
शासनाचा कुठलाच पैसा न घेता साजरे होणार विद्रोही साहित्य संमेलन!!
साहित्य म्हटलं की ते समाजाचा एक आरसा असतो..आपल्या देशात साहित्याची खूप मोठी परंपरा लाभली आहे..विदर्भ हा ह्या मराठी साहित्याची जननी होय..चक्रधर स्वामी च्या काळात ह्या साहित्याची नोंद आढळते. लिळाचरित्र ह्या मुकुंदराज याच्या पुस्तकाच्या लिखाणाने चक्रधरांचे चरित्र समजते..संस्कृत भाषेला सर्व सामान्यांपर्यंत पोहचता आले नाही..ही आमची भाषा ह्या अविर्भावात सनातनी राहिले. ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडानी विद्रोह करित मराठीच्या प्राकृत भाषेत लिखाण करुन संस्कृत साहित्याचे निरुपण केले..संत नामदेव यांनी भागवत धर्माची पताका घेऊन सारा बहुजन एकत्रित केला. वारकरी संप्रदाय महाराष्ट्र बाहेर नेला. जे प्रतिगामी लोकांना जमले नाही ते त्यांनी करून दाखविले. असा हा विचार समतेचा, मानवतेचा महाराष्ट्रातील संतानी विठ्ठल हा बहुजनाचा देव मानून अनैकेश्र्वर ही कल्पना फोल ठरविली. हा संघर्ष बहुजन ते स्वतःला अभिजन समजणाऱ्या होता. त्यामुळे बहुजनाच्या संताना किर्तने मंदिरात करता आली नाही.त्यांनी मंदिराबाहेर बहुजनांना प्रबोधन केले. संतानी विषमतेवर कठोर प्रहार केला. कामात खरा ईश्वर आहे हे समजून सांगितले..बहुजनातील संत तुकाराम यांनी संत नामदेवानंतर मोठा विद्रोह केला. आपल्या प्रखर तत्वज्ञानाने बहुजनांना वास्तवतेचे भान आणले.ईश्वर एक आहे मग त्याच्या लेकरात दूजाभाव कसला..स्त्रीला आराधनेत पूर्वी स्थान नव्हते ते चक्रधरांच्या व बसवेश्वर यांच्या संप्रदायाने मिळवून दिले. तेच वारकरी पंथात भेदाभेद अमंळ हया ललकारीने बंद झाले. हाच संघर्ष साहित्य संमेलनात दिसून येतो. अखिल भारतीय संमेलनात बहुजनातील विद्वान, विचारवंत, साहित्यिक यांना आजपर्यंत अध्यक्षपद दिले गेले नाही. अण्णाभाऊ साठे, वामनदादा कर्डक, भालचंद्र नेमाडे, आ.ह. साळुंखे, बाबा भांड, यशवंत मनोहर, ना. धो. महानोर या अप्रतिम लिखाण करणार्या साहित्यिक लोकांना संधी मिळत नाही. जे आपले आहेत त्यांचे लेखन बहुजना पर्यंत पोहचले नाही. ते बहुजननांना माहित नाहीत त्यांना अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद दिले गेले आहेत. महात्मा फुले हयात असतांना त्यांनी ही खेळी पाहून बहूजनांचे वेगळे साहित्य संमेलन असावे. त्यात बहुजनाच्या प्रश्नाला वाचा फोडावी यासाठी विद्रोही साहित्य संमेलनाची संकल्पना दिली. ते म्हणत ज्या साहित्य संमेलनात बहुजनाची वेदना नाही, मांडणी नाही, वास्तव विचार नाही, सत्यावर आधारित साहित्य नाही कल्पनातील साहित्य आमचे साहित्य नाही. आमच्या साहित्यात स्वर्ग, नरक, पाप, पुण्य, पुनर्जन्म यासारखे खोटे आश्वासन नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी असे संमेलने आपली संमेलने नाहीत हे मान्य केले होते. अखिल भारतीय साहित्य संमेलने ही सरकारच्या तिजोरीतून होतात. साहित्यिकांना एसी ते उच्च प्रतीचे जेवण अशी राजेशाही पध्दतीची सोय असते. हा आमच्या जनतेचा पैसा अशा पध्दतीने घालविला जातो. आता तर 2 कोटी साहित्य संमेलनासाठी खर्च केले जातात. इकडे शाळेत शिकवायला शिक्षक नाही..