कळमसरेची तृप्ती वर्मा राज्यस्तरीय ‘मणिकर्णिका’ पुरस्काराने सन्मानित.
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
:- आई-वडीलांचे संस्कार,कुंटूंबाचे पाठबळ,अंगी जिद्द,कठोर परिश्रमाची कास धरली तर शून्यातून विश्व निर्मितीचे स्वप्न साकारता येते याचा प्रत्त्यय कळमसरेची नात तृप्ती ऊर्फ मोना वर्मा हिला मिळालेल्या राज्यस्तरीय ‘मणिकर्णिका लिडींग ऊद्योजक पुरस्कार-२०२४’ ने कळमसरेकरांना आला. ही चित्तरकथा आहे अवघी दहावी ऊत्तीर्ण तृप्ती वर्मा हिची.तृप्ती ही कळमसरे येथील ब्रिटीशकालीन बागायतदार कृषि पुरस्कार प्राप्त कै.रामदेव केसरीमल वर्मा यांची नात असून,औरंगाबाद हायकोर्ट वकील अॅड.भरतकुमार वर्मा यांची पुतणी आहे.वडील कै.ईश्वरलाल वर्मा व योगशिक्षिका विद्या वर्मा यांची द्वितिय कन्या आहे. समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे सन १९९९ साली वयाच्या अठराव्या वर्षी तृप्ती हिचे लग्न झाले.कुटूंबाची परिस्थिती जेमतेम तशातच बाळ जन्माला आले.इच्छा असूनही मी शिक्षण घेऊ शकली नाही पण मुलाला मात्र खुप शिकविणार अशी मनात गाठ बांधुन तृप्तीने आईचा बॅग बनविण्याचा वसा घेतला.अमरावती शहरात हळूहळू तृप्तीची बॅग चांगलीच प्रसिद्धीला आली.लेडीज पर्स,प्रवाशी बॅग,शबनम,घरात कपडे ठेवायची बॅग,महिला हॅंड बॅग,विद्यार्थी दप्तर बॅग अशा मागणीप्रमाणे बॅग बनवून चांगलेच मार्केटींग मिळु लागले.कमीतकमी ऊत्पादन खर्च व मालाची गुणवत्ता यामुळे तृप्तीचा व्यवसाय आॅन लाईन आॅर्डर्स द्वारे संपुर्ण राज्यभर व्यापला. मुलाला खुप शिकविण्याची तिची इच्छाही पुर्ण झाली,मुलगा शिष्यवृत्तीतून थेट अमेरिकेत ऊच्च शिक्षणासाठी गेला.तृप्तीने सन २०२२ मध्ये आपला ऊद्योग पुणे येथे सुरु केला.व्यवसाय,कुटूंबाची सांगड घालून समाजसेवेतही तिने वाहून घेतले.मात्र लवकर वैवाहीक जीवनात शिरल्याने शिक्षणाची तिची खंत तिला सतावू लागली.पुणे येथे स्थायिक झाल्यावर तृप्तीने तब्बल २८ वर्षाचा मोठा खंडनंतर बारावीची परीक्षा ऊत्तीर्ण झाली.त्याही पुढे जाऊन ती आता पदवी मिळविणेसाठी तयारी करीत आहे.बॅगांचा व्यवसाय आता खुप प्रगतीपथावर आल्याने,राज्याबाहेरही आॅनलाईन व्यवसाyयाने झेप घेतली आहे. तृप्तीच्या अशा धाडशी कर्तृत्वाची राज्यस्तरीय महिला ऊद्योजकांच्या सन्मानासाठी कार्य करणार्रया राज्यस्तरीय ‘मणिकर्णिका लिडींग ऊद्योजक संस्थेने दखल जेतली असून,यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे तिला पुरस्काराने नुकतेच गौरविणेत आले आहे.तिच्या अशा सन्मानाने कळमसरे गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.