जळगांव जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेस पक्षाचे धरणे आंदोलन
केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरण व सातत्याने शेतकऱ्यांच्या मागण्या नाकारत त्यांच्यावर केलेल्या अन्याया विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्रभर जिल्ह्याच्या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे त्याचाच भाग म्हणून जळगांव जिल्हा काँग्रेस व शेतकरी काँग्रेस आघाडीच्या वतीने काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या उपाध्यक्ष व जिल्ह्याच्या प्रभारी प्रतिभाताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जळगांव जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली व जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. असे असतांना शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही. शिवाय पिक विम्याची रक्कम दिली नाही. केंद्र सरकारने अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला असून राज्य शासनाने जर शेतीमालाला हमीभाव व संपूर्ण कर्जमुक्ती यावर योग्य निर्णय घेतले नाहीत तर ऑगस्ट महिन्यात आम्ही तीव्र आंदोलन उभारणार आहोत असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात प्रामुख्याने
• सर्व नियमित व थकबाकीदार शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करा.
• अतिवृष्टी, अवकाळी पाऊसामुळे बाधीत शेतकऱ्यांचे अनुदान त्वरित वाटप करा
• सतत होणाऱ्या अतिवृष्टी मुळे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा
• महात्मा फुले कर्ज माफितील उर्वरित शेतकऱ्यांना 50 हजार रु. अनुदान द्या.
• सर्व शेतमजुरांचा अपघात विमा काढून त्याच्या कुटुंबाची काळजी घ्या.
ई. मागण्या करण्यात आल्या आहेत.
याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभाताई शिंदे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते मदनभाऊ जाधव, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव विनोद कोडाडकर शहर जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष श्यामभाऊ तायडे, माजी जिल्हाध्यक्ष राजू दादा पाटील, विभागीय इंटक अध्यक्ष भगतिसिंग पाटील, काँग्रेस चे जेष्ठ नेते अनिल शिंदे,अविनाशभाऊ भालेराव, धनगर अण्णा पाटील, प्रताप आबा पाटील जळगाव जिल्हा किसान कॉंग्रेस अध्यक्ष सुरेश पाटील व कार्याध्यक्ष सुभाष पाटील यांच्यासह शेतकरी बंधू व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झालेत