निलिमा मिश्रा यांचे महिला सबलीकरण साठी उल्लेखनीय कार्य
अमळनेर प्रतिनिधी :- पंकज पाटील
अमळनेर :- जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील बहादरपूर हे अतिशय छोटे खेडे गाव आहे.
मात्र, जगाच्या नकाशात स्थान मिळालेले आणि जागतिक कीर्तीचे गाव ठरले आहे. येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती नीलिमा ताई मिश्रा यांनी भगिनी निवेदिता या सेवाभावी संस्थेची स्थापना केली .
ग्रामीण भागातील तळा- गाळातील अशिक्षित , गरीब, निराधार, मजुरी करणार्या महिलांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून आत्मनिर्भर बनवून सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली. त्यांना आर्थिक विवंचना असताना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. बचत गट च्या माध्यमातून शेकडो महिलांचा आर्थिक विकास साधण्यासाठी खूप परिश्रमपूर्वक यश मिळवले. आसपासच्या किमान 1000 हजार महिलांसाठी रोजगार, उद्योग उभा केला. कापड दुकानातील टाकाऊ कपड्याच्या तुकड्या पासून सुंदर गोधडी उद्योग सुरू केला. मागणी जास्ती झाल्याने ग्रामीण महिलांसाठी कर्ज काढून शिलाई मशीन उपलब्ध करून दिल्या. महिलांसाठी त्यांच्या घरात उर्वरित वेळ साधून कपडे, गोधडी असे तयार करून त्याची भारत आणि भारत बाहेर विदेशात गोधडी ला बाजारपेठ मिळवली. याच बरोबर गावत लघु उद्योग सुरू करून घरगुती वापराच्या वस्तू, पापड, खाद्य पदार्थ, लोणच, मसाला , हातमाग उद्योग याचे देखील महिलांसाठी प्रशिक्षण सुरू करून उद्योग सुरू करून मोठे समाज कार्य केले. शेकडो महिलांना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बसविण्यासाठी त्यांनी ग्रामीण भागात फार मोठे कार्य केलेले आहे.
याच कार्यासाठी त्यांना दोन वेळा जागतिक दर्जाचा” रेमन म्यागसेसे” पुरस्काराने सन्मानित करून गौरविण्यात आले आहे. अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयातील इतिहास संशोधिका कु. उत्कर्षां कुलकर्णी आणि संजीवनी पाटील यांनी नवीन शैक्षणिक धोरण (NEP) च्या अभ्यासक्रमातील संशोधन प्रकल्प दरम्यान सर्वेक्षण केले. इतिहास विभाग आणि संशोधन केंद्र प्रमुख डॉ धनंजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सर्वेक्षण, भेटी, मुलाखती, प्रश्नावली प्रत्यक्ष निरीक्षण तंत्र सहाय्याने आणि सामाजिक संशोधन करून या संस्थेच्या विकासाबाबत माहिती घेतली. अनेक मान्यवरांच्या मुलाखत घेतल्या आणि संस्थेच्या विकासात्मक कार्याचा अभ्यास केला. हजारोंच्या संख्येत आर्थिक उत्पन्नाचे साधन म्हणजे ही संस्था आहे. ही संस्था आणि तिचे कार्य महिलांच्या कल्याणासाठी एक आदर्श ठरलेला आहे. ही संस्था अनेक अडचणी आणि आर्थिक विवंचनेत असतानाही आणि स्वता आजारपणात असतानाही श्रीमंती नीलिमा मिश्रा ताई यां संस्थेच्या हितासाठी सदैव कार्य करताना दिसून येत आहेत. शासन एकीकडे लाडकी बहीण योजना सुरू करीत असताना अशा महिलांच्या साठी कार्य करणाऱ्या संस्थेच्या पुनरुत्थान साठी कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थाना उत्तम आर्थिक सहाय्य करून, कर्ज पुरवठा करून आत्मनिर्भर भारतीय महिला निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य केले गेले पाहिजे. लघु उद्योगातून ग्रामीण अर्थ व्यवस्था मजबूत करून स्वताची बाजारपेठ निर्माण करणार्या या सेवाभावी संस्थेची वाटचाल पुन्हा सुरू होण्यासाठी गावकर्यांनी देखील प्रयत्न केले पाहिजे.