रिमझिम काव्य संमेलन व साहित्यिक सन्मान सोहळा नाशिक येथे दिमाखात संपन्न
ओवी ते अभंग या काव्य प्रकारांचा अभ्यास केल्याशिवाय दर्जेदार काव्य निर्माण होत नाही – रामदास वाघ
सर्व साहित्यिक व साहित्यिक चळवळीनी मायबोली अहिरानी साठी एकत्र येवून काम करण्याची गरज – विकास पाटील



नाशिक ( मनिलाल शिंपी ):उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ संचलित जागतिक अहिरानी भाषा संवर्धन परिषदेतर्फे रिमझिम काव्य संमेलन व साहित्यिक गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. काव्य लेखन करताना ओवी पासून अभंगापर्यंतच्या सर्व काव्यप्रकारांचा सखोल अभ्यास केल्याशिवाय दर्जेदार कविता निर्माण होऊ शकत नाही. दर्जेदार कवीतांच्या निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया समजून घेणे गरजेचे आहे. कविता जगण्याचा आदर्श विचार देते म्हणून कवी होतांना त्यातला माणूस अनुभवता आला पाहीजे असे विचार जेष्ठ साहित्यिक रामदास वाघ यांनी येथे व्यक्त केले. यावेळी विश्वास को-ऑप बँकेचे संस्थापक विश्वास ठाकूर, अहिराणी भाषा अभ्यासक बापूसाहेब हटकर, उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाचे विकास पाटील कार्याध्यक्ष प्राचार्य प्रशांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ संचलित जागतिक अहिरानी भाषा संवर्धन परिषदेतर्फे रिमझिम काव्य संमेलन व साहित्यिक गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अध्यक्ष स्थानावरून वाघ बोलत होते. प्रमुख अतिथी विश्वास ठाकूर, बापूसाहेब हटकर आदिंनीही अहिराणी भाषा संवर्धन चळवळ व्यापक स्वरूपात केली त्यासाठी आम्ही निश्चितच सोबत राहून सहकार्य करू असे आश्वासन देऊन रेडीओ विश्वास आपल्यासाठी सदैव साथ देईल
प्रारंभी प्राचार्य प्रशांत पाटील आणि विकास पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आयोजन संदर्भात भूमिका मांडून सर्व साहित्यिकांचे स्वागत केले.
कालिकामाता मंदिर ट्रस्टच्या बंदिस्त सभागृहात रिमझिम काव्य संमेलन झाले यात सुमारे ५१ कविंनी आपल्या मराठी व अहिराणी कविता सादर केल्या. अहिराणी बोली भाषेच्या जतन आणि संवर्धनार्थ आयुष्यभर केलेल्या सेवेच्या प्रती जीवन गौरव पुरस्कार देऊन डॉ. रमेश सूर्यवंशी, विश्राम बिरारी यांना सन्मानित करण्यात आले. सत्कारास उत्तर म्हणून डाॅ. रमेश सुर्यवंशी, डाॅ. फुला बागुल, देवदत्त बोरसे यांनी मनोगत व्यक्त केले.
अहिराणी बोलीभाषेत उत्कृष्ट काव्य आणि साहित्य निर्माण व्हावे, साहित्यिकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून महाकवी कालिदास यांच्या स्म्रुती म्हणून रीमझीम कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. काव्य संमेलनातील सहभागींना अहिरानी भाषा संवर्धक सारस्वत डॉ. दामोदर गोविंद बोरसे पुरस्कार बापू पिंगळे, डॉ.फुला बागुल, रमेश बोरसे, सौं. लतिका चौधरी, नाना माळी, प्रकाश पाटील सौ.सुमती पवार, डॉ.जितेंद्र देसले, विजय निकम, जितेन्द्र चव्हाण, सौ.वर्षा पाटील, डॉ.प्रा.प्रकाश माळी, आलियागोहर जाकीर शेख, यशवंत पगारे, काशीनाथ महाजन, डॉ.आनंद सूर्यवंशी, सौ मनिषा पाटील, कु.हर्षदा किरण शेलार, गोपाल परमार, डॉ.मनिलाल शिंपी, सौ आशा शिरुडे, विवेक पाटील, देवदत्त बोरसे, कैलास भामरे, विनोद शेलकर, आबा आहेर, श्रीमती सविता पाटील, प्रा.सुभाष शेलार, श्रीमती सुनिता पाटील, संजय सोनार, वि. ना. बागुल, विजय निकम, मकरंद जाधव, सौ रोहिणी कोठावदे, रामचंद्र गुरव, भगवान पाटील, रमेश महाले, मोहन पाटील, प्रतिक अलई, प्रा.गिरीश पाटील, मधुकर हुजरे, सौ.विद्या पाटील, बबलू आहीरे, रोहित ठाकुर, नितीन अहिरराव, विजय सूर्यवंशी, दिपक चव्हान, सौ.सुरेखा चव्हाण, सुधाकर भामरे, जितेंद्र चौधरी, संजय धनगव्हाळ, प्रा.डाॅ.दौलत सोनवणे यांना प्रदान करण्यात आले.
खान्देश मराठा मंडळ, नाशिक यांच्यातर्फे संपुर्ण नियोजनठ करण्यात आले आहे. शेवटी उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ संचलित जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेतर्फे अध्यक्ष विकास पाटील यांनी आभार मानले. सुत्रसंचलन हर्षदा शेलार यांनी केले.

