



लोकशाही मजबुतीसाठी प्रसार माध्यमांची गरज
मा. प्राचार्य डॉ एल.ए पाटील
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्रसारमाध्यमांना महत्व आहे. जनमत तयार करण्यापासून तर जनतेचा
आवाज सत्ताधारी शासनापर्यंत पोहचविण्याचे काम प्रसारमाध्यमांच्या
माध्यमातून केले जाते. ज्यामुळे लोकशाही बळकट होण्यास मदत होते.
प्रसारमाध्यमांचे लोकशाही व्यवस्थेमध्ये त्रिकालाबाधित महत्व कुणीही नाकारू
शकत नाही. नागरिकांचे सार्वभौमत्व अबाधित ठेऊन लोकशाही व्यवस्था
जिवंत ठेवण्याचे महत्कार्य
करावे लागते.प्रसारमाध्यमांना
यादृष्टीने विचार केला तर आजची भारतीय राजकीय व्यवस्था, सामाजिक
परिस्थिती आणि भारतीय
प्रसारमाध्यमांची भूमिका लक्षात घेणे गरजेचे आहे असे अमळनेर येथे प्रताप कॉलेजमध्ये जिल्हास्तरीय साहित्य संमेलनात ‘सोशल मीडिया आणि त्याचा समाज जीवनावर होणारा परिणाम’ यावर मार्गदर्शन करतांना कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा डॉ एल.ए. पाटील हे बोलत होते..
ते पुढे म्हणाले की
भ्रमणध्वनी ही लहान गोष्ट आहे पण मोठे काम करते..
सोशलमिडीया मुळे जगणारी माणसं निर्माण होत आहे.
सोशलमिडीया उत्तमच आहे, वापरणारा कसा आहे यावर अवलंबून आहे.
या जगाचा उद्धार फक्त शिक्षकच करु शकतो, शिक्षक संघटनेमध्ये राजकारण घुसले आहे राजकारण विरहित संघटना राहिल्या तर शिक्षकांचे व प्राध्यापकांचे प्रश्न सुटू शकतात असे सांगत ते म्हणाले कि सध्या मूल्य शिक्षणा बरोबर आजच्या पिढीला संस्कारांची गरज आहे ,संस्कार नसतील तर भावी पिढी कशी घडेल ? आजची तरुणाई सोशल मीडियाच्या आहारी गेलेली आहे त्यांना वेळीच आवर घातला नाही तर येणारा काळ धोक्याचा आहे , प्राध्यापक ,शिक्षक यांची भरती प्रक्रिया एमपीएससी च्या माध्यमातून झाली पाहिजे, घोषणा होतात पण अंमलबजावणी होत नाही,
योग्य हुशार शिक्षक प्राध्यापक यापासून वंचित राहिल्यामुळे नको ते लोक या व्यवसायात आल्यामुळे कर्मचारी वर्गावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.. त्यात चांगले शिक्षक भरडले जात आहेत.तरूण पिढीला व्यसनाधीनतेपासून रोखायचे असेल तर चांगल्या शिक्षकाची गरज आहे पण आमच्याकडे प्रश्न निर्माण करु नये अशी व्यवस्था आहे,
वैचारिक नावाखाली स्वैराचार आहे असे सांगत सोशल मीडिया आणि त्याचा समाज जीवनावर परिणाम पाहिला तर जग अत्यंत जवळ आले आहे पण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधने जेवढे सोपे झाले आहे तेवढेच या सोशल मीडियाचा गैरवापरामुळे नातेसंबंधात दुरावा निर्माण झाला आहे असे डॉ पाटील यांनी सांगितले.
विचारपिठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रताप काँलेजचे माजीप्राचार्य डॉ एल.ए पाटील,प्रा रमेश माने, प्रा.डॉ उषा पाटील धुळे ,प्रा.ज्ञानेश्वर कांबळे,वि.दा.पिंगळे साहित्यिक पुणे हे होते.
