
पुण्यश्लोक काव्यसंग्रहाचे जेजुरी येथे प्रकाशन
जेजुरी : पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या २९८ वी जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश येथील कवींनी अहिल्यादेवी यांच्या जीवन चरित्र कार्याविषयी कवितातून अभिवादन करून या संपादित १३७ कवितांचा पुण्यश्लोक काव्यसंग्रह महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा जेजुरी येथील अहिल्याबाई होळकर तलावा शेजारी शरदचंद्र भवन सभागृहात प्रकाशन सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ विमल जानकर माजी सरपंच वेळापूर या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सौ दिपाली पांढरे पुणे, सौ रोहिणी रासकर पुणे, सौ.अनिता काळे अहमदनगर मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबा व पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रजनन करून करण्यात आले. प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक या संपादित काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले .राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे विजेते मंदाकिनी सपकाळ सांगली, द्वितीय क्रमांकाचे विजेते श्रीमती विद्या सरपाते बुलढाणा, तृतीय क्रमांकाचे विजेते सौ. योगिता मापारी सातारा , स. ना.जोशी नांदेड व उत्तेजनार्थ श्रीगणेश शेंडे,श्री दशरथ धायगुडे,सौ. मनीषा घुले ,भारती पाटील, व गणेश तांबे यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानपत्र सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला . याप्रसंगी अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन व चरित्र या विषयावरती उपस्थित कवींनी आपल्या कविता सादर करून कविता संमेलन संपन्न् झाले. काव्यसंमेलन गझलकार प्रमोद जगताप यांच्या अध्यक्षतेखाली व कवी अनंत राऊत यांच्या उपस्थितीत पार पडले. सामाजिक , विधायक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना सुजन फाउंडेशनच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार माजी सरपंच सौ विमल जानकर व दिपालीताई पांढरे यांना प्रदान करण्यात आला. तसेच सौ. अनिताताई काळे अहमदनगर, अर्चना एखंडे अहमदनगर,सौ ज्योती ठाकरे वाशीम, सौ संगीता धायगुडे सातारा , सौ सुचेता हाडंबर खंडाळा, सौवृषाली घाटगे ,सौ सीमा एकतपुरे, शबाना पठाण ,सौ लता धायगुडे औंध या महिलांना त्यांच्या क्षेत्रांमध्ये केलेल्या भरीव योगदानाच्या प्रित्यर्थ कर्तबगार महिला २०२३ या विशेष सन्मानाने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सौ पल्लवी मारकड संपादिका यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज.तू. गारडे यांनी केले. कार्यक्रमाकरिता श्री दशरथ धायगुडे , सौ.अलका बनकर, श्री मोहन बोरकर ,श्री बापूराव सुळ ,श्री प्रशांत काळे ,श्री नितिन बिचुकले, व ज्येष्ठ नागरिक संघटना जेजुरी यांचे पदाधिकारी यांचे विशेष सहकारी लाभले.कार्यक्रम आयोजक सुजन फौंडेशन अध्यक्ष अजित जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.