विठ्ठलाची वारी भाविकांना घडवून आणणारा भडण्याचा पांडुरंग ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील माजी सरपंच व धुळे जिल्हा माळी समाजाचे जिल्हाध्यक्ष व वारकरी संप्रदायाचे तालुका अध्यक्ष भडणे येथील विविध कार्यकारी सोसायटीचे व दूध उत्पादक संघाचे मा चेअरमन पद भुषवुन राजकारणात सोबत समाजकार्यात व धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे भडण्याचे पांडुरंग माळी हे दहा वर्षे पूर्वी एका लग्न समारंभातुन पती व पत्नी हे दोघेजण घरी परत येत असताना अ महामार्गावर एका जीव घेणा अपघातातून वाचल्याने पती व पत्नी दोघेजण तब्बल दवाखान्यात तीन महिने आयुशुमध्ये ऍडमिट असताना विठ्ठलाच्या भक्ती मार्गामुळे वाचल्याने जीवदान मिळाले त्या दिवसापासून उर्वरित आयुष्य त्यांनी धार्मिक कार्यासाठी झोकुन दिले आहे परिसरात भागवत कीर्तन सत्ताह तसेच धार्मिक कार्यात ते नेहमी मी अग्रेसर असतात आतापर्यंत त्यांनी गावातील शंभर लोकांना चारधाम यात्रा घडवून आणली असून दरवर्षी ते चाळीस वर्षापासून भडणे ते पंढरपूर नियमित वारी चालू असून दरवर्षी गावातील प्रत्येक समाजातील गरीब कष्टकरी शेतमजूर अबाल वृद्ध पुरुष महिला यांना सोबत घेऊन भडणे येथील दरवर्षी 50 प्रवाशांना पंढरीची वारी व विठ्ठलाचे दर्शन घडवून आणण्यासाठी ते नेहमी गावातील लोकांना आपल्या सोबत घेऊन जातात 40 वर्षांपासून व कोरोना काळात व आपली आई मृत्यूच्या दारात असताना त्यांनी वारी बंद पडू दिली नाही व विठ्ठलाचे दर्शन घेऊन परत आल्यावर आजही आई पाच वर्षापासून जिवंत आहे म्हणून आजही ते सांगतात शक्ती व ऊर्जा आहे तोपर्यंत विठ्ठलाची वारी बंद पडू देणार नाही भक्तांना विठ्ठलाचे दर्शन घडवून आणणारे पांडुरंग म्हणावे एवढे मात्र निश्चित
चौकट,,,
जोपर्यंत शरीरात शक्ती व ऊर्जा आहे तो पर्यंत विठ्ठलाची. वारी चालू ठेवीन विठ्ठलाचे दर्शन घेत नाही तोपर्यंत मला समाधान वाटत नाही आषाढी वारीला विठ्ठलाचे दर्शन घेऊनच माघारी घरी परतो
ह भ प पांडुरंग माळी भडणे ता, शिंदखेडा