*प्रतापच्या तिघांची जिल्हा न्यायालयात लिपिक पदावर निवड*
———————————————
● करिअर कौन्सिलिंग सेंटरच्या
उपक्रमाचा मिळाला लाभ
● रायगड,अमरावती,मुंबई न्यायालयात
कनिष्ठ लिपिक म्हणून निवड
● अद्यायवत ग्रंथाचा उपयोग
———————————————-
अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय अमळनेरच्या अंतर्गत करिअर कौन्सिलिंग सेंटरच्या तीन विद्यार्थ्यांची महाराष्ट्रातील विविध जिल्हा न्यायालयात कनिष्ठ लिपिक या पदावर स्पर्धा परीक्षेद्वारे नुकतीच निवड झाली आहे.
*निवड झालेले विद्यार्थी*
——————————-
1) *किरण रणछोड जाधव* यांची *रायगड जिल्हा न्यायालयात *कनिष्ठ लिपिक* या पदावर स्पर्धा परीक्षेमार्फत जिल्हा निवड यादीतील गुणवत्ता यादी क्रमांक 49 नुसार निवड झाली आहे.किरण जाधव यांनी आपले पदव्युत्तर शिक्षण प्रताप महाविद्यालयातील *राज्यशास्त्र* या विषयात 2023-24 मध्ये घेतले.
ते करिअर कौन्सिलिंग सेंटरचे गेल्या पाच वर्षापासूनचे विद्यार्थी होते.
2) *जितेंद्र निंबा अहिरे* यांची *मुंबई उच्च न्यायालयात कनिष्ठ लिपिक* या पदावर गुणवत्ता क्रमांक 46 नुसार 2023 च्या भरतीत निवड झाली आहे जितेंद्र अहिरे यांनी आपले पदव्युत्तर शिक्षण प्रताप महाविद्यालयातील *राज्यशास्त्र विभागात* 2021 मध्ये पूर्ण केले आहे ते सुद्धा सीसीएमसीचे विद्यार्थी होते.
3) *दिनेश चंद्रकांत गोसावी* या विद्यार्थ्यांची *अमरावती जिल्हा व सेशन न्यायालयात गुणवत्ता यादी क्रमांक 73 नुसार कनिष्ठ लिपिक या पदावर निवड झाली आहे*. दिनेश गोसावी यांनी आपले पदवीचे शिक्षण प्रताप महाविद्यालयातील *अर्थशास्त्र विभागात* 2021 मध्ये पूर्ण केले.
उपरोक्त सर्व विद्यार्थीनी आपले पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेताना महाविद्यालयाचे अभ्यासू व सक्रिय विद्यार्थी होते.
त्यांच्या या विशेष निवडीबद्दल खानदेश शिक्षण मंडळाचे सहसचिव तथा प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण बी.जैन, खानदेश शिक्षण मंडळाचे सहसचिव डॉ.धीरज वैष्णव, पदार्थ विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ.जयंत बी पटवर्धन, उपप्राचार्य डॉ.अमित पाटील, करिअर कौन्सिलिंग सेंटरचे प्रमुख डॉ. विजय तुंटे याचप्रमाणे कुलसचिव श्री राकेश निळे,कार्यालयीन अधिक्षक देवेंद्र कांबळे, वरिष्ठ लिपिक भटू चौधरी,अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष चे प्रमुख डॉ.मुकेश भोळे, डॉ.हर्षवर्धन जाधव, प्रा.संदीप नेरकर,डॉ.सुनील राजपूत,करिअर कौन्सिलिंग सेंटरचे दिलीप शिरसाठ,पराग पाटील,विशाल अहिरे,कैलास पाटील या सर्वांनी विविध जिल्हा सत्र न्यायालयात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले.