१) सिंधुदुर्ग – नारायण राणे – भाजप
४२) जळगाव – स्मिता वाघ – भाजप
४३) सांगली – विशाल पाटील – अपक्ष
४४) रायगड – सुनील तटकरे– अजित पवार
४५) धाराशिव – ओमराजे निंबाळकर – ठाकरे
४६) परभणी – संजय जाधव – ठाकरे
४७) रामटेक – श्यामकुमार बर्वे – काँग्रेस
४८) कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती – काँग्रेस
