अहिराणी साहित्य संमेलनात पत्रकार वसंतराव पाटील यांचा अहिराणी गौरव पुरस्कार देऊन सपत्नीक सन्मान
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार वसंतराव पाटील यांचा राज्यस्तरीय अहिराणी साहित्य संमेलनात सपत्नीक 2025 चा अहिराणी गौरव पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले
अहिराणी भाषेचा प्रचार व प्रसार करणारे खान्देशातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्यांना साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी हेरून निवड समितीने निवड केलेल्या युवकांत पाडळसरे येथील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार वसंतराव पाटील यांनी खान्देशातील कानबाईचा लोकोत्सव, अंबिका मातेचा चैत्रोत्सव, पाडळसरे धरणाच्या पाण्याचा शेतकऱ्यांना होणारा फायदा यावर अहिराणी भाषेतून तयार केलेल्या रिल्सचा माध्यमातून प्रचार प्रसिद्धी केल्या बद्दल राज्यस्तरीय 5 व्या अहिराणी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी अहिराणी गौरव पुरस्कारासाठी पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील यांची निवड केल्याने त्यांना दिनांक 31 रोजी समारोपाच्या कार्यक्रमात संमेलनाचे उदघाटक जेष्ठ पत्रकार डिगंबर महाले यांच्याहस्ते वसंतराव पाटील व सौं आशाबाई पाटील यांना सपत्नीक प्रदान करण्यात आला यावेळी कार्याध्यक्ष प्रा अशोक पवार,स्वागताध्यक्ष डि डि पाटील,मुख्य समन्वयक रणजित शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती, वसंतराव पाटील यांना अहिराणी गौरव पुरस्काराने गौरविण्यात आल्याने त्यांचे तालुक्यातुन सर्वत्र अभिनंदन होत आहे