अमळनेरकरांना महिला नेतृत्वाविषयी सहानुभूती?
स्मिता वाघ यांच्या नंतर तिलोत्तमा पाटलांच्या पाठी उभी राहणार जनता?
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेरचे राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. अनेक राजकीय घडामोडींनी गती घेतल्याचे दिसून येत आहे, आणि त्यामुळे चर्चेचे वारे जोरात वाहत आहेत. राजकीय जाणकारांच्या मते, अपक्ष उमेदवारीची घोषणा केलेले माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यावर दबाव आणून त्यांना विधान परिषदेचा शब्द दिला जाऊ शकतो, तर मंत्री अनिल भाईदास पाटील महायुतीत अमळनेरची जागा मूळची भाजपाची असल्याने त्या पक्षाच्या तिकिटावरून लढवण्याची शक्यता आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत अमळनेरच्या जनतेने स्मिता वाघ यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत महिला नेतृत्वाला सहानुभूती दर्शविली होती. स्मिता वाघ या त्यांच्या पक्षाच्या एकनिष्ठ चेहरा म्हणून ओळखल्या जातात. त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीतही अमळनेरकर महिला नेतृत्वालाच पाठिंबा देऊ शकतात, अशी चर्चा सध्या रंगली आहे.
तिलोत्तमा पाटील या देखील त्यांच्या पक्षाशी एकनिष्ठ राहिलेला चेहरा आहेत. त्यांची प्रामाणिकता, मनमिळाऊ स्वभाव आणि विश्वासू नेतृत्व ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. जर Sharad Pawar यांची अधिकृत पाठिंबा मिळाला, तर सौ पाटील यांची उमेदवारी मजबूत होईल.
या समीकरणामुळे, अमळनेरची जनता एकाच वेळी महिला खासदार तसेच महिला आमदार देऊन एक नवा आदर्श निर्माण करतील, यात शंका नाही. यामुळे महिला सक्षमीकरणाचे एक नवे पर्व सुरु होईल आणि समाजातील सर्व स्तरावर महिलांचा आवाज अधिक प्रभावीपणे ऐकू येईल.