श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेची
स्थानिक शैक्षणिक सहल संपन्न —–!
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेची स्थानिक शैक्षणिक सहल नुकतीच कंबरशी टेकडी अमळनेर या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती .सदर प्रसंगी 24 डिसेंबर हा दिवस मातृहृदयी पूज्य साने गुरुजी यांच्या 125 व्या जयंतीचा दिवस आणि श्रीमंत प्रताप शेठजी यांचाही जयंती दिवस यानिमित्ताने स्थानिक शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी “करी मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयाचे ” या साने गुरुजींच्या मातृ प्रेमासारखे मुक्ती प्रमाणे सहलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी पूज्य साने गुरुजी यांच्या प्रतिमेला ग्रीष्म महेश भावसार आणि तीर्थ महेश भावसार या बालक बंधूंच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
तदनंतर उपक्रमशील शिक्षक डी.ए. सोनवणे यांनी श्रीमंत प्रताप शेठजी यांच्या कार्याविषयी माहिती दिली. श्रीमंत प्रताप शेठजी यांनी ग्रामीण – शहरी भागात शिक्षणाची गंगोत्री सुरू केली. तसेच वैद्यकीय क्षेत्रात मोठी कामगिरी केली. अध्यात्म क्षेत्रातही भरीव योगदान दिले. उद्योग व्यवसायात प्रताप मिल उभी करून हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून कुटुंबाची भविष्याची चिंता मिटवली होती. तसेच खेडोपाडी शेती व्यवसाय सुरू करून कृषी क्षेत्रात भरीव योगदान दिले.
तसेच पूज्य साने गुरुजी यांच्या कार्याविषयी माहिती कथन करताना “करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे ” या उक्तीप्रमाणे पूज्य साने गुरुजी यांनी प्रताप हायस्कूल या ठिकाणी शिक्षक म्हणून अर्थात गुरुजी म्हणून आपली भूमिका आईप्रमाणे मुलांवर संस्कार करून निभावली. मुलांनी जर काही खोड्या किंवा चुका केल्या तर त्यांना शिक्षा न करता स्वतः शिक्षा करून घेत असत. सदर प्रसंगी त्यांची “खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे” ही प्रार्थना सर्व विद्यार्थ्यांसह घेण्यात आली .आणि प्रार्थनेचे महत्त्व पटवून देण्यात आले.
तसेच नुकत्याच अंबर्शी टेकडीवर हनुमानाची 22 फूट उंच असलेली भव्य आणि दिव्य अशी आकर्षक रेखीव मूर्तीचे दर्शन घडवून सर्व विद्यार्थ्यांचे फोटो घेण्यात आले. सदर प्रसंगी जय श्री हनुमान यांची हनुमान चालीसा जर आपण रोज पठण केली तर आपल्या शैक्षणिक जीवनात त्याचा आगळा आणि वेगळा परिणाम आपल्याला दिसून आल्याशिवाय राहणार नाही .याची यासाठी आपण दररोज हनुमान चालीसा पठण किंवा वाचन केली पाहिजे याचे महत्त्व पटवून देण्यात आले.
तदनंतर उपक्रमशील शिक्षक पी. एम. ठाकरे यांनी वेगवेगळे गीत- गाणी घेऊन विद्यार्थ्यांना मनमुराद आपल्या आवडीनुसार नृत्य करण्यास मोकळीक दिली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना आकर्षक पोहे वाटप केल्यानंतर ‘वदनी कवळ घेता नाम घ्या — हे कवन म्हणून भोजन प्रसंगी वंदना जाधव मॅडम , भारती चव्हाण मॅडम तसेच अर्चना मॅडम यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले. सदर प्रसंगी श्री व्ही. डी. पाटील, वाय.जे .पाटील, ए.पी. जाधव , डी .एस. माळी यांनी परिश्रम घेतले. तसेच सी.डी. निकम मॅडम ,एस. एस. तेले मॅडम यांनी मुलांना शालेय शिस्त आणि आनंद लुटुया मस्त मस्त —-! सदरच्या स्थानिक शैक्षणिक सहलीसाठी मुख्याध्यापक संदीप पवार यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. प्रमोद महाजन आणि अशोक सैंदाणे यांनी सदरच्या स्थानिक शैक्षणिक सहलीसाठी अथक परिश्रम घेतले. सदरच्या प्रसंगी अंबरशी टेकडी ग्रुपच्या वतीने मोलाचे मार्गदर्शनही लाभले आणि आपण आपल्या भविष्यात आपला वाढदिवस किंवा घरातील कोणत्याही व्यक्तीचा वाढदिवस असेल तर आपण त्या निमित्ताने ‘ एक झाड लावा निसर्ग दारी ऑक्सिजन मिळेल आपल्याला आयुष्यभरी ‘ याविषयी मार्गदर्शन केले.