प्रा ज्ञानेश्वर कांबळे म्हणाले कि जाहिरात करणे म्हणजे खोटे बोलणे यामुळे समाज माध्यमाचा वापर होत आहे असे त्यांनी सांगितले. तर
प्रा डॉ वि.दा.पिंगळे पुणे यांनी सांगितले कि अगोदर एक मराठीत म्हण होती ती म्हणजे ‘घरोघरी मातीच्या चूली..’ आज तिचे स्वरूप बदलत घरोघरी मोबाईल असे झाले आहे.समाजाच्या प्रगतीसाठी मोबाईल वापरला पाहिजे पण त्याचा गैरवापर झाल्यामुळे सोशलमिडीया आज जीवावर उठला आहे हे तेवढेच सत्य.अभासी जगात फसलो पण ज्ञान मिळाले का?सोशलमिडीया एक व्यसन झाले….गुरुपौर्णिमा बाजूला होईल तर पुढे गुगल पोर्णिमा पुढे येईल अशी खंत व्यक्त करत समाजमाध्यमाचा योग्य वापर करणे तेवढेच गरजेचे आहे…सध्या लाईक व डिसलाईक चा सोशलमिडीया वर अधिक परिणाम झाला आहे..
फेसबुकवर चा मित्र खोटा असतो,शाळेतला मित्र खरा असतो असे त्यांनी सांगितले.
तर प्रताप कॉलेजचे मराठी विभागाचे प्रमुख
प्रा. रमेश माने म्हणाले की
समाजमाध्यम महत्त्वाचे साधन आहे,योग्य वापर सोशलमिडीया चा झाला तर ज्ञानात भर पडू शकते,
सोशलमिडीया तात्कालिक सुख देतात..सोशलमिडीया तून मोठे होता येत नाही… त्यासाठी पुस्तक व साहित्याची तेवढीच गरज आहे. सर्वसामान्यांना सोशल मीडिया आणि एक प्लॅटफॉर्म दिल्यामुळे अनेकांचे भविष्य उज्वलही झाले आहेत हे नाकारता येणार नाही. म्हणून सोशल मीडिया याचा समाज माध्यमांनाही परिणाम पाहिला तर योग्य वापर केला तर त्याचा फायदाच आहे असे त्यांनी सांगितले तर
प्रा.डॉ उषा पाटील धुळे यांनी सांगितले की समाजमाध्यमाने समाज जीवन ढवळून निघाले आहे पण समाजमाध्यमामुळे आँनलाईन शिक्षण सुरू झाले तेव्हाच आपणास समजले..
समाजमाध्यमामुळे नातेवाईक यांचे पुल बांधले गेले,
प्रिंट मिडीयाला मर्यादा आहेत पण सोशलमिडीया च्या माध्यमातून त्याच्या भावना तो व्यक्त करू शकतो असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ वसुंधरा दशरथ लांडगे यांनी केले तर निवेदक एडवोकेट सारांश सोनार यांनी केले.
यावेळी विचारपीठावरील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला यावेळी अनेक साहित्य प्रेमी उपस्थित होते.
यावेळी मराठी वाङ्मय मंडळ अमळनेर व आप्पासाहेब केले ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी,श्यामकांतजी भदाणे,रमेश पवार सोमनाथ ब्रम्हे, शरद सोनवणे, नरेंद्र निकुंभ,डॉ पी.बी भराटे, प्रदीप साळवी, व कार्यकारी सदस्य बन्सीलाल भागवत, वसुंधरा लांडगे, संदीप घोरपडे, भैयासाहेब मगर, प्रा.डॉ सुरेश माहेश्वरी, प्रा श्याम पवार, प्रा.शिला पाटील, श्रीमती रजनीताई केले सह माजी आमदार बी.एस.पाटील, प्रा.एस.ओ.माळी,दिलीप सोनवणे, प्रकाश वाघ, प्रा.डॉ लिलाधर पाटील,
आत्माराम चौधरी,दिनेश नाईक,गोपाल हळपे,दत्तात्रय सोनवणे,डॉ अर्पणा मुठे,कांचन शहा,डॉ माधुरी भांडारकर, नयना कुलकर्णी, डि.ए.धनगर,पत्रकार उमेश काटे,शरद पाटील, नरेंद्र पाटील ईश्वर महाजन सह साहित्य प्रेमी व खान्देशातील कवी उपस्थित होते.
