



साहित्य व लेखनासाठी साधना लागते…
प्रा.डॉ नरेंद्र पाठक ठाणे
कार्याध्यक्ष-अ.भा.मराठी साहित्य परिषद
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
भावना आणि कल्पनांना अभिव्यक्त करणारे एक सशक्त माध्यम म्हणजे कविता होय. अनुभव हाच साहित्याचा आत्मा असल्याने साहित्यिकांनी समाजात वावरून अनुभव गोळा केले पाहिजे. समाजातील सुखदुःख जो प्रत्यक्ष पाहतो तो जिवंत साहित्य निर्माण करू शकतो त्यासाठी साहित्य लेखनासाठी साधना लागते असे कविवर्य ‘बालकवी ठोंबरे कविकट्टा’ उद्घाटन प्रसंगी प्रताप कॉलेज अमळनेर येथे प्रा डॉ नरेंद्र पाठक (ठाणे कार्याध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद ) उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई पुरस्कृत मराठी वाडमय मंडळ अमळनेर आणि प्रा आप्पासाहेब र.का केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर आयोजित जिल्हास्तरीय साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात 3 व 4 डिसेंबर रोजी संपन्न झाले.
विचारपीठावर डॉ वि.दा.पिंगळे,डॉ अविनाश जोशी,रमेश पवार,, डॉ कुणाल पवार होते..
कै प्रताप शेठ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
डॉ मिलिंद जोशी म्हणाले कि
ज्या भावना अनेक परिस्थितीत व्यक्त करता येत नाही ते फक्त कवितातून व्यक्त करता येते तर
वि.दा.पिंगळे यांनी
कविता व चारोळ्या सादर केल्या,तर डॉ कूणाल पवार
कविता सादर केली.
यावेळी मराठी वाङ्मय मंडळ अमळनेर व आप्पासाहेब केले ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी,श्यामकांतजी भदाणे,रमेश पवार सोमनाथ ब्रम्हे, शरद सोनवणे, नरेंद्र निकुंभ,डॉ पी.बी भराटे, प्रदीप साळवी, व कार्यकारी सदस्य बन्सीलाल भागवत, वसुंधरा लांडगे, संदीप घोरपडे, भैयासाहेब मगर, प्रा.डॉ सुरेश माहेश्वरी, प्रा श्याम पवार, प्रा.शिला पाटील, श्रीमती रजनीताई केले सह माजी आमदार बी.एस.पाटील, प्रा.एस.ओ.माळी,दिलीप सोनवणे, प्रकाश वाघ, प्रा.डॉ लिलाधर पाटील,
आत्माराम चौधरी,दिनेश नाईक,गोपाल हळपे,दत्तात्रय सोनवणे, डि.ए.धनगर,पत्रकार उमेश काटे,शरद पाटील ,नरेंद्र पाटील सबगव्हाण सह साहित्य प्रेमी व कवी उपस्थित होते.