अ.भा. ग्रामपंचायत पंचायत अमळनेर तर्फे लोक वर्गणी रद्दबातल व पाणीपट्टी वर व्याज आकारणी करू नये याबद्दल अमळनेर नगर परिषदे कडे जोरदार मागणी
अमळनेर प्रतिनिधी
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने अमळनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री तुषार नेरकर साहेब यांना निवेदन देण्यात आले त्या निवेदनात म्हटले आहे की—-
1)अमळनेर नगरपरिषद गेल्या अनेक वर्षापासून लोक वर्गणी चे नावाखाली न.पा. करदात्यांकडून मोठ्या प्रमाणात कर वसूली करीत आहे. सदर नागरिकांवर लादलेली कर वसुली ही अन्यायकारक व बळजबरीची आहे व ती का आकारली जात आहे याचे कोणतेही सबळ कारण नगर परिषदेकडे नाही. तरी ती रद्द करण्यात यावी.
२) अमळनेर नगरपरिषद सन २०२४-२०२५ या वर्षापासून पाणीपट्टीच्या वार्षिक शुल्कात आर्थिक वर्ष 31 मार्च अखेर असताना , 31 डिसेंबर पासूनच २% दराने व्याज आकारणी करीत आहे . ती अन्यायकारक व जबरदस्तीची नागरिकांवर लादलेली आहे. नागरिकांमध्ये या बाबतीत तीव्र असंतोष आहे. तरी आपण पाणीपट्टी करा (Water Cess) वरील आकारण्यात येणाऱ्या व्याज/शास्ती रद्द करावी. अशी मागणी त्यात करण्यात आलेली आहे.
याप्रसंगी मुख्याधिकारी श्री तुषार नेरकर साहेब यांनी अ. भा.ग्राहक पंचायतीने दिलेले निवेदनातून लोक वर्गणी व पाणीपट्टी वरील व्याज न आकारणे बाबत आम्ही सकारात्मक असा निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. नागरिकांनी वेळेवर न. पा.कर नियमित व वेळेवर भरावा याकरता अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने जन जागृती करून आम्हास सहकार्य करावे असे विनंती वजा आवाहन त्यांनी केले.याप्रसंगी उपमुख्य अधिकारी श्री चव्हाण हे सुद्धा उपस्थित होते. तसेच अ भा ग्राहक पंचायत अमळनेरच्या अध्यक्षा सौ स्मिता चंद्रात्रे, एडवोकेट भारती अग्रवाल, महिला प्रांत प्रमुख,सौ ज्योती भावसार तालुका संघटक, सौ कपिला मोठे कार्यकारी सदस्य,
मकसूद बोहरी जिल्हा सहसंघटक,विजय शुक्ल ,बँकिंग व सायबर प्रमुख,सुनील वाघ ,जिल्हा ऊर्जा प्रमुख ,अरविंद मुठे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. अशी माहिती पी आर ओ सौ मेहराज बोहरी कळवितात.