महागाई शिगेला पोहचली, वीज परवडत नाही. कमी मोबदल्यात जीवन जगणे कठिण झाले असतांना असा वारेमाप पैसा उधळणे योग्य नाही. साहित्यिक लोकांनी स्वःताहुन हा पैसा नाकारला पाहिजे. विद्रोही साहित्य संमेलन हे कामगार, कष्टकरी, शेतकरी, मध्यम वर्गीय तसेच बहुजनातील स्व इच्छेच्या योगदानावर होते. त्यात कुठलाही बडेजाव नाही. जो सामान्य माणूस खाईल ती चटणी भाकर एकमेकात चटईवर बसून सोबत खातो. हा इतका साधेपणा हया संमेलनात असतो. एकपेक्षा एक उच्च दर्जाचा साहित्यिक यात येतो. महिला साहित्यिकाला ही तेवढाच मान सन्मान दिला जातो. बहुजनाच्या वेदनेवर हा साहित्यिक लिहतो. जे जगतो तेच मांडतो..
विद्रोही जगाच्या मानवतेसाठी लिहतो. त्यात शासनाच्या चुकिच्या धोरणावर सुध्दा ताशेरे ओढतो. विषमता मुक्त समाजासाठी त्याची लेखणी चालते. आ.ह.साळुंखे, मा. म. देशमुख, यशवंत मनोहर, जावेद अख्तर, गुलजार, श्रीमंत कोकाटे, नागराज मंजुळे यासारखी दिग्गज लोक संमेलनासाठी येतात. त्यांना कुठल्याही मानधनाची अपेक्षा नसते. मी समाजाचे देणे लागतो ह्या सुंदर भावनेने साहित्यिक लोक येतात. मुठभर धान्य व एक रुपया जमा करत..प्रत्येक बहुजनाचा हिस्सा असावा ह्या भावनेने विद्रोही साहित्य संमेलन होते. जिथे होते तेथील लोकांच्या सल्ल्याने ते घडवून येते. अखिल भारतीय संमेलन त्यांची वरची कमिटी ठरविते. स्थानिकांना काही महत्व दिले जात नाही..स्वागताध्यक्ष पासून निमंत्रका पर्यंत ठरलेले असते. विद्रोही साहित्य संमेलन सर्वांच्या मताचा आदर करत ठरत..विद्रोही साहित्य संमेलनात भारतात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टीवर प्रहार होतो. मणिपूर सारख्या प्रश्नावर विचारविनिमय होतो. शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ठराव होतो. विद्रोही संमेलनात ज्वलंत भेडसावणाऱ्या उदा. बेरोजगारी, महागाई, विषमता, बेबंदशाही, महिला अत्याचार यावर चर्चा होते. हे संमेलन बहुजनाच्या पैशातून असल्याने ते नेते व सरकार विरुध्द सडेतोड बोलते कारण सरकारच्या पैशावर आयोजीत केले जात नाही..अखिल भारतीय संमेलन नेत्यांच्या, सरकारच्या आशीर्वादाने परंतु जनतेचा कररुपी पैसा वापरुन होते त्यामुळे साहित्यिक नेत्यांवर व सरकारच्या चुकीच्या धोरणावर बोलत नाही..कंत्राटी शिक्षण, ईडी कारवाई, निवृत्ती वेतन,महिलावरील अन्याय, महागाई यावर विद्रोही साहित्यात हमखास चर्चा होइल.