• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

मानाचा पुरस्कार सरकारने दिल्याने माझे बळ वाढले-शशिकांत हिंगोणेकर

Jun 18, 2024

Loading

मानाचा पुरस्कार सरकारने दिल्याने माझे बळ वाढले-शशिकांत हिंगोणेकर

अमळनेर प्रतिनिधी : गेल्या ४० वर्षांपासून मी कवितेच्या प्रांतात आहे. मी कविता नुसती लिहित नाही, ती जगतो. त्यामुळे माझे जगणे आणि लिहणे हे एकच आहे. जगण्याचे प्रतिबिंब माझ्या कवितेत उतरत असते. त्याची दखल घेत केडावसूत यांच्या नावाचा अत्यंत मानाचा पुरस्कार सरकारने दिल्याने माझे बळ आणखी वाढले आहे, अशी भावना कवी शशिकांत हिंगोणेकर यांनी गुरुवारी येथे व्यक्त केली.
उत्कृष्ट वाडूमय निर्मितीसाठी राज्य सरकारच्या वतीने यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार दिले जातात. या अंतर्गत यंदा राज्यातील सुमारे 35 लेखक कवींना वेगवेगळ्व्या लेखकांच्या नावांचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यात हिंगोणेकर यांना कवी केशवसुत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्यासह मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिन भूषण गगराणी, महाराष्ट्र राज्य विश्वकोठडा निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबळेकर, स्वायत्त मराठी विद्यापीठाचे विश्वस्त श्याम जोशी, उषा हिंगोणेकर उपस्थित होत्या. हा सोहळा मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने मुंबईत बुधवारी (ता. २७) झाला एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
हिंगोणेकर यांच्या ऋतुपर्व या काव्यसंग्रहाबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली होती. या काव्यसंग्रहाबद्दल ते
म्हणाले, “हा काव्यसंग्रह २०१७ मध्ये प्रकाशित झाला. जवळपास ८५ कवितांचा त्यात समावेश केला आहे. खरं हा नुसता काव्यसंग्रह नाही. ही जीवनानूभवाची मालिका आहे. माझ्या सभोवतालचे जे अस्वस्थ करणारे वातावरण आहे, ते या संग्रहाच्या पानापानांत वाचायला मिळेल. वास्तविक, हे माझे अनुभव आहेत; पण वाचकांना ते आपले वाटत आहेत. यात कवीचे खरे यश असते.”असे त्यांनी सांगितले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *