अमळनेर शहरात 49 महाराष्ट्र बटालियन एनसीसी आणि खान्देश रक्षक फाउंडेशन अमळनेर यांच्या तर्फे कारगिल विजय दिवस साजरा
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर शहरात 49 महाराष्ट्र बटालियन एनसीसी आणि खान्देश रक्षक फाउंडेशन अमळनेर यांच्या तर्फे कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला, यानिमित्ताने शहरात ३०१ फुटाचा भव्य तिरंगा रॅली काढून देशभक्तीचे वातावरण तयार करण्यात आले या रॅलीचे सुरवात छत्रपती शिवाजी पुतळ्यास 49 एन सी सी चे कंमाडींग ऑफीसर पिनाकी बनिक यांच्या हस्ते मालार्पन करुन देश भक्तीच्या घोषणा देत रॅली शहरातील मुख्य रस्त्यावरून स्टेशन रोड सुभाष चौक डगडी दरवाजा मार्गे तिरंगा चौकात अमर जवान स्मारकावर कारगिल युद्धात शहीद जवानांना कमांडीग ऑफीसर पिनाकी बनिक व खान्देश रक्षक फाउंडेशन चे अध्यक्ष विजय सुर्यवंशी व उपस्थित जवानांच्या हस्ते पुष्पांजली वाहुन सामुहिक राष्ट्रगित चे गायन करण्यात आले त्यांनतर रॅलीचे बस स्टॉप मार्गे वापस सूरवातीच्या ठीकानी समापन करण्यात आले या रॅलीत NCC चे जी एस हायस्कूल, प्रताप काॅलेज , NT मुंंदडा ग्लोबल वीव्ह स्कुल साने गुरजी स्कुल, NCC विद्यार्थ्यांच्या सोबत शिक्षक वृंद व NCC चे सुबेदार सतीष कुमार तिवारी, बीएचएम विरेन्द्र, हवलदार प्रविण म्हसदे, सुनिल सोनार यांनी उपस्थित तसेच खान्देश रक्षक फाउंडेशन चे अध्यक्ष विजय सूर्यवंशी,धनराज पाटील,विलास महाले रामकृष्ण पाटील, शशिकांत वाघ,ईश्वर चौधरी,प्रवीण पाटील विनोद पाटील बोदरे सर,शांताराम पाटील, सुधीर पाटील,स्वप्नील शिरसाट, सचिन पाटील,भूषण डी. पाटील यांंच्या सह आजी माजी सैनिक उपस्थित होते,शेवटी विजय सुर्यवंशी यांनी कारगिल विजय या तिरंगा परेड मध्ये उपस्थित सर्व रक्षकांचे खूप खूप आभार व्यक्त केले.