• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या प्रलंबित मागण्यासाठी सकारात्मक चर्चा

Feb 27, 2023

Loading

दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजी ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या प्रलंबित मागण्यासाठी रोहयो विभाग मंत्रालय येथे रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच अप्पर सचिव नंदकुमार वर्मा व संबंधीत रोहयो मंत्रालयाचे अधिकारी यांच्या समक्ष संघटनेच्या पदाधिकारी सोबत रोहयो मंत्री यांनी बैठक घेतली त्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. आपल्या मागण्या रास्त असल्याचे रोहयो मंत्री यांनी संघटनेला सांगितले, लवकरच आपल्या मागण्या मान्य करण्याचे संघटनेला ठोस आश्वासन दिलेले आहे. परंतु झालेल्या चर्चेनुसार बैठकीचे इतिवृत न बनवता, संघटनेची मागणी नसतांना, चर्चेला मुद्दे आले नसतांना ते मुद्दे इतिवृत्तात समाविष्ट करण्यात आलेले आहेत. यामुळे राज्यातील ग्रामरोजगार सेवकांची प्रशासनाकडून चेष्टा केली जात आहे. तरी संबंधीत विषयी रोहयो मंत्री संदीपांन भुमरे व शासनाच्या लक्षात येण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथे खालील मागण्याबाबत एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आलेले आहे
प्रमुख मागण्या

  1. दि. 2 मे 2011 चा अर्धवेळ शासन निर्णयाचे शुध्दीपत्रक काढून पुर्णवेळ करण्यात यावे. किमान वेतन अधिनियमानुसार मासिक वेतन देण्यात यावे.
  2. दिनांक आठ मार्च दोन हजार एकविस रोजीचा शासन निर्णय फिक्स दरमहा मानधन स्वरूपात लागु करण्यात यावा.
    3.ग्रामरोजगार सेवकांना विमा संरक्षण करण्यात यावे.
    4.ग्रामरोजगार सेवकांना सामाजिक सुरक्षा लागु करण्यात यावे.
    5.एन.एम.एम.एस. अंतर्गत मजुरांची हजेरी घेणे बंधनकारक असुन त्यासाठी एंड्राईड मोबाईल, इंटनेट सुविधा लागु करून, अडचणीच्या ठिकाणी ऑफलाईन हजेरी मान्य करण्यात यावी.
  3. ग्रामरोजगार सेवकांचे प्रलंबित असलेले प्रवास व अल्पोपहार खर्च प्रोत्साहन भत्ता व इतर प्रकारचे प्रलंबित असलेले देयके तात्काळ देण्यात यावे.
    7.ग्रामरोजगार सेवक पद हे एक व्यक्ती एक पद करण्यात यावे.
  4. सेवा करीत असलेल्या वयोवृध्द ग्रामरोजगार सेवकांच्या कुटूंबातील एका व्यक्तीची प्राधान्याने निवड करण्यात यावी. याबाबत शासनाने लक्ष न दिल्यामुळे व विहीत वेळेत शासन निर्णय याची अमंलबजावणी न झाल्यामुळे संघटना दि. 27/02/2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव आणि राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे. तरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि रोहयो मंत्री यांनी योग्य ती दखल वरीलप्रमाणे शासन निर्णय काढून आपल्या स्तरावरुन अंमलबजावणी करण्यात यावी अशी संघटनेच्या वतीने कलेक्टर यांच्यामार्फत मागणी करण्यात आलेली आहे निवेदन सादर करतांना श्री. सुरेश पाटोळे जिल्हाध्यक्ष उमेश तायडे राज्य संघटक सुनील राजपूत प्रसिद्धी प्रमुख सईद शेख कोषाध्यक्ष दिनेश पाटील तालुकाध्यक्ष योगेश भदाणे गोरख पाटील साहेबराव पाटील अनिल पाटील कैलास राठोड विश्वनाथ अहिरे विवेक जावळे जितेंद्र पाटील कैलास सोळके दिनेश पाटील वसिम पिंजारी संदिप जाधव प्रदिप कोचुरे जगदिश गायकवाड शालिक सवर्ने आदी बहुसंख्य ग्रामरोजगार सेवक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *