पर्युषण पर्व जीवनात शुध्द आचरण व क्षमा करण्याचे पर्व!!
आपल्या देशात अनेक धर्म विकसित झाले. अनेक नवनविन मते मांडणारे संप्रदाय निर्माण झाले. मानवी मनात विविध विचार रुंजी घालतात. ह्या वेगवेगळया विचाराचे मतप्रवाह भारतात पहावयास मिळतात. इ.स.पूर्व 8 व्या शतकात असाच एक प्रवाह निर्माण झाला. मूर्तिपूजा, यज्ञाच्या नावाने लुटणारे निर्माण झाले. त्यावेळेस जैन धर्माची निर्मिती झाली. जेव्हा संप्रदायात अंधाधुंदी वाढली. चमत्कारावर आधारीत विचार भ्रमात पाडू लागले त्यावेळेस जैन प्रवाह ॠषभदेव याच्या निमित्ताने पहिले तीर्थंकर म्हणून जैन विचार समाजात रुजवितात. अहिंसेवर आधारीत शुध्द आचरणावर आधारीत प्रवाह सुरु झाले. जैन धर्माची स्थापना महावीर जैन यांनी केली. पुरोहिताची, धर्मांध शक्ती हिंसेचा वापर करु लागली. त्यावेळेस अहिंसेचा विचार पुढे आला. जैन धर्मात एकुण 24 तीर्थंकर झाले. सर्वच तीर्थंकरांनी कठोर नियम, उपवास, व्रत करुन शुध्द आचरण करणारा विनयता, क्षमा, दया याचा प्रत्यक्ष जीवनात प्रतिस्थापना करणारा प्राणी मात्रावर प्रेम, दया करणारा धर्म निर्माण झाला. ह्या धर्माचे 10 दिवसाचे पर्युषण पर्व दरवर्षी साजरे केले जाते. पर्युषण म्हणजे जवळ रहाणे होय. जैन धर्मानुसार पर्युषण पर्वात विनय, क्षमा, प्रेम, दया, संयम, शुचिर्भूत जीवन जगण्याचे आचरण करण्याचे पर्व होय. वर्षात एक दिवस असा मानलेला असतो त्या दिवसापासून पर्युषण पर्व सुरु होते. त्या दिवसाला संवत्सर म्हणतात. दहाव्या दिवशी उपवास ठेऊन ह्या दिवसाची श्वेतांबर जैन हे पर्व भाद्रपद महिन्यात साजरे करतात. डिगंबर जैन हे पर्व अश्विन महिन्यात साजरे करतात. जैन धर्माने उपासनेत सुरुवातीपासून स्त्री पुरूष समानतेला महत्व दिले. जैन धर्मात महिलासुध्दा दिक्षा घेऊन अध्यात्मिक उन्नती साधतात. पुरुष सांसारिक मोहमाया पासून लांब राहून कठोर नियम पाळून उपासना करतात. साध्वी व मुनी ब्रह्मचर्य पाळत जैन समाजाला अध्यात्मिक मार्गदर्शन करतात. चमचमीत, मिष्टान्न, कांदा, लसूण हे तामसी आहार नाकारतात. सकाळी जेवण केल्यावर संध्याकाळी जेवण करित नाही. निसर्गातील वस्तूचा वापर करतात. पाणी सुध्दा निर्जंतुक करुन कोमट पितात. आपली वाणी, काया, मन याच्याने सुध्दा कुणाला दुखवू नये हा नियम ते पाळतात. हवेतून सुक्ष्म जीव शरिरात जाऊ नये यासाठी सफेद कापड तोंडाला वापरतात. कित्येक दिवस मौनसुध्दा पाळतात. उपवास एक दिवस ते सहा महिने असा साध्वी व मुनी, आचार्य करतात. सदगुणावर आधारीत जीवन जगतात. शील संपन्न जीवन जगतात. जैन समाज पर्युषण पर्व आनंदाने साजरे करतो. दिवाळी, दसरा असतो त्याप्रमाणे हे पर्व जैन लोक मानतात. श्र्वेतांबर जैन लोकांचे हे पर्व आहेत. बऱ्याच शहरात, गावात त्यांची मंदिरे आहेत. त्या ठिकाणी वर्षातून काही साध्वी व आचार्य येतात. समाज बांधवाना प्रवचन देऊन धर्माची दिक्षा देतात. वयाने लहान युवती सुध्दा संसारावर तुळशीपत्र ठेवुन धर्माचे काम करतात. जगात शांती नांदावी हा जैन धर्माचा उद्देश आहे. जैन धर्मातील व्यक्ती आपले मंदिर, उत्सव समाजातील लोकांच्या दानावर साजरा करतात. स्वतःच ते दान देतात. साध्वी, आचार्य, मुनी यांना सेवा देतात. सेवाभाव निर्माण करणारा हा धर्म आहे. हिंदू पध्दती व जैन आराधना यात फरक आहे. मूर्तीपुजा ह्या गोष्टीला स्थान कमी परंतु आचरणाला खूपच महत्व आहे. जैन संवत्सर दिनाच्या व पर्युषण पर्वाच्या जैन समाजाला ह्या पर्वाच्या हार्दीक शुभेच्छा!!
मा.एस. एच. भवरे
मराठी लाईव्ह विशेष प्रतिनिधी