मित्रा तुला नियतीपासून रोखता आले नाही, परंतु मदतीला होकार दे!!
एकात्मता गृपने सामाजिक बांधीलकी जोपासत केली आर्थिक मदत..
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
कळमसरे येथील शारदा माध्यमिक विदयालयाची दहावीत 1996 ला असलेली बॅच खूप मेहनती व अभ्यासू होती. सर्व मुले मुली एकत्र राहत. शालेय कार्यक्रमात सहभाग घेत. गुणवत्ता जोपासत ही बॅच यशस्वी झाली..वेगवेगळे मित्र विविध ठिकाणी नोकरीला लागले..काही शेती सांभाळीत राहीले. परंतु एकमेकांत जिव्हाळा, प्रेम, आपुलकी ह्या मुलामुलींची कमी झाली नाही..आपल्या सोबत शिकलेल्या मित्रांच्या सुखदुःखात सर्व विद्यार्थी जात येत राहिले..त्यांनी सर्वांशी सुसंवाद घडवून येण्यासाठी ‘एकात्मता ‘ नावाचा ग्रूप तयार केला.
गावाच्या चांगल्या कामात हा ग्रूप कामी येऊ लागला. त्यात एकुण 85 जण आहेत. गावातील सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक किमात एकात्मता हात देऊ लागली. अशातच त्यांच्या बॅचचा विद्यार्थी किशोर बाबुराव पाटील याला नियतीने दगा दिला. त्याला कर्करोग असल्याचे निदान झाले. आपल्या मित्राला मदत करण्यासाठी सारा ग्रूप धावून आला. अगदी गुणी, मेहनती किशोर कर्करोग झाल्याने हतबल झाला..सर्व मित्रांनी मदत केली परंतु जिवलग मित्राला काळ घेऊन गेला. मित्राच्या कुटुंबावर आलेला आघात त्यात त्याची हलाखीची परिस्थिती यामुळे कुटुंबावर चोहोबाजूंनी आघात झाला..अशावेळेस एकात्मता ग्रूप मित्राच्या दु:खात धावून जातो. किशोर ला 1 मुलगा व एक मुलगी..सर्व वर्गमित्रांनी ठरवले की किशोरच्या लहान पूर्वा नावाच्या मुलीची जबाबदारी घेऊन तीच्या नावाने सुकन्या योजनेत 51हजार टाकून तीच्या भविष्याची तरतूद केली. एकात्मता ग्रूप ने केलेली मदत गावात एका संवेदनशील बाब ठरली.
ह्या ग्रूप ने कपिलेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त फराळ देऊन पुण्याचे काम केले. गावात नेहमी धार्मिक कार्यक्रम होतात. त्यात दत्त मंदिराला एकात्मता ग्रूप ने 31 हजार रुपयांचे दागिने देऊन भक्त भाविकांकडून आशिर्वाद घेतला. अशा या अप्रतिम ग्रूप ची चर्चा परिसरात होत आहे. अनेक लोकांच्या सदिच्छा मिळत आहे. गावाच्या बाहेरील महाराष्ट्रातभर जिथे आपल्या गावचे लोक नोकरीस आहे त्यांच्यापर्यंत ह्या ग्रूप ची वार्ता पसरलेली आहे. अनेक मंडळे त्यांचा आदर्श घेत आहे. ग्रूप चे अँडमीन सुदाम कोळी तसेच मंजुश्री जाधव व वैशाली चौधरी यांनी आपण पूर्वजांचा समतेचा वारसा चालविण्याचा इवलासा प्रयत्न करीत आहे असे बोलतांना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या…
चौकट
एकात्मता ग्रुपने शैक्षणिक व सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक गरजू बंधू आणि भगिनींच्या पाठीशी उभा राहीला आहे. भविष्यात ग्रुप मधील सर्वच बांधवांच्या सुखदुःखात पाठीशी उभा राहील व ग्रुपच्या माध्यमातून समाज उपयोगी उपक्रम राबवली जातील.
सुदाम जुलाल कोळी
गृप अँडमीन कळमसरे
