पाटील परिवाराचा आदर्श तालुक्यातील केंद्र शाळांनी घ्यावा -डॉ.किशोर पाटील
स्व.अशोक पाटील यांच्या स्मरणार्थ राहनाळ केंद्रातील शिक्षकांचा आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार देऊन सन्मान!
भिवंडी:कल्याण (मनिलाल शिंपी) भिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्र शाळा वळपाडा च्या वतीने दरवर्षी केंद्रातील निवडक शिक्षकांना स्वर्गीय अशोक बळीराम पाटील (मु.कैलास नगर वळपाडा)यांच्या स्मरणार्थ केंद्रातील शिक्षण परिषद या कार्यक्रमात केंद्र स्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. जिल्हा परिषद शाळा ओवळी येथे शिक्षण परिषद पुष्प पाचवे या कार्यक्रमात राहनाळ केंद्रातील खालील शिक्षकांना केंद्रस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 2024 मान्यवरांच्या शुभहस्ते देऊन गौरवण्यात आले.. त्यामध्ये
श्री .बाबासाहेब हरिभाऊ राऊत
जिल्हा परिषद शाळा कारीवली,
सौ .पौर्णिमा पुंडलिक सावंत
जिल्हा परिषद शाळा कारीवली,
सौ. विनया विलास घुगरे
जिल्हा परिषद शाळा वळपाडा,
सौ .विद्या दिलीप बाविस्कर
जिल्हा परिषद शाळा अंजुर फाटा,
सौ .सायली सुहास महाबळेश्वरकर
जिल्हा परिषद शाळा डुंगे,
सौ. संध्या प्रकाश जगताप
जिल्हा परिषद शाळा राहनाळ,
सौ .चित्रा वासुदेव पाटील
जिल्हा परिषद शाळा राहनाळ,
८) सौ.सविता सचिन नागावेकर
जिल्हा परिषद शाळा कालवार,
९) सौ प्रगती पंढरीनाथ पाटील
जिल्हा परिषद शाळा कालवार यांचा समावेश आहे.
सदर शिक्षण परिषद कार्यक्रम दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री. किशोर बळीराम पाटील व आंतरराष्ट्रीय खेळाडू श्री.प्रितेश अशोक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. शिक्षण परिषद पुष्प पाचवे केंद्र संम्मेलन कार्यक्रम श्री.शरद बाबुलाल जाधव
केंद्र प्रमुख(राहनाळ) यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला.याच कार्यक्रमाचे औचित्य साधून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 1 ठाणे जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर क्रमांक
मिळविलेल्या जिल्हा परिषद शाळा राहनाळ व जिल्हा परिषद शाळा कालवार येथील शिक्षकांचा सन्मान केंद्राच्या वतीने करण्यात आला.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून
जिल्हा परिषद शाळा राहनाळचे मुख्याध्यापक श्री.अजय लिंबाजी पाटील,जिल्हा परिषद शाळा वळपाडा च्या मुख्याध्यापिका सौ.विनया विलास घुगरे,
जिल्हा परिषद शाळा अंजुरफाटाच्या मुख्याध्यापिका सौ.विद्या दिलीप बाविस्कर,जिल्हा परिषद शाळा
कालवार च्या मुख्याध्यापिका सौ.अनिला आकाश काबाडी,
जिल्हा परिषद शाळा कारीवली च्या मुख्याध्यापिका सौ.अल्पना नितीन देशपांडे,जिल्हा परिषद शाळा डुंगे च्या मुख्याध्यापिका सौ.सायली सुहास महाबळेश्वरकर ,जिल्हा परिषद शाळा ओवळी च्या मुख्याध्यापिका सौ.पुष्पा परशराम थोरात,जिल्हा परिषद शाळा ठाकराचा पाडा च्या मुख्याध्यापिका मनाली मोहन कानकेकर,जिल्हा परिषद शाळा वडघर चे मुख्याध्यापक श्री.निलेश श्रीधर झगडे उपस्थित होते.
आई वडिलां नंतर शिक्षक हेच खरे विद्यार्थ्यांचे गुरू असतात.गुरू शिवाय जीवनात ज्ञान नाही.गुरू हे विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्याचे काम करतात. त्याचमुळे आम्ही स्वर्गीय अशोक बळीराम पाटील यांच्या स्मरणार्थ आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार त्यांच्या पत्नी डॉ.सुनंदा अशोक पाटील व सुपुत्र आंतरराष्ट्रीय खेळाडू श्री.प्रितेश अशोक पाटील यांनी गेल्या तीन वर्षापासून सुरू केले आहे. जेणेकरून शिक्षकांना पुरस्कारामुळे उत्साह, आत्मविश्वास व नवीन चेतना मिळते. त्याचप्रमाणे आम्ही आरएसपी च्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना कोणतेही वाहन चालवत असताना वाहतुकीचे नियम काय आहेत याबाबत मार्गदर्शन करून वाहतूक नियमांचे पालन का करावे याविषयी माहिती देत असतो. ज्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच वाहतुकीच्या नियमांची माहिती मिळेल. व अपघाताचे प्रमाण कमी होतील हाच या मागचा उद्देश आहे.असे सांगून भिवंडी तालुक्यातील इतर केंद्रांमध्ये देखील आमच्या पाटील कुटुंबीयांचा आदर्श घेतल्यास प्रत्येक केंद्रातील शिक्षकांना आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार केंद्राकडून मिळवता येईल. व हा पुरस्कार देखील मोठ्या पुरस्कारांच्या प्रमाणेच आहे, कारण पुरस्कारांमध्ये लहान मोठा असा काही भेदभाव नसतो. कोणताही पुरस्कार असो तो पुरस्कार त्या शिक्षकांच्या अंगी असलेल्या कलागुणांचा गौरव आहे असे म्हणायला वावगे ठरू नये. असे मार्गदर्शन करताना संपादक डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील यांनी सांगितले.
सर्वप्रथम आम्ही पाटील कुटुंबियांचे आमच्या राहणाळ केंद्राच्या वतीने मनःपूर्वक आभार मानतो.कारण त्यांनी आपल्या शिक्षकांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण होण्यासाठी या आदर्श शिक्षक गौरव पुरस्काराचे आयोजन केले आहे. तसेच गेल्या 30 वर्षापासून संपादक किशोर पाटील साहेब हे आपल्या शिक्षकांच्या पाठीशी उभे राहून आपणा सर्वांना सहकार्य करत असतात. आपली कोणतीही बातमी असली तरी ते त्या बातम्यांना लगेच प्रसिद्ध देत असतात. मात्र कधीही आपल्या विरोधात त्यांनी अजून पर्यंत बातमी दिली नाही.म्हणून आपल्या राहणाळ केंद्राच्या वतीने त्यांचा आज आपण विशेष सन्मान करून कृतज्ञता व्यक्त करत आहोत. यापुढेही ते नेहमीच आपल्या पाठीशी उभे राहतील अशी आशा व्यक्त करतो असे अध्यक्षीय
मनोगत व्यक्त करताना केंद्रप्रमुख श्री.शरद जाधव यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री.अशोक पंडीत बेडसे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती विशाखा विकास घाग यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका सौ.पुष्पा परशराम थोरात,मुख्याध्यापिका सौ.विजया विलास घुगरे सहशिक्षक श्री.अशोक पंडीत बेडसे ,व श्रीमती विशाखा विकास घाग यांनी केले होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.