
महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनची धुळ्यात विभागीय बैठक संपन्न
महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन शिक्षक संघटनेची काल धुळे येथील हिंदी राष्ट्रभाषा भवन धुळे येथे राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय बैठक संपन्न झाली. या बैठकीला धुळे जळगाव नंदुरबार नाशिक व अहमदनगर या पाचही जिल्ह्यातून मोठ्या संख्येने संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
संघटनेच्या संस्थापक राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांनी आगामी नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून पक्षा देशाचा आदर करत माघार घेतल्यानंतर संघटनेची पुढील दिशा ठरवण्यासाठी व त्याचप्रमाणे आगामी शिक्षक मतदार संघाबाबत दिशा ठरवण्यासाठीही महत्त्वाची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष शुभांगी ताई पाटील या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून शिंदे भाऊसाहेब नगर येथील प्राध्यापक पांडुरंग देशमुख मालेगाव येथील लियाकत सर खलाणे सर हे मंचावर उपस्थित होते
यावेळी विभागातून आलेल्या अनेक शिक्षकांनी शुभांगी ताई यांच्या कार्याचा लेखाजोखा मांडत त्यांनी उमेदवारी करणे आवश्यक होते या संदर्भात आपले मत व्यक्त केले परंतु पक्ष्यादेशाचा मान राखत त्यांनी उमेदवारी मागे घेतल्याबद्दल त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.त्याचबरोबर शुभांगी ताईंचे कौतुक देखील केले. या बैठकीत संघटनेची पुढील दिशा पुढील वाटचाल ,त्याचबरोबर संघटना बांधणी या बाबत पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती यावेळी देण्यात आल्या.
त्याचबरोबर सदर तातडीच्या बैठकीत आगामी नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेची ताकद कोणाच्या पाठीमागे उभे करावी याबाबत चर्चा झाली. महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेचे राज्यभरात सुमारे 30,000/- पदाधिकारी असून नाशिक विभागातही संघटनेची फार मोठी ताकद आहे व ही ताकद सदैव शुभांगी ताई पाटील यांच्या पाठीशी उभी राहते. परंतु शुभांगी ताई पाटील यांनी निवडणुकीतून माघारी घेतल्यानंतर आता संघटनेची ही नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातील निर्णायक ताकद कोणाच्या पाठी उभी करावी याबाबत विचार विनिमय करण्यात आला.
त्याचबरोबर शिक्षक मतदार संघासाठी उमेदवारी करत असलेल्या उमेदवारांचे पाठिंबा मागणी बाबत आलेल्या लेखी अर्जां बाबत चर्चा करण्यात आली. या चर्चेअंती जो उमेदवार शिक्षकांची प्रमुख मागणी म्हणजे शिक्षकांना जुनी पेन्शन व 100% वेतन अनुदान मिळवून देण्याची हमी देईल अश्या उमेदवाराला दिनांक 12 जून माघारीच्या तारखेनंतर याबाबत संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी पुन्हा एकदा चर्चा करून याबाबतीत संघटनेचे कार्याध्यक्ष प्रा जसपाल सिंह जी सिसोदिया सर यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीद्वारे याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सर्वानुमते ठरले.
यावेळी अहमदनगर जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष स्वरूपा ताई देशमुख, अविनाश घोरपडे सर, शेळके सर, पांडुरंग देशमुख सर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातून लियाकत सर, नदीम सर, कुरेशी सर ,खान सर, ग्रामिन जिल्हाध्यक्ष संभाजी राजपूत , राहुल जाधव संतोष निकम आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच जळगाव जिल्ह्यातून जील्ह्यध्यक्ष राजेश जाधव सर ,डी आर पाटील सर ,विजयानंद शिंदे, दिनेश साळुंखे, संदीप पाटील, भोईटे मॅडम, भूषण पगारे, महाजन सर व असंख्य पदाधिकारी उपस्थित होते . तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून नितीन धनगर सर, रत्ना पवार मॅडम ,विजय पाटील सर ,वसीम अन्सारीसर , बेग सर, शेख सर ,सोनवणे सर, खलाणे सर, मोहन अहिरे सर ,अक्षय पाटील सर, देसले सर ,खैरनार सर ,यांच्यासह संघटनेचे दीडशे ते दोनशे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा प्रदीप चव्हाण यांनी केले. तर आभार प्रदर्शन ऍड विवेक सूर्यवंशी यांनी केले.